शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

विषाणूजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:00 IST

गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देरुग्णालय, दवाखाने हाऊसफुल्ल : पावसाळ्यात खबरदारी घेण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.भंडारा जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली. अधून-मधून कोसळणाºया पावसांच्या सरींमुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडत होती. त्यामुळे पावसात अनेकदा भिजावे लागत असल्याने त्यामुळे विषाणूंचा संसर्ग होत आहे.'गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसात भिजल्याने अनेकांना सर्दी झाली आहे. त्यामुळे ताप, खोकलादेखील येऊ लागला आहे. त्याशिवाय उलट्या, जुलाब होत आहेत. विषाणूजन्य ताप असल्याने तो आठ दिवस राहतो. तापामुळे डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा वाढत आहे.सर्दी, खोकला तसेच तापाची ही लक्षणे लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहेत. कफ वाढल्याने दम्याच्या रुग्णांना त्रास होत आहे. रुग्णाला चक्कर येणे, सांधे दुखणे ही नवी लक्षणे दिसून येत आहेत. सध्याचे हवामान खराब आहे. विषाणूंचे हवेतील प्रमाण वाढत आहे. पावसात भिजल्याने आजार वाढण्याची शक्यता असते. पावसात डोके भिजल्याने डोकेदुखी, सर्दी, त्याशिवाय हात पाय दुखायला सुरुवात होते. शहरासह जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे.पावसाळ्यात विषाणुजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, दुषित पाणी व अन्नाद्वारे होणारे आजार जसे टायफाईड, कावीळ, जुलाब आदी बळावण्याची शक्यता जास्त असते. त्यात लहान बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने आजार सहज होऊ शकतात. यासाठी पुर्ण बाह्याची कापडे घालणे, डास व इतर किटकांपासून बचावासाठी मच्छरदानीचा वापर करणे, परिसरात पाणी जमा होवू न देणे, अन्नपदार्थ झाकुन ठेवणे तसेच उघड्यावरील खाद्यान्नाचे सेवन टाळणे, उकळुन थंड केलेले पाणी प्यायला देणे. प्रतिबंध उपचारापेक्षा चांगला आहे. बाळांना वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसी लावुन घेणे. रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार करावा.-डॉ. यशवंत लांजेवार,बालरोग तज्ज्ञ, सिटीकेअर मल्टीस्पेशिआलिटी हॉस्पिटल, भंडारा.