शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विषाणूजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:00 IST

गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देरुग्णालय, दवाखाने हाऊसफुल्ल : पावसाळ्यात खबरदारी घेण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.भंडारा जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली. अधून-मधून कोसळणाºया पावसांच्या सरींमुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडत होती. त्यामुळे पावसात अनेकदा भिजावे लागत असल्याने त्यामुळे विषाणूंचा संसर्ग होत आहे.'गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसात भिजल्याने अनेकांना सर्दी झाली आहे. त्यामुळे ताप, खोकलादेखील येऊ लागला आहे. त्याशिवाय उलट्या, जुलाब होत आहेत. विषाणूजन्य ताप असल्याने तो आठ दिवस राहतो. तापामुळे डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा वाढत आहे.सर्दी, खोकला तसेच तापाची ही लक्षणे लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहेत. कफ वाढल्याने दम्याच्या रुग्णांना त्रास होत आहे. रुग्णाला चक्कर येणे, सांधे दुखणे ही नवी लक्षणे दिसून येत आहेत. सध्याचे हवामान खराब आहे. विषाणूंचे हवेतील प्रमाण वाढत आहे. पावसात भिजल्याने आजार वाढण्याची शक्यता असते. पावसात डोके भिजल्याने डोकेदुखी, सर्दी, त्याशिवाय हात पाय दुखायला सुरुवात होते. शहरासह जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे.पावसाळ्यात विषाणुजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, दुषित पाणी व अन्नाद्वारे होणारे आजार जसे टायफाईड, कावीळ, जुलाब आदी बळावण्याची शक्यता जास्त असते. त्यात लहान बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने आजार सहज होऊ शकतात. यासाठी पुर्ण बाह्याची कापडे घालणे, डास व इतर किटकांपासून बचावासाठी मच्छरदानीचा वापर करणे, परिसरात पाणी जमा होवू न देणे, अन्नपदार्थ झाकुन ठेवणे तसेच उघड्यावरील खाद्यान्नाचे सेवन टाळणे, उकळुन थंड केलेले पाणी प्यायला देणे. प्रतिबंध उपचारापेक्षा चांगला आहे. बाळांना वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसी लावुन घेणे. रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार करावा.-डॉ. यशवंत लांजेवार,बालरोग तज्ज्ञ, सिटीकेअर मल्टीस्पेशिआलिटी हॉस्पिटल, भंडारा.