शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

आरोग्य विभागांतर्गत काही महिन्यांपासून तालुक्यात ४५ वर्षे वयोगटांवरील नागरिकांना कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र गत काही ...

आरोग्य विभागांतर्गत काही महिन्यांपासून तालुक्यात ४५ वर्षे वयोगटांवरील नागरिकांना कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र गत काही दिवसांपासून सदर लसीकरणामुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या अफवांनी तालुक्यात जोर धरला आहेे असून मृत्यूच्या भीतीने नागरिकांची लसीकरणाला पाठ दाखविल्याने तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रचंड संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत मागील काही महिन्यांपूर्वीपासून कोरोना प्रतिबंधासाठी कोवॅक्सिनचे लसीकरण सुरू करण्यात आले. ४५ वर्षे वयोगटांवरील सर्व नागरिकांना सदरचे लसीकरण करता यावे यासाठी तालुक्यातील सर्वच तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत लसीकरण मोहीम आरंभण्यात आली आहे.

आरोग्य विभागांतर्गत सदर लसीकरण सुरू असताना गावागावांत प्रचंड मोठ्या प्रमाणात कोविड चाचणीदेखील केली जात आहे. या चाचणीअंतर्गत तालुक्यातील सर्वच गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून संबंधितांवर वैद्यकीय उपचारदेखील सुरू आहे. लसीकरणाने झाल्याची बनावपूर्ण अफवा करत असल्याने नागरिकांत या लसीकरणाची भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, नागरिकांनी मृत्यूच्या भीतीने लसीकरणाकडे पाठ फिरविताना कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक शासननिर्देशांचे पालन करणेदेखील टाळल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागांतर्गत नागरिकांना नियमित लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन केले जात असले तरी अफवांना बळी पडलेल्या नागरिकांकडून लसीकरणाला ठाम विरोध केला जात असल्याचे देखील बोलले जात आहे.

सध्या सर्वत्रच कोरोनाचा उद्रेक होऊन बाधितांना औषधोपचारासाठी आवश्यक आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्याची बोंब आहे. या परिस्थितीत नागरिकांनी या भयावह आजारापासून बचावासाठी लसीकरण करून घेणे हा एक मात्र पर्याय असल्याचे ठासून सांगितले जात आहे.

कोट बॉक्स

शासनाने कोवॅक्सिन लसीकरण मोहीम आरोग्य विभागांतर्गत सुरू केली आहे. सदर लसीकरण करून घेतल्यानंतर कोरोना संक्रमण होणार नाही हे समजणे चुकीचे आहे. सदर लस घेतल्यानंतरही कोरोना आजार होऊ शकतो व औषधोपचाराविना एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो. मात्र लसीकरणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, आदी अफवा पसरविणे व लसीकरण टाळणे हे चुकीचे असल्याचे म्हणत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे.

डॉ. नलिनीकांत मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी