शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

आरोग्य विभागांतर्गत काही महिन्यांपासून तालुक्यात ४५ वर्षे वयोगटांवरील नागरिकांना कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र गत काही ...

आरोग्य विभागांतर्गत काही महिन्यांपासून तालुक्यात ४५ वर्षे वयोगटांवरील नागरिकांना कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र गत काही दिवसांपासून सदर लसीकरणामुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या अफवांनी तालुक्यात जोर धरला आहेे असून मृत्यूच्या भीतीने नागरिकांची लसीकरणाला पाठ दाखविल्याने तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रचंड संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत मागील काही महिन्यांपूर्वीपासून कोरोना प्रतिबंधासाठी कोवॅक्सिनचे लसीकरण सुरू करण्यात आले. ४५ वर्षे वयोगटांवरील सर्व नागरिकांना सदरचे लसीकरण करता यावे यासाठी तालुक्यातील सर्वच तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत लसीकरण मोहीम आरंभण्यात आली आहे.

आरोग्य विभागांतर्गत सदर लसीकरण सुरू असताना गावागावांत प्रचंड मोठ्या प्रमाणात कोविड चाचणीदेखील केली जात आहे. या चाचणीअंतर्गत तालुक्यातील सर्वच गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून संबंधितांवर वैद्यकीय उपचारदेखील सुरू आहे. लसीकरणाने झाल्याची बनावपूर्ण अफवा करत असल्याने नागरिकांत या लसीकरणाची भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, नागरिकांनी मृत्यूच्या भीतीने लसीकरणाकडे पाठ फिरविताना कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक शासननिर्देशांचे पालन करणेदेखील टाळल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागांतर्गत नागरिकांना नियमित लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन केले जात असले तरी अफवांना बळी पडलेल्या नागरिकांकडून लसीकरणाला ठाम विरोध केला जात असल्याचे देखील बोलले जात आहे.

सध्या सर्वत्रच कोरोनाचा उद्रेक होऊन बाधितांना औषधोपचारासाठी आवश्यक आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्याची बोंब आहे. या परिस्थितीत नागरिकांनी या भयावह आजारापासून बचावासाठी लसीकरण करून घेणे हा एक मात्र पर्याय असल्याचे ठासून सांगितले जात आहे.

कोट बॉक्स

शासनाने कोवॅक्सिन लसीकरण मोहीम आरोग्य विभागांतर्गत सुरू केली आहे. सदर लसीकरण करून घेतल्यानंतर कोरोना संक्रमण होणार नाही हे समजणे चुकीचे आहे. सदर लस घेतल्यानंतरही कोरोना आजार होऊ शकतो व औषधोपचाराविना एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो. मात्र लसीकरणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, आदी अफवा पसरविणे व लसीकरण टाळणे हे चुकीचे असल्याचे म्हणत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे.

डॉ. नलिनीकांत मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी