शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर तर सर्वात कमी तुमसर आणि भंडारा तालुक्यात ०.२३ मीटर वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमुबलक पाऊस : यंदा पाणी टंचाईची चिंता नाही

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर तर सर्वात कमी तुमसर आणि भंडारा तालुक्यात ०.२३ मीटर वाढ झाली आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. सिंचन प्रकल्प आणि तलाव तुडूंब भरले आहेत. यासोबतच भूगर्भातील जलपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ७४ विहिरींचे निरिक्षण केले. त्यावेळी सरासरी पाणी पातळी १.८८ मीटर असल्याचे नमूद करण्यात आले. गत पाच वर्षाच्या तुलनेत ०.१६ मीटर ने पाणी पातळी घटली असली तरी यंदा प्रशासनाला चिंतेचे कारण दिसत नाही.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८० मिमी. असून जुन ते सप्टेंबर या कालावधीत १२२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरसरीच्या ४.१४ मिमी कमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र त्याचा भूगर्भातील जलसाठ्यावर अपेक्षीत परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असल्याने भूगर्भातील जलपातळी टिकून असते. तलावांमुळे गावातील विहिरींच्या जलपातळीतही वाढ होते. प्रशासनाने भंडारा जिल्हा टँकरमुक्त घोषीत केला आहे.भंडारा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी २.१९ मीटर पाणी पातळी आढळून आली. तालुक्यात ०.२३ मीटरने वाढ नोंदविण्यात आली. मोहाडी तालुक्यात १.९२ मीटर भूजल पातळी असून ०.४४मीटरने वाढ झाली आहे. तुमसर मध्ये २.३६ मीटर भूजल पातळी असून ०.२३ मीटरने वाढ झाली आहे. साकोली तालुक्यात १.३० मीटर भूजलपातळी नोंदवीली असून त्यात ०.६८ मीटरने वाढ झाली आहे. लाखनी तालुक्यातील ०.९७ मीटर भूजलपातळी नोंदविली असून ०.८८ मीटरने त्यात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ पवनी तालुक्यात ०.९५ मीटरने नोंदविण्यात आली असून येथील भूजल पातळी ३.४६ मीटर आहे. लाखांदूर तालुक्यात ०.८९ मीटर भूजल पातळी नोंदविण्यात आली आहे.७८२ गावांमध्ये पुरेसे भूजलभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणीपातळीचा अहवाल सप्टेंबर महिण्यात तयार केला असून त्यानुसार जिल्ह्यातील ७८२ गावांमध्ये पुरेसे पाणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात २५ पाणलोट क्षेत्र असून एकाही गावात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाणी टंचाई भासली नाही. तसेच जानेवारी ते मार्च या कालावधीतही जिल्ह्यातील एकाही गावात पाणी टंचाई भासणार नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

पाण्याचा वापर जपून करापाणी म्हणजे जीवन होय. भंडारा जिल्हा पाण्याच्या बाबतीत समृध्द जिल्हा म्हणून ओळखला जातो. १३०० च्या वर तलाव आणि विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहते. यामुळे भूगर्भातील जलपातळी समाधानकारक असते. ग्रामीण भागात पाण्याचा वापर काटकसरीने केला जात असला तरी शहरी भागात मात्र पाण्याची उधळपट्टीच होते. पाण्याचा आतापासून काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून जावू नये यासाठी जलपूनर्भरणाचे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. अन्यथा काही दिवसात भंडारा जिल्ह्यावरही पाणी टंचाईचे संकट घोंगावल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या लेखी पाणी टंचाई नसली तरी अनेक गावात मे महिन्याच्या शेवटी पाणी टंचाई जाणवते. या गावांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची ही गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात