शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर तर सर्वात कमी तुमसर आणि भंडारा तालुक्यात ०.२३ मीटर वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमुबलक पाऊस : यंदा पाणी टंचाईची चिंता नाही

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर तर सर्वात कमी तुमसर आणि भंडारा तालुक्यात ०.२३ मीटर वाढ झाली आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. सिंचन प्रकल्प आणि तलाव तुडूंब भरले आहेत. यासोबतच भूगर्भातील जलपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ७४ विहिरींचे निरिक्षण केले. त्यावेळी सरासरी पाणी पातळी १.८८ मीटर असल्याचे नमूद करण्यात आले. गत पाच वर्षाच्या तुलनेत ०.१६ मीटर ने पाणी पातळी घटली असली तरी यंदा प्रशासनाला चिंतेचे कारण दिसत नाही.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८० मिमी. असून जुन ते सप्टेंबर या कालावधीत १२२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरसरीच्या ४.१४ मिमी कमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र त्याचा भूगर्भातील जलसाठ्यावर अपेक्षीत परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असल्याने भूगर्भातील जलपातळी टिकून असते. तलावांमुळे गावातील विहिरींच्या जलपातळीतही वाढ होते. प्रशासनाने भंडारा जिल्हा टँकरमुक्त घोषीत केला आहे.भंडारा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी २.१९ मीटर पाणी पातळी आढळून आली. तालुक्यात ०.२३ मीटरने वाढ नोंदविण्यात आली. मोहाडी तालुक्यात १.९२ मीटर भूजल पातळी असून ०.४४मीटरने वाढ झाली आहे. तुमसर मध्ये २.३६ मीटर भूजल पातळी असून ०.२३ मीटरने वाढ झाली आहे. साकोली तालुक्यात १.३० मीटर भूजलपातळी नोंदवीली असून त्यात ०.६८ मीटरने वाढ झाली आहे. लाखनी तालुक्यातील ०.९७ मीटर भूजलपातळी नोंदविली असून ०.८८ मीटरने त्यात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ पवनी तालुक्यात ०.९५ मीटरने नोंदविण्यात आली असून येथील भूजल पातळी ३.४६ मीटर आहे. लाखांदूर तालुक्यात ०.८९ मीटर भूजल पातळी नोंदविण्यात आली आहे.७८२ गावांमध्ये पुरेसे भूजलभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणीपातळीचा अहवाल सप्टेंबर महिण्यात तयार केला असून त्यानुसार जिल्ह्यातील ७८२ गावांमध्ये पुरेसे पाणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात २५ पाणलोट क्षेत्र असून एकाही गावात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाणी टंचाई भासली नाही. तसेच जानेवारी ते मार्च या कालावधीतही जिल्ह्यातील एकाही गावात पाणी टंचाई भासणार नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

पाण्याचा वापर जपून करापाणी म्हणजे जीवन होय. भंडारा जिल्हा पाण्याच्या बाबतीत समृध्द जिल्हा म्हणून ओळखला जातो. १३०० च्या वर तलाव आणि विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहते. यामुळे भूगर्भातील जलपातळी समाधानकारक असते. ग्रामीण भागात पाण्याचा वापर काटकसरीने केला जात असला तरी शहरी भागात मात्र पाण्याची उधळपट्टीच होते. पाण्याचा आतापासून काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून जावू नये यासाठी जलपूनर्भरणाचे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. अन्यथा काही दिवसात भंडारा जिल्ह्यावरही पाणी टंचाईचे संकट घोंगावल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या लेखी पाणी टंचाई नसली तरी अनेक गावात मे महिन्याच्या शेवटी पाणी टंचाई जाणवते. या गावांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची ही गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात