शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

मनुष्य जीवनात सद्गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:33 IST

नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे. आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्य देह दुर्मिळ आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी असे कर्तुत्व करा की, ज्या योगे संसाररुपी भवसागर सहज व आनंदाचे पार करता येईल. प्रपंचातूनही परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती मिळवणे आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरुची गरज आहे, असे प्रवचन श्री संत विदेही वसंतबाबा यांनी नरदेह विवेचन या विषयावर बोलताना केले.

ठळक मुद्देसंत विदेही वसंतबाबा : सावरबंध येथे संत संमेलन व गोपालकाला उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभली : नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे. आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्य देह दुर्मिळ आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी असे कर्तुत्व करा की, ज्या योगे संसाररुपी भवसागर सहज व आनंदाचे पार करता येईल. प्रपंचातूनही परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती मिळवणे आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरुची गरज आहे, असे प्रवचन श्री संत विदेही वसंतबाबा यांनी नरदेह विवेचन या विषयावर बोलताना केले.साकोली तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरबंध येथे श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा आश्रमातर्फे चार दिवसीय संत संमेलन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या संत संमेलनादरम्यान रविवारला संताचे आगमन व सायंकाळी हवनविधी पार पडला. त्यानंतर सोमवारला सूर्योदयी घटस्थापना, ध्वजारोहण, आरती, पुजन, श्री संत विदेही वसंतबाबा यांचे हस्ते करण्यात आले.यानंतर दुपारी संत विदेही वसंतबाबा, सहयोगी विठ्ठलबाबा मेंढे, श्री संत बंडूबाबा खडके यांच्या अमृतवाणीद्वारे हरिपाठ, प्रवचन, आरती प्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. मंगळवारला पहाटे काकड आरती, हरिपाठ नंतर संपूर्ण गावातून भक्तदिंडी काढण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या भक्तांनी संपूर्ण गावातून घोडे, ढोल, ताशे वीण, मृदंग, टाळ यांचा गजरात दिंडी काढली. यावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.यानंतर श्री संत सद्गुरु विदेही वसंतबाबा यांचे नरदेह विवेचन या विषयावर आध्यात्मिक प्रवचन झाले. यावेळी लाखोचा संख्येने असलेले भाविक भक्त भक्तीमय, मंत्रमुग्ध झााले होते. यावेळी गोपालकाल्याचे कीर्तन व संत विदेही मोतीराम बाबा यांची आरती झाली.यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम रात्रीपर्यंत सुरु होता. यात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बुधवारला पहाटेपासून चुलबंद नदीवर जाऊन गंगास्थानाचा लाभ भक्तांनी घेतला. भाविकांच्या दिंडीसोबत जवळपास २ ते ३ किलोमिटर भाविकांच्या रांगा पहावयास मिळाल्या. दुपारी श्री संत यादवराव बाबा खेडीकर, भीमा मातोश्री बेंदवार, शांताबाई इटवले, श्री संत विदेही मोतीराम बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला.यासंत संमेलनाला अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून भाविक मोठ्या श्रध्देने उपस्थित होते. महाप्रसाद सुरळीत चालावा यासाठी सेवाधारी मंडळीची कामगिरी मोलाची ठरली. वरिल चार दिवसीय संत संमेलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली.