शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्य जीवनात सद्गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:33 IST

नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे. आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्य देह दुर्मिळ आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी असे कर्तुत्व करा की, ज्या योगे संसाररुपी भवसागर सहज व आनंदाचे पार करता येईल. प्रपंचातूनही परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती मिळवणे आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरुची गरज आहे, असे प्रवचन श्री संत विदेही वसंतबाबा यांनी नरदेह विवेचन या विषयावर बोलताना केले.

ठळक मुद्देसंत विदेही वसंतबाबा : सावरबंध येथे संत संमेलन व गोपालकाला उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभली : नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे. आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्य देह दुर्मिळ आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी असे कर्तुत्व करा की, ज्या योगे संसाररुपी भवसागर सहज व आनंदाचे पार करता येईल. प्रपंचातूनही परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती मिळवणे आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरुची गरज आहे, असे प्रवचन श्री संत विदेही वसंतबाबा यांनी नरदेह विवेचन या विषयावर बोलताना केले.साकोली तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरबंध येथे श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा आश्रमातर्फे चार दिवसीय संत संमेलन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या संत संमेलनादरम्यान रविवारला संताचे आगमन व सायंकाळी हवनविधी पार पडला. त्यानंतर सोमवारला सूर्योदयी घटस्थापना, ध्वजारोहण, आरती, पुजन, श्री संत विदेही वसंतबाबा यांचे हस्ते करण्यात आले.यानंतर दुपारी संत विदेही वसंतबाबा, सहयोगी विठ्ठलबाबा मेंढे, श्री संत बंडूबाबा खडके यांच्या अमृतवाणीद्वारे हरिपाठ, प्रवचन, आरती प्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. मंगळवारला पहाटे काकड आरती, हरिपाठ नंतर संपूर्ण गावातून भक्तदिंडी काढण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या भक्तांनी संपूर्ण गावातून घोडे, ढोल, ताशे वीण, मृदंग, टाळ यांचा गजरात दिंडी काढली. यावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.यानंतर श्री संत सद्गुरु विदेही वसंतबाबा यांचे नरदेह विवेचन या विषयावर आध्यात्मिक प्रवचन झाले. यावेळी लाखोचा संख्येने असलेले भाविक भक्त भक्तीमय, मंत्रमुग्ध झााले होते. यावेळी गोपालकाल्याचे कीर्तन व संत विदेही मोतीराम बाबा यांची आरती झाली.यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम रात्रीपर्यंत सुरु होता. यात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बुधवारला पहाटेपासून चुलबंद नदीवर जाऊन गंगास्थानाचा लाभ भक्तांनी घेतला. भाविकांच्या दिंडीसोबत जवळपास २ ते ३ किलोमिटर भाविकांच्या रांगा पहावयास मिळाल्या. दुपारी श्री संत यादवराव बाबा खेडीकर, भीमा मातोश्री बेंदवार, शांताबाई इटवले, श्री संत विदेही मोतीराम बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला.यासंत संमेलनाला अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून भाविक मोठ्या श्रध्देने उपस्थित होते. महाप्रसाद सुरळीत चालावा यासाठी सेवाधारी मंडळीची कामगिरी मोलाची ठरली. वरिल चार दिवसीय संत संमेलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली.