शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

घरपोच योजना जिल्ह्यातून गुंडाळणार!

By admin | Updated: January 6, 2016 00:52 IST

घरपोच योजनंतर्गत हमालीचा खर्च हमाल कंत्राटदार वहन करेल, या आदेशाला ठेंगा दाखवित अधिक हमाली देण्यचे कंत्राटदाराने नकार दिला.

हमालांनी पुकारला संप : घरपोच योजनेच्या समस्या कायमराहुल भुतांगे तुमसरघरपोच योजनंतर्गत हमालीचा खर्च हमाल कंत्राटदार वहन करेल, या आदेशाला ठेंगा दाखवित अधिक हमाली देण्यचे कंत्राटदाराने नकार दिला. परिणामी हमाल कामगारांनी परत एकदा कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे ग्रामीण भागात अजुनही धान्य पोहचते झाली नाही. कंत्राटदार अधिकाऱ्यावर भारी ठरत असल्याने हमाली व वाहतुकीचे कंत्राट रद्द करणार असल्याने जिल्ह्यातून योजना गुंडाळणार असेच चिन्ह दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात घरपोच योजनेचा शुभारंभ करण्यात आला परंतू सदर योजनेत योग्य दिशा निर्देश नसल्याने हमाल कामगार व स्वस्त धान्य दुकानदारात संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी हमाल कामगारांनी संप पुकारून काम बंद आंदोलन केले असता हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे पाहून स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हमाल कंत्राटदाराला मिळत असलेल्या हमालीच्या रकमेतून जास्त हमाली देण्यास भाग पाडले होते. हमाल कंत्राटदारानेही नागपूर येथे अधिवेशन असल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निर्देशांचा मान ठेवून होकार दिला. त्यामुळे उशिरा का होईना ग्रामीण भागात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत धान्य पोहचते झाले व वितरितही झाले. मात्र ईकडे हमाल कंत्राटदाराने हमालांना आगावू हमाली दिली नाही. त्यामुळे आणखी हमाल कामगार संप पुकारणार. हे धान्य दुकानदारांना माहित असल्याने त्यांनी अगोदरच अधिकाऱ्यांना निवेदने देवून दुकानदाराच्या समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दुकानदारांची बैठक बोलावून दुकानदारांना आश्वासित केले की हमाली आदी खर्च हा संबंधित कंत्राटदारानेच करावा, असे आदेश काढले होते. परंतू कंत्राटदाराने त्या आदेशाला केराची टोली दाखवित हमालांनी मिळत असलेली हमाली दोन रूपये ३० पैसे पेक्षा जास्त देणारच नाही, असे स्पष्ट सांगून टाकल्याने परत जानेवारी महिन्यात ३ तारखेपासून हमालांनी संप पुकारले. वाहनात धान्य चढविणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वाहनांना खाली परतावे लागले तर आज ५ जानेवारीला वाहतूक कंत्राटदाराने गोडावूनमध्ये वाहने पाठविलेच नाही. परिणामी ७० धान्य दुकानदारांच्या चालान रक्कम भरूनही अजुनपर्यंत ग्रामीण भागात धान्य पोहचते झालेच नसल्याने परत एकदा ग्रामीण जनतेला उपासमारीचा सामा करावा लागणार एवढे मात्र निश्चित.