शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM

मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे. गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. काही ठिकाणी पाण्याअभावी पऱ्हे करपत असल्याचीही बाब उजेडात आली होती. दरम्यान रविवारी बरसलेल्या पावसाने या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले आहे.

ठळक मुद्देरोवणीच्या कामाला सुरुवात : धान खरेदी केंद्रावरील पोती ओली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चातकासारखी पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा रविवारी सुखावला. दुपारी ३ वाजतानंतर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह लाखनी, पालांदूर, साकोली, वरठी, मोहाडी, तुमसर, नाकाडोंगरी, पवनारा, आसगाव, पवनी व लाखांदूरातही पाऊस बरसला. मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे.गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. काही ठिकाणी पाण्याअभावी पऱ्हे करपत असल्याचीही बाब उजेडात आली होती. दरम्यान रविवारी बरसलेल्या पावसाने या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले आहे. मशागतीनंतर पाऊस आवश्यक असून आता चिखलणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. याचवेळी पऱ्ह्यांचे गठ्ठे बांधून रोवणीच्या कामालाही प्रारंभ होणार आहे.वरठी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार गावातील सखल भागात पाणी शिरल्याने अनेक घरामध्ये पाणी साचले होते. घरातील साहित्यही ओले झाले. परंतु रविवारी आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.तुमसर तालुक्यात मेघ गर्जनेसह दमदार पाऊस बरसला. वातावरणात गारवा निर्माण झाला असून पºह्यांना जीवनदान मिळाले आहे. जवळपास एक तास पावसाने हजेरी लावली. सखल भागात पाणी साचले होते. पुन्हा एकदा दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.बळीराजा सुखावलारविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पेरणीनंतर पावसाअभावी पऱ्हे करपत होती. आजच्या पावसाने करपलेल्या पºह्यांना जीवनदान मिळाले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा सुखावला गेला. करडी परिसरात खरीप हंगामांतर्गत पाच हजार ४६४ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची पेरणी पुर्ण झाली असून तूर व तिळ पिकाची लागवडही बांध्यावर करण्यात आली आहे. दरम्यान गत आठवड्याभरात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला होता. परंतु पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवण्या रखडल्या होत्या. कोरडवाहू शेतीचे पऱ्हे रोवणी योग्य झाले असल्याने आजच्या पावसाचा या पºह्यांना फायदा झाला असून नवसंजीवनी मिळाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती