शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

चार वर्षांत घरकुल मिळाले नाही, आता अंगणात पाय ठेवू देणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 22:01 IST

भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढत चालला आहे. मी खर्च करणार नाही, तुम्हांलाच करावा लागणार, अशा अटीही काही संभाव्य उमेदवारांकडून ठेवल्या जात आहेत.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव असूनही अतिक्रमित जागेच्या कारणावरून घरकुलापासून वंचित ठेवले. चार वर्षे अनेकदा विनवण्या केल्या. मतदानावर बहिष्कार टाकला, अधिकाऱ्यांना निवेदन दिली. त्यावेळी अपमानित केले. परंतु गाव नमुना आठवरील अतिक्रमणाची नोंद हटविली नाही. एकाही गावात असा अन्याय झालेला नाही. आता निवडणुका आहेत, त्यांना व त्यांच्या समर्थकांना घराच्या अंगणातही पाय ठेवू देणार नाही, असा इशारावजा आक्रोश ग्रामीण मतदारांत दिसून येत आहे. लोकांची कामे करणाऱ्यांना निवडून देऊ, असे रोखठोकपणे सांगितले जात आहे. जिल्ह्यात ३६३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रशासकराज सुरू आहे. लवकरच उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोमात आहेत. उमेदवार निवडीसाठी गट प्रमुखांनी मोर्चेबांधणी केली असून सामाजिक, कौटुंबिक व जातीय समीकरणावर आधारित जनाधार असलेल्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. अनेक गटांचे वाॅर्डावाॅर्डातील उमेदवार ठरले असले तरी राखीव जागांवरील उमेदवार शोधताना गट प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढत चालला आहे. मी खर्च करणार नाही, तुम्हांलाच करावा लागणार, अशा अटीही काही संभाव्य उमेदवारांकडून ठेवल्या जात आहेत. उमेदवारांच्या शोधासाठी गावप्रमुखांनी अनेक कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मात्र संभाव्य उमेदवार भाव खात असल्याने हिरमोड होत आहे. 

सरपंच पदासाठी गटागटात संघर्षयंदा थेट लोकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गटागटांत संघर्षाचे वातावरण आहे. काहींनी वेगळा गट तयार करून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने त्रिकोणी व चौकाेनी लढाई होणार आहे. त्यातही काही वाॅर्डात जाऊ विरूद्ध जाऊ तर भावाविरूद्ध भाऊ, मित्राविरूद्ध मित्र, असे चित्र दिसणार आहे. काहींनी गावात सरपंच आपल्याच मर्जीतील असावा, यासाठी उमेदवार मिळत नसल्याचे समर्थकांना सांगून इनीलाच मैदानात उतरविण्याचा पराक्रम इवायाकडून होत आहे.

तरुणांसोबत ज्येष्ठ पुढारीही मैदानात- अनेक निवडणुकांत माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगणारे ज्येष्ठ पुढारीही गटातील तरुण उमेदवारांची संधी नाकारून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पटाचा बैल कधी म्हातारा होत नाही, अशी पुष्टीही त्यासाठी जोडली जात आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक