शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

चार वर्षांत घरकुल मिळाले नाही, आता अंगणात पाय ठेवू देणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 22:01 IST

भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढत चालला आहे. मी खर्च करणार नाही, तुम्हांलाच करावा लागणार, अशा अटीही काही संभाव्य उमेदवारांकडून ठेवल्या जात आहेत.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव असूनही अतिक्रमित जागेच्या कारणावरून घरकुलापासून वंचित ठेवले. चार वर्षे अनेकदा विनवण्या केल्या. मतदानावर बहिष्कार टाकला, अधिकाऱ्यांना निवेदन दिली. त्यावेळी अपमानित केले. परंतु गाव नमुना आठवरील अतिक्रमणाची नोंद हटविली नाही. एकाही गावात असा अन्याय झालेला नाही. आता निवडणुका आहेत, त्यांना व त्यांच्या समर्थकांना घराच्या अंगणातही पाय ठेवू देणार नाही, असा इशारावजा आक्रोश ग्रामीण मतदारांत दिसून येत आहे. लोकांची कामे करणाऱ्यांना निवडून देऊ, असे रोखठोकपणे सांगितले जात आहे. जिल्ह्यात ३६३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रशासकराज सुरू आहे. लवकरच उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोमात आहेत. उमेदवार निवडीसाठी गट प्रमुखांनी मोर्चेबांधणी केली असून सामाजिक, कौटुंबिक व जातीय समीकरणावर आधारित जनाधार असलेल्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. अनेक गटांचे वाॅर्डावाॅर्डातील उमेदवार ठरले असले तरी राखीव जागांवरील उमेदवार शोधताना गट प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढत चालला आहे. मी खर्च करणार नाही, तुम्हांलाच करावा लागणार, अशा अटीही काही संभाव्य उमेदवारांकडून ठेवल्या जात आहेत. उमेदवारांच्या शोधासाठी गावप्रमुखांनी अनेक कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मात्र संभाव्य उमेदवार भाव खात असल्याने हिरमोड होत आहे. 

सरपंच पदासाठी गटागटात संघर्षयंदा थेट लोकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गटागटांत संघर्षाचे वातावरण आहे. काहींनी वेगळा गट तयार करून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने त्रिकोणी व चौकाेनी लढाई होणार आहे. त्यातही काही वाॅर्डात जाऊ विरूद्ध जाऊ तर भावाविरूद्ध भाऊ, मित्राविरूद्ध मित्र, असे चित्र दिसणार आहे. काहींनी गावात सरपंच आपल्याच मर्जीतील असावा, यासाठी उमेदवार मिळत नसल्याचे समर्थकांना सांगून इनीलाच मैदानात उतरविण्याचा पराक्रम इवायाकडून होत आहे.

तरुणांसोबत ज्येष्ठ पुढारीही मैदानात- अनेक निवडणुकांत माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगणारे ज्येष्ठ पुढारीही गटातील तरुण उमेदवारांची संधी नाकारून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पटाचा बैल कधी म्हातारा होत नाही, अशी पुष्टीही त्यासाठी जोडली जात आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक