शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

भाजीपाला व बागायतदार शेतकऱ्यांना अच्छे दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे.  जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : असह्य उन्हाळा सुरू आहे. भूजल पातळी खालावलेली आहे. धानाचा शेतकरी संकटात आहे. अशा संकटकाळात बागायती, भाजीपाल्याची शेती शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. गत वर्षभरापासून भाजीपाल्याला अच्छे दिन! दिसत आहेत. वांग्याला प्रति किलो ३० ते ३५ रुपयाचा दर मिळत आहे. एकरामागे शेतकऱ्याला लक्ष रुपयांचा नफा अपेक्षित मिळत आहे.महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे. जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. उर्वरित क्षेत्रात इतर शेत पिके घेतले जातात. मात्र यात जोखीम व खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित नफा पडताना दिसत नाही. भाजीपाल्याची शेती करणारा शेतकरी मात्र समाधानी असून दररोज नगदी आवक कुटुंबाचा उत्साह वाढविणारा ठरत आहे. जमिनीत सर्वच भाजीपाल्याची व बागायती ची पिके घेतले जातात. नगदी पिके समजले जाणारे उत्पन्न निश्चितच शेतकऱ्यांना समाधान देणारी ठरत आहेत. जिल्ह्यातील बागायतदार व भाजीपाला कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दरानंतर समाधान व्यक्त होत आहे.

बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बदल करावा. गत वर्षभराचा अभ्यास केल्यास प्रत्येकच भाजीपाल्यातील भाज्यांनी शेतकऱ्यांना चांगले भाव दिले आहेत. कमी पाण्याची शेती स्वीकारा. भाजीपाल्यासाठी २४ तास बीटीबी सब्जी मंडी सेवेत आहे.  -बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा. धानापेक्षा तरी भाजीपाल्याची शेती परवडणारी आहे. केवळ ४५ दिवसात घरात नगदी आवक सुरू होते. तंत्रशुद्ध नियोजन केल्यास लक्ष रुपये एकराला नफा मिळण्यास अडचण नाही.-दुर्गेश कांबळे, कारले उत्पादक,  खोलमारा मिरची पिकाला योग्य नियोजनाअंती सहजतेने लक्ष रुपये उरतात. एक मिरचीचा तोळा ६० ते ८० हजार रुपयांपर्यंत गेला. कमी पाण्यात अधिक उत्पन्नासाठी भाजीपाल्याची शेती निश्चितच फायद्याची आहे.-अरुण पडोळे, मिरची उत्पादक पालांदूर. माझ्याकडे फळबाग आहे. कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन होतो. एका एकराला लक्ष रुपयापेक्षा अधिक नफा मिळतो.-पराग शांतलवार, शेतकरी  माडगी.  

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या