शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

धान विक्रीअभावी शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : धान खरेदी करण्याची मागणी, शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शासन, प्रशासन शेतकऱ्यांच्या धान खरेदी संदर्भात नानाविध उपाययोजना केल्याचा दावा करीत असले तरी अद्यापही स्थिती याउलट आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून धान खरेदीला प्रांरभ करण्यात आला. मात्र खरेदी केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. जिल्ह्यातील अनेक केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगाचरांगा धान खरेदीसाठी लागल्या होत्या. आपला नंबर लागावा म्हणून चपलांचे टोकन ठेवले जात होते. शेतकऱ्यांचा आक्रोश बघता पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी धान खरेदी केंद्रावर असलेल्या अडचणी दुर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र आजही बहूतांश शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून आहे.लाखनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान आधारभुत धान खरेदी केंद्रावर अद्यापही पडून आहे. धान खरेदीपुर्णपणे झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनाद्वारे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले यांनी निवेदन देवुन धान खरेदी १८ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर धानाचे पैसे जमा करो. तसेच ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस १५ एप्रिलपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याबाबत वारंवार जनप्रतिनिधीशी व शासकीय यंत्रणेशी बोलुन सुध्दा शेतकºयांच्या बाबतीत सत्ताधारी विरोधी पक्ष पुर्णपणे बेभरोश्याचे राजकारण करीत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, असे निवेदनात संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले, सुधाकर हटवार, संजय रामटेके यांनी केले आहे.धानाचे चुकारे अदा करण्याची मागणीभंडारा जिल्ह्यात यावर्षी आधारभूत खरेदी केंद्रावर जवळपास २१ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला जिल्ह्यात प्रारंभ झाला. सुरुवातीला ६३ केंद्रावर खरेदी सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत पणन महासंघाच्या ८४ खरेदी केंद्रावर धान घेतला जात आहे. अनेक शेतकºयांचा धान आजही आधारभूत केंद्रावर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीपासूनच धान खरेदीत अनंत अडचणी आल्या. त्यातील पहिली महत्वाची अडचण म्हणजे गोदामाचा अभाव. तांदळाची उचल वेळेवर होत नसल्याने आजही गोदाम हाऊसफुल्ल आहेत. अनेक केंद्रावरील खरेदी महिनाभर बंद होती. बारदान्याची समस्याही कायमस्वरुपी दिसत होती. आता धान विक्रीसाठी अत्यल्प वेळ असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात धान घेऊन केंद्रावर पोहचत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक