शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांनंतरही केवळ ८ कि.मी. ची मुख्य वितरिका

By admin | Updated: August 24, 2016 00:13 IST

शेतकऱ्यांसाठी हरितक्रांतीचे स्वप्न बनलेल्या नेरला उपसा सिंचन योजनेचे १४ वर्षानंतरही काम संथगतीने सुरु आहे.

विशाल रणदिवे अड्याळशेतकऱ्यांसाठी हरितक्रांतीचे स्वप्न बनलेल्या नेरला उपसा सिंचन योजनेचे १४ वर्षानंतरही काम संथगतीने सुरु आहे. १४ वर्षात येथील मुख्य वितरण नलिकेचे केवळ ८ कि.मी. चे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसराचे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अजूनही धुसर आहे. या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी तीन पंपांची चाचणी सुरु झाली आहे. सन २००२ पासून नेरला उपसा सिंचन योजनेचे काम सुरु आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या सिंचन प्रकल्पातून परिसरातील २१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रातील शेती ओलीताखाली येणार आहे. मात्र गेल्या १४ वर्षापासून या सिंचन प्रकल्पासाठी ४३.८०० कि.मी. ची मुख्य वितरण नलिका तयार करणे गरजेचे होते. मात्र काम संथगतीने सुरु असल्याने आतापर्यंत केवळ ८ कि.मी. ची मुख्य वितरण नलिका तयार झाली आहे. या ८ कि.मी. च्या अंतरात ५ हजार हेक्टर शेती ओलीताखाली यायला हवी. मात्र सध्या सुरु असलेल्या चाचणीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने ८०० हेक्टर शेतीलाच याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न आणखी किती दिवस लांबणार यावर शेतकरी चातकासारखी वाट बघण्यात दिवस काढत आहेत.नेरला उपसा सिंचन योजनेसाठी नेरलासह परिसरातील गावातील शेतीचे भूसंपादन शासनाने केले आहे. नेरला गावाला या सिंचन योजनेचा मोठा फटका बसला असून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी अद्यापही शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करून ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरवाव्या अशी मागणी नेरला येथील सरपंच अनिल कोदामे यांनी केली आहे. शेतकऱ्यासाठी महत्वाकांक्षी ठरणाऱ्या या नेरला सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीने असले तरी मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प त्वरीत सुरु करण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी रेटून धरली. त्यामुळे या सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन करण्याच्या हालचाली आता सुरु झालेल्या आहेत. तत्पूर्वी सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी योग्य आहे किंवा नाही यासाठी संबंधित विभागाकडून १५ पंपांपैकी ३ पंपांमधून चाचणी सुरु केलेली आहे. या चाचणीच्या माध्यमातून सोडण्यात येणारे पाणी ८ कि.मी. पर्यंत बनविण्यात आलेल्या मुख्य वितरण नलीकेपर्यंत पोहचत आहे. त्यामुळेच या नलिकेच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल १४ वर्षानंतर काही दिवसांसाठी असेना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी समाधानी असले तरी अनेकांना या पाण्यापासून अद्यापही वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. दरम्यान खासदार नाना पटोले यांनी नेरला उपसा सिंचन योजनेला भेट दिली. यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. येथील अधिकाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून रात्रंदिवस काम करून सिंचन योजना त्वरीत सुरु होण्याच्या बाबतीत मोलाचे कार्य केले आहे. शाखा कालव्यांचे काम रखडलेनेरला उपसा सिंचन योजनेची मुख्य नलिका ४३.८०० कि.मी. ची आहे. त्यापैकी केवळ ८ कि.मी. ची मुख्य नलिका तयार करण्यात आली आहे. यासोबतच सदर पाणी शाखा कालव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पोहचणार आहे. मात्र शाखा कालव्यांचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे शाखा कालवे सिंचनासाठी अडसर ठरले आहे.नेरला गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू. ग्रामस्थांच्या सर्व समस्या लवकर शासन स्तरावरून सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ. - नाना पटोले, खासदार. या प्रकल्पामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेतजमिनीला फायदा होईल. १२ पंपापैकी ३ पंपांची चाचणी सुरु आहे. शाखा कालव्यांचे काम वर्षभरात पूर्ण करू.- एच.बी. मेंढे, कार्यकारी अभियंता, नेरला सिंचन.