शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:12 IST

परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थी ट्रॅक्टरहून कोसळला. यात तो चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच करूण अंत झाला. चेतन विनायक जवंजाळ रा.मिरेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारला किटाडी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात तणाव असून मुख्याध्यापक, शाळेचे संचालक व ट्रॅक्टर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकिटाडी येथील घटना : गावात तणाव, रात्री उशिरापर्यंत निघाला नाही तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थी ट्रॅक्टरहून कोसळला. यात तो चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच करूण अंत झाला. चेतन विनायक जवंजाळ रा.मिरेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारला किटाडी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात तणाव असून मुख्याध्यापक, शाळेचे संचालक व ट्रॅक्टर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आले.माहितीनुसार, चेतन हा मिरेगाव येथील शुक्राचार्य विद्यालयाचा इयत्ता नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. मंगळवारला शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे चेतन शाळेत गेला होता. बारावी व दहावीचे परीक्षा केंद्र मुंडीपार येथे असल्याने शाळेच्या शिक्षकांनी ट्रॅक्टरद्वारे डेक्स बेंच पाठविण्याचे ठरविले. सदर साहित्य पोहचवून देऊन उतरविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मुंडीपार येथील शाळेत साहित्य उतरवून ट्रॅक्टरद्वारे परत येत असताना किटाडी येथे अचानक चेतना हा ट्रॅक्टर चालकाजवळील जागेहून खाली कोसळला. यात ट्रॅक्टरच्या चाकात सापडल्याने त्याचा जागीच दबून करुण अंत झाला. घटनेची माहिती गावात होताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. जोपर्यंत मिरेगाव येथील मुख्याध्यापक व संचालक घटनास्थळी येऊन जाहीर माफी मागीत नाही व त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.साकोली पोलीस ठाण्यात मृतक विद्यार्थ्याचे कुटुंबिय, आमदार बाळा काशीवार, शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, पोलीस निरीक्षक, पद्माकर बावनकर, लवकुश निर्वाण यांच्यात चर्चा झाली. मात्र चर्चेदरम्यान कुठलाच तोडगा निघाला नाही. परिणामी जवंजाळ कुटुंबिय घटनास्थळी आले. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, तहसीलदार अरविंद हिंगे यांनी भेट दिली. विद्यार्थ्याचा मृतदेह रस्त्याशेजारी एका घराजवळ ठेवण्यात आला होता. पाहता पाहता नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनीही तात्काळ बंदोबस्त लावला. आंदोलकांनी सायंकाळपर्यंत मृतक कुटुंबाला १० लक्ष रुपयांची मदत करावी अशी मागणी केली. आंदोलकांनी केलेल्या मागण्यांवर शेवटपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कठोर भूमिका घेत कुटुंबिय व आंदोलकांशी चर्चा करीत न्याय्य मागण्यांसाठी न्यायालयात दाद मागावी अशी सूचना करीत विद्यार्थ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.पोलिसांनी या प्रकरणी अपघातात एक जण ठार नोंद केली असल्याची माहिती आहे.मंगळवारला शाळेला सुटी होती. त्यामुळे मुलांना साहित्य पोहचवून देण्यासाठी ट्रॅक्टरवर मी पाठविलेले नाही. डेक्स व बेंच शाळेच्या कर्मचाऱ्यांना पोहचवायला सांगितले होते.-सारंग गजापुरे, मुख्याध्यापक, शुक्राचार्य विद्यालय, मिरेगाव.