शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर अतिक्रमण धारकांनी सोडले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

लाखांदूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन गत कित्येक वर्षापासून निवासी सोयीने राहणा-या कुटुंबांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ ...

लाखांदूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन गत कित्येक वर्षापासून निवासी सोयीने राहणा-या कुटुंबांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते मात्र सदर उपोषणाची दखल घेत येथील तहसीलदार अखिलभारत मेश्राम, बीडीओ गजानन अगर्ते, सरपंच, ग्रामसेवक व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय स्तरावर उपोषणकर्त्यांच्या मागणीच दखल घेतली जाणार या लेखी आश्वासनानंतर अतिक्रमण धारकांनी उपोषण सोडले आहे. सदरचे उपोषण १४ सप्टेंबर रोजी सोडण्यात आले आहे.

लाखांदूर तालुक्यातील सरांडी(बू) येथील काही कुटुंबांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन झोपड्यांचे बांधकाम करीत निवासी सोयीने कुटुंबांसह राहत आहेत. सदर झोपड्यांचे स्थानिक ग्रामपंचायतकडून घर कर देखील वसूल केला जात आहे. त्यानुसार येथील काही अतिक्रमण धारक कुटुंबांनी शासनाकडे घरकूल योजनेच्या लाभाची मागणी देखील केली आहे. सदर मागणीनुसार या गावातील काही कुटुंबांना शासनाकडून घरकूल योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र घर बांधकामासाठी उपलब्ध अतिक्रमित जागेच्या ग्रामपंचायतीच्या नमुना ८ अभिलेखात मालक म्हणून सरकार नोंद असल्याने घरकूल योजनेच्या लाभापासून अनेक कुटुंब वंचित ठरल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला होता. दरम्यान, गत कित्येक वर्षापासून अतिक्रमित जागेवरील झोपडीत निवासी वास्तव्याने राहत असताना ग्रामपंचायतीच्या नमुना ८ अभिलेखात सरकार नोंद करण्यात आल्याने घरकूल योजनेचा लाभ दिला जात नसल्याने घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी नमुना ८ मध्ये अतिक्रमणकर्त्यांच्या नावाची नोंद करण्याच्या मागणीला घेऊन लाखांदूर तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.

उपोषणाची दखल घेत स्थानिक लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम, बीडीओ गजानन अगर्ते, विस्तार अधिकारी गडमडे, ग्रामसेवक सेलोकर, सरपंच बावणे आदी अधिकारी पदाधिकाऱ्यांद्वारे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आवश्यक कार्यवाही केल्या जाण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांद्वारे १४ सप्टेंबर रोजी उपोषण सोडण्यात आले. या उपोषणकर्त्यांमध्ये तालुक्यातील सरांडी(बू) येथील ग्रामपंचायत सदस्य रवी शहारे, श्रावण शहारे, दशरथ कवासे, प्रल्हाद मिसार, काशीराम भोपे, सुनीता घोरमडे, कैलास दिवठे, श्रीराम आठवले, गोपाल मिसार, ईश्वर मेश्राम यांच्या सह अन्य ४० महिला, पुरुष, नागरिकांचा समावेश होता.

140921\img20210914140930.jpg

लेखी आश्वासनानंतर ऊपोषण सोडण्यात आले ते क्षण