शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आप्तेष्टांच्या आक्रोशाने हादरली स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:58 IST

कुंभलीजवळील अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह मंगळवारी सासरा आणि सानगडी गावात पोहचले. मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्टांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही अक्षरश: हादरली. पाच मृतदेहाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या होत्या.

ठळक मुद्देसासरा व सानगडीत अंत्यसंस्कार : काळीपिवळीच्या अपघातात हिरावले सर्वस्व

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कुंभलीजवळील अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह मंगळवारी सासरा आणि सानगडी गावात पोहचले. मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्टांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही अक्षरश: हादरली. पाच मृतदेहाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या होत्या. लगतच्या दोन गावातील पाच जणांचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. गावात कुणाच्याही घरची चूल पेटली नाही. कुटुुंबीय तर अपघाताच्या धक्क्यातून अद्यापही सावरले नाहीत.उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवित साकोली येथे प्रवेशासाठी गेलेल्या चार विद्यार्थिनींसह सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला. काळ बनून आलेली भरधाव काळीपिवळी चुलबंद नदीत कोसळली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सानगडी येथील शीतल सुरेश राऊत आणि अश्विनी सुरेश राऊत या सख्ख्या बहिणी. शीतल सानगडीच्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून नुकतीच बारावी पास झाली. तिला ५४ टक्के मार्क मिळाले. साकोली येथे प्रवेशासाठी आपली मोठी बहिण अश्विनीसोबत ती आली होती. अश्विनी साकोलीतच बीए अंतीम वर्षाला शिकत होती. तर पायल ही सर्वात मोठी बहिण बीएससीच्या अंतिम वर्षाला आहे. तिनही बहिणी उच्चशिक्षण घेऊन आईवडीलांचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या दोन्ही बहिणीला काळाने हिरावून नेले. सुरेश राऊत हे अर्जुनी मोरगाव येथे वनमजूर म्हणून कामाला आहेत. त्यांना तीन मुली आहेत. शीतल आणि अश्विनीचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री १२.३० वाजता या दोघींचे मृतदेह घरी आणले, तेव्हा आईवडीलांचा आक्रोश आसमंत भेदून टाकत होता.सासरा येथील शिल्पा श्रीरंग कावळे ही बीएससी अंतिम वर्षाची विद्यार्थी. तिची लहान बहिण डिंपल बारावीत ५५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. बहिणीच्या प्रवेशासाठी त्या दोघी साकोली आल्या होत्या. मात्र अपघातात शिल्पा ठार तर डिंपल गंभीर जखमी झाली. आईवडीलांना या दोनच मुली आहेत. वडील कपडे इस्त्री करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. सानगडी येथील सुरेखा देवाजी कुंभरे ही अत्यंत विपरीत परिस्थितीत शिक्षण घेत बारावी पास झाली होती. उच्च शिक्षण घेण्याच्या इच्छेतून तीे साकोली येथे प्रवेशासाठी आली होती. मात्र तिच्यावरही काळाने झडप घातली. सुरेखाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून लहान भाऊ नवव्या वर्गात शिकत आहेत. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढतात. या चारही विद्यार्थिनींचे मृतदेह गावात आले तेव्हा अख्खा गाव घरासमोर एकत्र झाला होता. आक्रोश, हुंदके आणि अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्धचा संताप दिसून येत होता. कुणाच्याही घरची चुल पेटली नाही.अपघातात ठार झालेली अक्षिता उर्फ गुनगुन हितेशराव पालांदूरकर ही मुळची नागपुरची. आठव्या वर्गात शिकणाºया गुनगुनची आई निता गोंदिया पोलीस दलात शिपाई आहे. आपल्या दोन मुलींसह ती चिखला येथे वडील खेमराज कुकडे यांच्याकडे पाहुणपणासाठी जात होती. मात्र आईचा हात धरून बसलेल्या गुनगुनला बेसावध क्षणी काळाने हिरावून नेले.अंत्यसंस्काराहून शारदा परतत होती घरीकुंभलीजवळ झालेल्या अपघातात सानगडी येथील शारदा गजानन गोटेफोडे ही महिला ठार झाली. भंडारा येथे राहणारा तिच्या बहिणजावयाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ती भंडारात आली होती. अंत्यसंस्कार आटोपून गावी परत जात असताना तिच्यावर काळाने झडप घातली. दोन महिन्यापूर्वीच तिच्या मुलाचे लग्न झाले होते.काळीपिवळी चालकाला अटकपुलावरून कोसळलेली काळीपिवळी जीप दीक्षांत उर्फ गोलू अनिल शहारे (२४) रा.दिघोरी मोठी ता.लाखांदूर हा चालवित होता. पुलावर त्याचे नियंत्रण गेले आणि जीप चुलबंद नदीत कोसळली. त्याच वेळी दीक्षांतने उडी मारून आपला जीव वाचविला. अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी तो घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर दिघोरी पोलीस ठाण्यात त्याने आत्मसमर्पण केले. सदर जीप दिघोरी येथीलच अनिता बंडू हटवार यांच्या मालकीची आहे.

टॅग्स :Accidentअपघात