शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण ...

भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण आढळत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची संकेत देणारी आहेत. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या परीने सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी नागरिकांनीही आपले कर्तव्य ओळखून प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्ष व खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे. रविवारी आयोिजत पत्रकार परीषदेत ते बोलत होते. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आणि नियमांचे पालन करणे हेच उपाय प्रभावी ठरू शकतात, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. उल्हास फडके उपस्थित होते.

सध्याच्या घडीला विदर्भात नागपूर नंतर भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्ण संख्या ही विक्रमी वाढली आहे. आठशेचा आकडा पार केल्याने आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच रुग्ण संख्या रोज वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन त्याचे विपरीत परिणाम रुग्णांना भोगावे लागू शकतात. वाढती रुग्ण संख्या ही ‘कम्युनिटी स्प्रेड’ चे संकेत असू शकतात. त्यामुळे आता प्रत्येकाला काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाला सहकार्य करण्याची वेळ आली आहे.

ही रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास एका ठिकाणी प्रशासनही हतबल होण्याची शक्यता आहे. ही वेळ येऊ नये म्हणून आत्ताच नागरिकांनी सावध व्हावे. अनावश्यक आणि महत्त्वाची कामे नसतील तर घराबाहेर पडू नये. पान टपरी, चहाची दुकाने अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून कोरोना घरोघरी पोहोचण्याची शक्यता आहे.

बॉक्स

लसीकरण महत्वाचे

एकीकडे काळजी घेताना दुसरीकडे लसीकरण सुद्धा महत्त्वाचे आहे. वयाची ४५ वर्ष पूर्ण केलेल्या सर्वांनी लस टोचून घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून खाजगी रुग्णालयात पर्यंत सर्व ठिकाणी लसीकरण केंद्र शासनाने सुरू केली आहेत. मनात कोणतीही भीती न ठेवता. लस टोचून घेणे या संसर्गाची लढण्यासाठी स्वतःला तयार करावे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे. लसीकरण केंद्रावर यंत्र कसे जाता येईल, याची व्यवस्था लावून देत जास्तीत जास्त लसीकरण होईल असा प्रयत्न करावा, असेही खा.मेंढे म्हणाले.

बॉक्स

पात्र व्यक्तींनी रक्तदान करावे

तसेच दुसऱ्या लसिकरनानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नसल्याने व सध्या उन्हाळा ऋतू सुरु असल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून खा.सुनील मेंढे यांनी युवा वर्ग व पात्र व्यक्तींनी स्वइच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन सुद्धा याप्रसंगी केले.