शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: November 29, 2014 00:40 IST

सहा महिन्यांपूर्वी केंद्रात आणि एक महिन्यापूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.

भंडारा : सहा महिन्यांपूर्वी केंद्रात आणि एक महिन्यापूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. तोंडाला पाने पुसणाऱ्या या सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी मोर्चाचे संयोजक तथा माजी मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जीया पटेल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे उपस्थित होते. यावेळी आ.वडेट्टीवार आणि नितीन राऊत म्हणाले की, सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती आहे. यात शेतकरी होरपळून निघत आहे. मागील तीन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. दोन वर्षात आघाडी सरकारने शेतकऱ्यांना १० हजार २०० कोटी रुपयांची मदत दिली. मात्र आताचे केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतानांही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तोकड्या मदतीची मागणी केंद्राकडे केली आहे. मागीलवर्षी शेतकऱ्यांच्या धानाला आघाडीच्या सरकारने प्रतिक्विंटल १५० रुपये भाववाढ दिली होती. याशिवाय २०० रुपये प्रतिक्विंटल बोनसही दिला होता. मात्र यावेळी भाजप सरकारने बोनस तर दूर, धानाला अवघी ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांबाबत किती संवेदनाशुन्य आहेत याचा परिचय दिला आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. मागीलवर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारवर तोंडसुख घेणारे भाजपचे मंत्री एकनाथ खडसे आता सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. एलबीटी रद्द होऊ शकत नाहीआघाडी सरकारने सुरु केलेल्या एलबीटीला ‘लुटो-बाटो’ म्हणणारे आता सत्तेत आले आहेत, त्यांनी हा कर रद्द करण्याची गरज आहे. परंतु या मुद्यावर रान पेटवून आणि व्यापाऱ्यांची सहानुभूती मिळवून निवडून येताच ते व्यापाऱ्यांची फसवणूक करु लागले आहेत. एलबीटीला पर्याय जीएसटी सुरु करायचा असला तरी २०१६ पर्यंत हा एलबीटी रद्दच होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. बहुमतात नसलेल्या या सरकारविरुद्ध पहिल्याच दिवशी जाब विचारणार आहोत.१ डिसेंबरपासून सुरु होणार निदर्शने, रास्ता रोको८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर निघणाऱ्या मोर्चाच्या आधी १ डिसेंबरला सर्व तालुकास्थळी सरकारच्या उदासीनविरूद्ध निदर्शने करून तहसीलदारांना निवेदने दिली जातील. त्यानंतर ४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. नागपूरच्या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी काँग्रेस नेत्यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)