शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:01 IST

नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयुवाशक्ती संघटना : नाग नदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. नागनदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवून वैनगंगा नदी प्रदूषित होण्यापासून वाचवा अशी मागणी करण्यात आली.नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नाग, कन्हान नदीद्वारे आंभोरा येथे अन्य चार नद्यांसह वैनगंगा नदीला मिळते. नागनदीमध्ये शहरातील सांडपाणी, कारखान्यातील रसायनयुक्त पाणी येते. तेच पाणी वैनगंगा नदीत मिसळते. नागपूर शहरातून दररोज ४२० दशलक्ष लिटर प्रतीदिन सोडले जाते. त्यापैकी नागपूर शहराजवळील भांडेवाडी येथे ८० दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते तर उर्वरीत पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. नागनदीचे पाणी पूर्णपणे काळ्या रंगाचे असून त्याची दुर्गंधी येते. त्यामुळे वैनगंगा नदी प्रदूषित होत आहे. गोसेखुर्द धरणात २००९ पासून पाणी संचय सुरु आहे. नागनदीचे पाणी येथे थोपवून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.प्रदूषित नागनदी मिश्रीत वैनगंगा नदीच्या पाण्यात विषारी घटकांचे प्रमाण वाढले असून गोसीखुर्द धरणातील पाण्यातील आॅक्सीजनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांनाही विविध आजार जडत आहेत. या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पवनी येथे वैनगंगा नदीपात्रात देवराज बावनकर यांच्या नेतृत्वात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देवराज बावनकर, प्रशांत मोहनकर, दीपक बावनकर, सुनील हटवार, जयपाल वंजारी, मच्छींद्र हटवार, लिलाधर काटेखाये, योगेश बावनकर, गोपाल काटेखाये, सोनू समरीत, भगवान शेंडे, उमेश मोहरकर, लतीराज वाघमारे, मंगला बावनकर, भाग्यश्री येलमुले, आकाश हटवार, राहुल नंदनवार, अंकोश सावरकर, रवींद्र जांभोरकर, अभय लांजेवार, रुपलता वंजारी, कीर्ती काटेखाये, रेखा नागपुरे, लिना बावनकर आदी सहभागी झाले होते.पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदननागपूर शहरातून येणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात उपाययोजना करावी यासाठी युवाशक्ती संघटनेने अर्धदफन आंदोलन केल्यानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना तहसील प्रशासनामार्फत निवेदन पाठविले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :riverनदी