शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सापळा लावला रानडुकरांसाठी अन् नाहक जीव गेला वाघाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 11:43 IST

शेतकऱ्याने दिली कबुली : शनिवारपर्यंत कोठडी

तुमसर (भंडारा) : खंदाड येथील वाघाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरील पडदा आता दूर झाला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात वाघ मरून पडलेला होता, त्याच शेतकऱ्याने रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात अडकून या वाघाचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शेतकरी रतनलाला वाघमारे याने तशी कबुली दिली असून, त्याला १९ ऑगस्टपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

खंदाड या गावातील रतनलाला वाघमारे याच्या धानाच्या शेतात वाघाचे शव कुजलेल्या अवस्थेत आणि झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेले आढळले होते. वनविभागाचा संशय बळावल्याने पथकाने शेतकऱ्याच्या घराची झडती घेतली असता तार आणि खांब आढळले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, रानडुकरांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आपणच विजेचा सापळा लावला होता. मात्र, त्यात वाघाचा मृत्यू झाला.

वाघ मारण्याचा आपला जराही हेतू नव्हता, अशी कबुली त्याने दिली आहे. यावरून वन अधिकाऱ्यांनी वनकलम भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, ५१, ५७ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयापुढे हजर केले. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत काय, याच्या तपासाठी वन कोठडीची मागणी केली असता त्याला १९ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी पुन्हा आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले यांनी वर्तविली आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे विजेचा प्रवाह शेतकरी शेताभोवती सोडतात, यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

शेतकरी प्रचंड तणावात

शेतामधील सापळ्यात मागील गुरुवारी वाघ अडकून मृत झाला. ही घटना लक्षात आल्यापासून शेतकरी रतनलाला वाघमारे प्रचंड तणावात होता, अशी माहिती पुढे आली आहे. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्याने झाडाच्या फांद्यांनी शव झाकून ठेवले. विशेष म्हणजे, वाघाचे सर्व अवयव शाबूत होते, यावरून अवयवासाठी वाघाची शिकार झाल्याची शक्यता प्राथमिक तपासात पुढे आलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTigerवाघDeathमृत्यूFarmerशेतकरीbhandara-acभंडारा