शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सापळा लावला रानडुकरांसाठी अन् नाहक जीव गेला वाघाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 11:43 IST

शेतकऱ्याने दिली कबुली : शनिवारपर्यंत कोठडी

तुमसर (भंडारा) : खंदाड येथील वाघाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरील पडदा आता दूर झाला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात वाघ मरून पडलेला होता, त्याच शेतकऱ्याने रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात अडकून या वाघाचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शेतकरी रतनलाला वाघमारे याने तशी कबुली दिली असून, त्याला १९ ऑगस्टपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

खंदाड या गावातील रतनलाला वाघमारे याच्या धानाच्या शेतात वाघाचे शव कुजलेल्या अवस्थेत आणि झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेले आढळले होते. वनविभागाचा संशय बळावल्याने पथकाने शेतकऱ्याच्या घराची झडती घेतली असता तार आणि खांब आढळले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, रानडुकरांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आपणच विजेचा सापळा लावला होता. मात्र, त्यात वाघाचा मृत्यू झाला.

वाघ मारण्याचा आपला जराही हेतू नव्हता, अशी कबुली त्याने दिली आहे. यावरून वन अधिकाऱ्यांनी वनकलम भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, ५१, ५७ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयापुढे हजर केले. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत काय, याच्या तपासाठी वन कोठडीची मागणी केली असता त्याला १९ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी पुन्हा आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले यांनी वर्तविली आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे विजेचा प्रवाह शेतकरी शेताभोवती सोडतात, यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

शेतकरी प्रचंड तणावात

शेतामधील सापळ्यात मागील गुरुवारी वाघ अडकून मृत झाला. ही घटना लक्षात आल्यापासून शेतकरी रतनलाला वाघमारे प्रचंड तणावात होता, अशी माहिती पुढे आली आहे. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्याने झाडाच्या फांद्यांनी शव झाकून ठेवले. विशेष म्हणजे, वाघाचे सर्व अवयव शाबूत होते, यावरून अवयवासाठी वाघाची शिकार झाल्याची शक्यता प्राथमिक तपासात पुढे आलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTigerवाघDeathमृत्यूFarmerशेतकरीbhandara-acभंडारा