शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

४१,८७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी

By admin | Published: June 13, 2017 12:14 AM

राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देण्यात आली.

२१३ कोटींचे कर्ज होणार माफ : ‘डेडलाईन’साठी पाठपुरावा महत्त्वाचाइंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. यात जिल्ह्यातील जवळपास ४१ हजार ८७४ कर्जबाजारी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहेत. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे एकूण २१२ कोटी ९५ लक्ष ४० हजार रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी २६ जुलैची "डेडलाईन" देण्यात आली आहे. शेतकरी संपावर गेल्यानंतर जिल्ह्यातही याचे पडसाद पहायला मिळाले. राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर मंगळवारी किसान संघातर्फे आयोजित धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.माहितीनुसार, जिल्ह्यात राष्ट्रीयकृत (नॅशनल) बँकांचे ११ हजार ६८९ शेतकरी सभासद आहेत. यात शेतकऱ्यांवर १५ कोटी २६ लक्ष २८ हजार रूपयांचे कर्ज आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्वात जास्त सभासद (शेतकरी) असून त्यांची संख्या २९ हजार ९६५ इतकी आहे. यात १८५ कोटी ६९ लक्ष रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांवर आहे. तसेच भूविकास बँकेमार्फत २२० शेतकरी सभासदांनी १२ कोटी १४ लक्ष १२ हजार रूपये कर्जाची उचल केली आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून अल्पभूधारक व बहुधारक खातेधारकांची मािहती ठेवली आहे. शेतकरी संपावर गेल्यामुळे शासनाने उशिरा का असेना सरसकट कर्जमाफीला हिरवी झेंडी दिली. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारीत आहेत. धानपिकाची शेती परवडणारी नसली तरी बळीराजा निसर्गाच्या भरोश्यावर शेतात राबराब राबतो. परंतू ऐनवेळी निसर्गाची अवकृपा व सिंचन सुविधांच्या अभावी बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येते. कर्जाची परतफेड करायची तरी कशी हा यक्षप्रश्न बळीराजाला सतत खुणावत असतो.हा ऐतिहासिक निर्णय- नाना पटोलेराज्य शासनाने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. या धडाडीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे. परंतू खऱ्या अर्थाने कर्जमुक्तीची अंमलबजावणी झाल्यास ते स्वागतार्ह आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रीया खासदार नाना पटोले यांनी दिली. सोमवारी दुपारी ३ वाजता आयोजित वार्ताहर परिषदेत त बोलत होते. खा. पटोले म्हणाले, नागपूर विभागात भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक म्हणजेच ६५ टक्के कर्जवाटप केले आहे. गोसीखुर्द धरणस्थळी २४ मेगॉवॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येईल. पांडे महालाबाबतच्या प्रकरणात १४ जूनला दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पक्षांचे म्हणने ऐकूण घेण्यााठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. यात औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे अधीक्षकांनाही पाचारण करण्यात आले आहे.