शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

२२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार

By admin | Updated: April 30, 2017 00:22 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.

नाना पटोले : विद्युत व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार कटीबद्धभंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. विद्युत व्यवस्थेचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. कमी-अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतो. यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणे बंद पडत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या मध्यभागी साकोली किंवा सौंदड येथे २२० केव्हीचे उपकेंद्र बनविण्यात येणार असून याकरीता ३० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आल्याचे खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे उपस्थित होते. यावेळी खा.नाना पटोले म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्ट्रक्चर ऊभारले जाणार आहे. यासाठी महावितरणच्या दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. पुढील ५० वर्षात नागरिकांना वीज पुरवठ्यसंदर्भात कोणतीही अडचण येऊ नये याकरीता केंद्र सरकारच्या दीनदयाल उपाध्याय विद्युत बळकटीकरण योजनेंतर्गत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४,५०० कोटीची कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.वादळ, वारा, पावसामुळे विद्युत खांबावरील वीज तारांच्या एकमेकांचा स्पर्श होवून वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्याकरीता भंडारा, तुमसर व पवनी येथील भूमिगत वीज तारांचे जाळे पसरविण्यात येणार असून उर्वरीत शहरांचा यात समावेश करण्यात येणार आहे. आयपीडीसी योजनेंतर्गत निवडक कार्यालयामध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून तो प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करून वीज बचतीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषि पंपाची मागणी असून मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व कृषिपंपाच्या जोडण्या पूर्ण झाल्याचे सांगत कृषी पंपाची थकबाकी ८० कोटीच्या जवळपास असल्याचे सांगितले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची शेती होत असून या पिकाला पाण्याची आवश्यकता असते. शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्याने पाण्याची पातळी खालावल्याने आज जिल्ह्यातील ४० गावे रेड झोनमध्ये असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)