शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
6
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
7
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
8
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
9
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
10
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
11
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
12
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
13
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
14
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
15
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
16
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
17
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
18
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
19
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
20
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

१५ टक्के लागवडक्षेत्र पडित

By admin | Updated: September 17, 2016 00:58 IST

मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे.

पाऊस आला तरीही निराशाच : सरासरी ६९ टक्के पाऊस
भंडारा : मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे. पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या बळीराजावर वरूणराजा प्रसन्न होवून शेतातील धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. परंतु दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेची तग धरू न शकणाऱ्या जवळपास १५ टक्के धानक्षेत्रातील जमीन रोवणीअभावी पडीत राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी पाऊस बरसला पण...त्याचा मेलेल्या धनाच्या पेंढींना उपयोग काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाच्या भरवश्यावर उत्पादन अधिक होईल, अशी आशा होती. मात्र पावसाने सुरूवातीला व मध्यांतरी असा दोनवेळा दगा दिला. पोळ्यापूर्वी बरसणारा वरूणराजा गणेशोत्सवात बरसला.
धानपिकाला संजीवनी मिळाली. पावसाच्या अपेक्षेत रखडलेलेली रोवणी शेवटपर्यंत झाली नाही. जमिनीला भेगा पडल्या. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण पाऊस बरसला नाही. पंधरा दिवसांपूर्वी जी स्थिती होती, त्यात काही बदल झाला असला तरी गरजेच्या वेळी पाऊस न बसरल्याने रोवणीच्या प्रतीक्षेत असलेली रोपे कोमेजून नष्ट झाली. याचे प्रमाण किती याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
धान्य उत्पादनावर किती परिणाम होईल ही बाब येणारी वेळ ठरविणार असली तरी, सध्या तरी बळीराजाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वषापुर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत होता. मागील आठवड्यात ही चिंता वरूणराजाच्या आगमनाने दुर झाली होती. आता पावसाने पुन्हा पाठ फिरविली काय? अशी स्थिती आहे. पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरीवर्ग सापडलेला आहे.
यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. (प्रतिनिधी)