शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे १११ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी ...

ठळक मुद्दे१९ लाख क्विंटल धान खरेदी : केंद्र वाढवूनही सुविधांची वानवा कायम

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामांतर्गत ८५ धान खरेदी केंद्र सुरु असून शेतकऱ्यांचे १११ कोटी ५९ लक्ष रुपयांचे चुकारे थकीत आहे. परिणामी बळीराजाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
पावसाच्या उशिरा आगमनानंतर धानपिकही उशिरा निघाले. १ नोव्हेंबर पासून शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात फक्त ६३ केंद्र सुरु झाले होते. त्यानंतर मागणीनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून आता ८४ केंद्रांमधून धानाची खरेदी सुरु आहे. एक केंद्र लवकरच सुरु होणार असल्याचे फेडरेशनने सांगितले आहे. बुधवारपर्यंत ३० हजार ८९६ क्विंटल अ ग्रेड धानाची खरेदी करण्यात आली होती. तर धानाची एकुण खरेदी १९ लक्ष ६ हजार ५६६ क्विंटल करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकुण ६१ हजार ४६३ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.
यापैकी भंडारा तालुक्यातील २ हजार ७९६, मोहाडी ८ हजार ९४६, तुमसर ११ हजार ९५, लाखनी १० हजार ९८७, साकोली ११ हजार ५२, लाखांदूर १२ हजार ८५६ तर पवनी तालुक्यातील ३ हजार ७३१ लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे.
यात साधारण धानाची ११ लक्ष ७५ हजार ६७० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. तालुकानिहाय खरेदी केंद्र सुरु असलेल्या केंद्रांतर्गत भंडारा ६, मोहाडी १५, तुमसर १९, लाखनी १२, साकोली १२, लाखांदूर १४ व पवनी ६ केंद्रांमधून ही खरेदी सुरु आहे.

आधारभूत केंद्रावर धान उघड्यावरच
जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांवर मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. टोकन मिळाल्यानंतरही बारदान्याअभावी धान्य उघड्यावर ठेवावे लागले होते. त्यातच महिनाभरात चारवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत अधिकच भर पडली. धान ठेवायला गोदामातच जागा नसताना नवीन धान ठेवायचे कुठे असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. मात्र धान खरेदी केंद्रात सुविधा नसल्याने त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. अवकाळी पावसाने धान ओले झाले. काही ठिकाणी धानाला कोंबही फुटल्याने धान पाखर झाले. पाखर झालेले धान केंद्र खरेदी करीत नाही तर अशा स्थितीत ते धान परतही नेता येत नाही अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड