शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

धानाचे १११ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM

इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी ...

ठळक मुद्दे१९ लाख क्विंटल धान खरेदी : केंद्र वाढवूनही सुविधांची वानवा कायम

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामांतर्गत ८५ धान खरेदी केंद्र सुरु असून शेतकऱ्यांचे १११ कोटी ५९ लक्ष रुपयांचे चुकारे थकीत आहे. परिणामी बळीराजाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.पावसाच्या उशिरा आगमनानंतर धानपिकही उशिरा निघाले. १ नोव्हेंबर पासून शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात फक्त ६३ केंद्र सुरु झाले होते. त्यानंतर मागणीनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून आता ८४ केंद्रांमधून धानाची खरेदी सुरु आहे. एक केंद्र लवकरच सुरु होणार असल्याचे फेडरेशनने सांगितले आहे. बुधवारपर्यंत ३० हजार ८९६ क्विंटल अ ग्रेड धानाची खरेदी करण्यात आली होती. तर धानाची एकुण खरेदी १९ लक्ष ६ हजार ५६६ क्विंटल करण्यात आली आहे.जिल्ह्यातील एकुण ६१ हजार ४६३ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.यापैकी भंडारा तालुक्यातील २ हजार ७९६, मोहाडी ८ हजार ९४६, तुमसर ११ हजार ९५, लाखनी १० हजार ९८७, साकोली ११ हजार ५२, लाखांदूर १२ हजार ८५६ तर पवनी तालुक्यातील ३ हजार ७३१ लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे.यात साधारण धानाची ११ लक्ष ७५ हजार ६७० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. तालुकानिहाय खरेदी केंद्र सुरु असलेल्या केंद्रांतर्गत भंडारा ६, मोहाडी १५, तुमसर १९, लाखनी १२, साकोली १२, लाखांदूर १४ व पवनी ६ केंद्रांमधून ही खरेदी सुरु आहे.आधारभूत केंद्रावर धान उघड्यावरचजिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांवर मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. टोकन मिळाल्यानंतरही बारदान्याअभावी धान्य उघड्यावर ठेवावे लागले होते. त्यातच महिनाभरात चारवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत अधिकच भर पडली. धान ठेवायला गोदामातच जागा नसताना नवीन धान ठेवायचे कुठे असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. मात्र धान खरेदी केंद्रात सुविधा नसल्याने त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. अवकाळी पावसाने धान ओले झाले. काही ठिकाणी धानाला कोंबही फुटल्याने धान पाखर झाले. पाखर झालेले धान केंद्र खरेदी करीत नाही तर अशा स्थितीत ते धान परतही नेता येत नाही अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड