शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 26, 2020 22:02 IST

देवाला भेटायचे, तर तळमळ निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र. बंगालीत त्याचा उच्चार नोरेन असा होतो. हा नोरेन बालपणी त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या मठात गेला. त्याचा आवाज अतिशय गोड होता, म्हणून मित्रांच्या आग्रहाखातर त्याने रामकृष्ण परमहंस यांच्या समोर एक भजन सादर केले. ते ऐकून रामकृष्णांची समाधी लागली. त्यांचे देहभान हरपलेले पाहून नोरेन आश्चर्यचकित झाला. भजन संपवून त्याने रामकृष्णांना भानावर आणले. रामकृष्ण त्याला म्हणाले, 'नोरेन, थांबू नकोस, आणखी गा...' असे म्हणत असताना त्यांनी नोरेनच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांची जशी समाधी लागली, तशी गाता गाता नोरेनचीदेखील समाधी लागली. एवढेच नाही, तर त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. नोरेन जेव्हा भानावर आला, तेव्हा भारावून गेला. 

नोरेनला ती समाधी अवस्था पुन्हा अनुभवायची होती. गुरुदेव म्हणाले, योग्य वेळ आली, की तू आपणहून ती अवस्था अनुभवशील. यावर नोरेनने पुढचा प्रश्न विचारला, 'पण गुरुदेव ती वेळ कधी येईल? मला देव कधी दिसेल?' 

यावर मंद स्मित करून गुरुदेव म्हणाले, 'मी मेल्यावर!'

नोरेन चकित होऊन गुरुदेवांकडे एकटक बघत बसला. त्यानंतर कित्येक महिने नोरेनची गुरुदेवांशी गाठ पडली नाही. मात्र, गुरुजींच्या उत्तराने नोरेन अस्वस्थ झाला. त्याने गुरुदेवांना भेटायचे ठरवले. त्यांचे शिष्यत्व पत्करायचे ठरवले. गुरुंच्या ओढीने नोरेन रामकृष्णांच्या भेटीस गेला. आश्चर्य काय, तर तेदेखील नोरेनची व्याकुळतेने वाट बघत होते. तिथे गेल्यावर पुन्हा नोरेनला तिच अनुभूती आली. क्षणभर ती अवस्था अनुभवल्यानंतर त्याने गुरुदेवांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, 'गुरुदेव, मला देव कधी दिसेल?'

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराजनोरेनचा प्रश्न ऐकून गुरुदेवांनी पुन्हा तेच उत्तर दिले.

आता मात्र, नोरेननी हट्टच धरला. देव पाहिल्याशिवाय त्यांच्या मठातून जाणार नाही, असे त्याने गुरुदेवांना निक्षून सांगितले. आणि तो मठात राहू लागला. आज न उद्या गुरुदेव आपल्याला देव दाखवतील या आशेवर नोरेन रात्रंदिवस वाट पाहू लागला. मात्र, गुरुदेवांचे `मी मेल्यावर' हे उत्तर ऐकून तो अस्वस्थ होत असे. 

एके दिवशी पहाटे गुरुदेव आणि सर्व शिष्य नदीवर स्नानासाठी गेले असता, गुरुदेवांनी नोरेनचे लक्ष नसताना त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. काही क्षण पाण्याखाली राहिल्यावर, नाका-तोंडात पाणी गेल्यावर नोरेन उसळी मारून बाहेर आला आणि म्हणाला, `गुरुदेव, हे काय करताय, मी मरेन ना?'

गुरुदेव स्मित करून म्हणाले, `नोरेन हेच अपेक्षित आहे. देवाला भेटायचे, तर एवढी अस्वस्थता निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो. नोरेनला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि गुरुंच्या ठायी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली. याच नोरेनने गुरुंच्या सान्निध्यात राहून स्वत: देव पाहिला आणि भविष्यात लोकांनाही दाखवला.

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद