शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

तुम्ही-आम्ही खेळी मेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:07 IST

लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकगुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन या त्रिसूत्रीवर आधारित असलेले वारकरी कीर्तन नित्य आणि नैमित्तिक या दोन प्रकारांत सादर होते. गुण संकीर्तन म्हणजे परमेश्वराचा गुणानुवाद, तत्त्वचिंतन, त्याच्या सगुण-निर्गुणतेबद्दल चिंतन, त्याच्या व्यक्त, अव्यक्ततेबद्दल चिंतन. गुण संकीर्तन हे साधारणत: निरुपण प्रधान असते; तर लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.कोरोनाचे संकट नसते तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीपासून पुढे वाल्हे-लोणंद परिसरात असती. वाल्हे हे गाव वाल्ह्या कोळ्याचे अन् नंतर रामचरणी तल्लीन झालेल्या वाल्मीक ऋषींचे गाव. भारतीय संस्कृतीचे आणि लोकधर्माचे असे वैशिष्ट्य आहे, अनेक पुराणकथा वाऱ्याच्या वेगाने पसरल्या गेल्या व त्यांचे रूपांतर स्थान महिम्यात झाले. वाल्मीक ऋषींनी ‘राम’ आपलासा केला. त्याची कथा सांगताना वारकरी कीर्तनकार सांगतात, ‘बोलिले वाल्मिक तैसेचि करीन’.वाल्ह्या कोळी मरा मरा म्हणताना पुढे राम राम म्हणू लागला. ‘राम म्हणता रामचि होईजे पदी बैसोनि पदवी घेईजे। राम रसाचिये चवी आन रस रुचति केवि’। रामजन्माच्या कीर्तनात वाल्मीक ऋषींचा महिमा सांगणाºया कीर्तनकारांची आठवण झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्ह्यात आल्यावर रामजन्माची कथा, निरूपण आठवते. ‘नाम संकीर्तन’ हा वारकरी संप्रदायाचा श्वास आणि ध्यास आहे. कुठल्याही संप्रदायाला प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे संप्रदायाला आराध्य दैवत आवश्यक असते. दुसरी या आराध्य देवतेची उपासना पद्धती आवश्यक असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रमाण ग्रंथ आवश्यक असतात. वारकरी संप्रदायाचे पंढरपूरचा श्री विठ्ठल हे आराध्य दैवत आहे. वारी आणि वारीतले कीर्तन ही उपासना पद्धती रूढ आहे आणि गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, संतांचे अभंग हे प्रमाण ग्रंथ आहेत.‘नोहे एकल्याचा खेळ। अवघा मेळविला मेळ’ अशी संतांसह वारकरी समाजाची धारणा असते. ‘एकलिया भावबळे कै सापडे तो काळ’त्यामुळेच ‘वैष्णवांच्या मेळे, उभा ठाके हाकेशी’ अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते हे केवळ संकीर्तन भक्तीने शक्य होते.वीणेकरी हा वारकरी कीर्तनाचा अविभाज्य अंग असतो. किंबहुना सूत्रधार असतो. ‘वारकरी कीर्तनाच्या लहानात लहान आकाराला दिंडी म्हणतात. दिंडीचा प्रमुख हा वीणेकरी असतो. त्याच्या इशाºयाप्रमाणे बाकीचे लोक कुठला अभंग घ्यायचा हे ठरवितात, असे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. नित्य कीर्तन हे नेमाचे कीर्तन असून, त्यात एखादा चिंतनपर अथवा उपदेशपर अभंग घेतला जातो. नैमित्तिक कीर्तन हे रामजन्म, कृष्णजन्म, दत्तात्रयजन्म, हनुमानजन्म अशा स्वरूपाचे असून, त्यात लीला संकीर्तन होते.