शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

तुम्ही-आम्ही खेळी मेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:07 IST

लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकगुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन या त्रिसूत्रीवर आधारित असलेले वारकरी कीर्तन नित्य आणि नैमित्तिक या दोन प्रकारांत सादर होते. गुण संकीर्तन म्हणजे परमेश्वराचा गुणानुवाद, तत्त्वचिंतन, त्याच्या सगुण-निर्गुणतेबद्दल चिंतन, त्याच्या व्यक्त, अव्यक्ततेबद्दल चिंतन. गुण संकीर्तन हे साधारणत: निरुपण प्रधान असते; तर लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.कोरोनाचे संकट नसते तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीपासून पुढे वाल्हे-लोणंद परिसरात असती. वाल्हे हे गाव वाल्ह्या कोळ्याचे अन् नंतर रामचरणी तल्लीन झालेल्या वाल्मीक ऋषींचे गाव. भारतीय संस्कृतीचे आणि लोकधर्माचे असे वैशिष्ट्य आहे, अनेक पुराणकथा वाऱ्याच्या वेगाने पसरल्या गेल्या व त्यांचे रूपांतर स्थान महिम्यात झाले. वाल्मीक ऋषींनी ‘राम’ आपलासा केला. त्याची कथा सांगताना वारकरी कीर्तनकार सांगतात, ‘बोलिले वाल्मिक तैसेचि करीन’.वाल्ह्या कोळी मरा मरा म्हणताना पुढे राम राम म्हणू लागला. ‘राम म्हणता रामचि होईजे पदी बैसोनि पदवी घेईजे। राम रसाचिये चवी आन रस रुचति केवि’। रामजन्माच्या कीर्तनात वाल्मीक ऋषींचा महिमा सांगणाºया कीर्तनकारांची आठवण झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्ह्यात आल्यावर रामजन्माची कथा, निरूपण आठवते. ‘नाम संकीर्तन’ हा वारकरी संप्रदायाचा श्वास आणि ध्यास आहे. कुठल्याही संप्रदायाला प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे संप्रदायाला आराध्य दैवत आवश्यक असते. दुसरी या आराध्य देवतेची उपासना पद्धती आवश्यक असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रमाण ग्रंथ आवश्यक असतात. वारकरी संप्रदायाचे पंढरपूरचा श्री विठ्ठल हे आराध्य दैवत आहे. वारी आणि वारीतले कीर्तन ही उपासना पद्धती रूढ आहे आणि गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, संतांचे अभंग हे प्रमाण ग्रंथ आहेत.‘नोहे एकल्याचा खेळ। अवघा मेळविला मेळ’ अशी संतांसह वारकरी समाजाची धारणा असते. ‘एकलिया भावबळे कै सापडे तो काळ’त्यामुळेच ‘वैष्णवांच्या मेळे, उभा ठाके हाकेशी’ अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते हे केवळ संकीर्तन भक्तीने शक्य होते.वीणेकरी हा वारकरी कीर्तनाचा अविभाज्य अंग असतो. किंबहुना सूत्रधार असतो. ‘वारकरी कीर्तनाच्या लहानात लहान आकाराला दिंडी म्हणतात. दिंडीचा प्रमुख हा वीणेकरी असतो. त्याच्या इशाºयाप्रमाणे बाकीचे लोक कुठला अभंग घ्यायचा हे ठरवितात, असे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. नित्य कीर्तन हे नेमाचे कीर्तन असून, त्यात एखादा चिंतनपर अथवा उपदेशपर अभंग घेतला जातो. नैमित्तिक कीर्तन हे रामजन्म, कृष्णजन्म, दत्तात्रयजन्म, हनुमानजन्म अशा स्वरूपाचे असून, त्यात लीला संकीर्तन होते.