शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तुम्ही-आम्ही खेळी मेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:07 IST

लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकगुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन या त्रिसूत्रीवर आधारित असलेले वारकरी कीर्तन नित्य आणि नैमित्तिक या दोन प्रकारांत सादर होते. गुण संकीर्तन म्हणजे परमेश्वराचा गुणानुवाद, तत्त्वचिंतन, त्याच्या सगुण-निर्गुणतेबद्दल चिंतन, त्याच्या व्यक्त, अव्यक्ततेबद्दल चिंतन. गुण संकीर्तन हे साधारणत: निरुपण प्रधान असते; तर लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.कोरोनाचे संकट नसते तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीपासून पुढे वाल्हे-लोणंद परिसरात असती. वाल्हे हे गाव वाल्ह्या कोळ्याचे अन् नंतर रामचरणी तल्लीन झालेल्या वाल्मीक ऋषींचे गाव. भारतीय संस्कृतीचे आणि लोकधर्माचे असे वैशिष्ट्य आहे, अनेक पुराणकथा वाऱ्याच्या वेगाने पसरल्या गेल्या व त्यांचे रूपांतर स्थान महिम्यात झाले. वाल्मीक ऋषींनी ‘राम’ आपलासा केला. त्याची कथा सांगताना वारकरी कीर्तनकार सांगतात, ‘बोलिले वाल्मिक तैसेचि करीन’.वाल्ह्या कोळी मरा मरा म्हणताना पुढे राम राम म्हणू लागला. ‘राम म्हणता रामचि होईजे पदी बैसोनि पदवी घेईजे। राम रसाचिये चवी आन रस रुचति केवि’। रामजन्माच्या कीर्तनात वाल्मीक ऋषींचा महिमा सांगणाºया कीर्तनकारांची आठवण झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्ह्यात आल्यावर रामजन्माची कथा, निरूपण आठवते. ‘नाम संकीर्तन’ हा वारकरी संप्रदायाचा श्वास आणि ध्यास आहे. कुठल्याही संप्रदायाला प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे संप्रदायाला आराध्य दैवत आवश्यक असते. दुसरी या आराध्य देवतेची उपासना पद्धती आवश्यक असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रमाण ग्रंथ आवश्यक असतात. वारकरी संप्रदायाचे पंढरपूरचा श्री विठ्ठल हे आराध्य दैवत आहे. वारी आणि वारीतले कीर्तन ही उपासना पद्धती रूढ आहे आणि गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, संतांचे अभंग हे प्रमाण ग्रंथ आहेत.‘नोहे एकल्याचा खेळ। अवघा मेळविला मेळ’ अशी संतांसह वारकरी समाजाची धारणा असते. ‘एकलिया भावबळे कै सापडे तो काळ’त्यामुळेच ‘वैष्णवांच्या मेळे, उभा ठाके हाकेशी’ अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते हे केवळ संकीर्तन भक्तीने शक्य होते.वीणेकरी हा वारकरी कीर्तनाचा अविभाज्य अंग असतो. किंबहुना सूत्रधार असतो. ‘वारकरी कीर्तनाच्या लहानात लहान आकाराला दिंडी म्हणतात. दिंडीचा प्रमुख हा वीणेकरी असतो. त्याच्या इशाºयाप्रमाणे बाकीचे लोक कुठला अभंग घ्यायचा हे ठरवितात, असे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. नित्य कीर्तन हे नेमाचे कीर्तन असून, त्यात एखादा चिंतनपर अथवा उपदेशपर अभंग घेतला जातो. नैमित्तिक कीर्तन हे रामजन्म, कृष्णजन्म, दत्तात्रयजन्म, हनुमानजन्म अशा स्वरूपाचे असून, त्यात लीला संकीर्तन होते.