शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

फास्ट फूडच्या तुलनेत घरच्या जेवणात तृप्तता का जाणवते? जाणून घ्या त्यामागील कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:05 IST

आपल्या आधीची पिढी बाहेरचे जेवणच काय तर परान्न अर्थात दुसऱ्यांच्या घरी जेवणेही टाळत असे, घरगुती जेवणाचा हट्ट का होता ते वाचा. 

रोजच्या जेवणाचा कंटाळा म्हणून चवबदल म्हणत आपण हॉटेलिंग करतो. बाहेर गेलो की फास्ट फूड, जंक फूड खातो. मित्रांबरोबर पिझ्झा, पास्ता, सॅन्डविचच्या पार्टी करतो. तोवर घरच्या अन्नाची किंमत कळत नाही. पण जेव्हा मेसचे जेवण, परदेशी गेल्यावर रोजचे हॉटेलचे जेवण, खाणावळीतला डबा खाण्याची वेळ येते किंवा आठ दहा दिवस घराबाहेर असल्यावर बाहेरच्या जेवणावर गुजराण करावी लागते, तेव्हा घरच्या अन्नाची किंमत कळते!

घरचे आणि बाहेरचे जेवण यात फरक काय? दोन्ही कडे पोटभरीचे अन्न मिळते. परंतु बाहेरच्या जेवणाने रसना तृप्ती अर्थात जिभेचे चोचले पुरवले जाऊ शकतात, मात्र घरच्या जेवणाने मनाला तृप्ती येते. बाहेरच्या जेवणाने तात्कालिक समाधान वाटत असले, तरी पुढच्या दोन तासात पुन्हा भूक लागते. सोडा किंवा बटाटा,चीज, अतिरिक्त साखर यांचा वारेमाप समावेश केल्यामुळे ते अन्न पोटभरीचे ठरू शकत नाही. याउलट घरी नाश्त्यात एक पोळी/चपाती खाल्ली तरी दुपारपर्यंत भूक लागत नाही. एवढा का बरं फरक पडत असेल?

तर फरक आहे, बनवणाऱ्या हातांचा! घरचा स्वयपांक करणारी गृहिणी घरच्यांच्या प्रेमापोटी तो स्वयंपाक करत असते. तो करताना तिचा उमाळा, आपुलकी, प्रेम त्या स्वयंपाकात उतरते. त्यामुळे तो स्वयंपाक पौष्टिक आणि रुचकर होतो. हॉटेलमधला स्वयंपाकी काम उरकत असतो. त्या पदार्थाच्या चवीशी, त्याच्याशी निगडित स्वच्छता, आरोग्य याच्याशी त्याचा संबंध नसतो. गृहिणी मात्र प्रत्येक गोष्ट निवडून घेतला. प्रेत्यक जिन्नस डोळ्याखालून घालतात. घरच्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन स्वयंपाक करतात. त्यामुळे तो स्वयंपाक सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आणि अंगी लागतो. 

जेवण करणाऱ्याबरोबर वाढपी देखील महत्त्वाचा असतो. आता बुफे पद्धत आली. पूर्वी पंगती असत. पंगतीतले वाढपी आठवून बघा, झरझर वाढून पुढे निघून जात असत. त्या वाढण्यात आपुलकी नसल्यामुळे वाढणार्याचे भाव अन्नात उतरतात. लोक रुक्षपणे वाढतात, जेवणारे रुक्षपणे जेवतात. घरी आई, आजी, ताई, बायको, आत्या, मावशी, आग्रह करून जेवायला वाढतात. तो आपुलकीचा भाव नसेल तर घरच्या स्वयंपाकात आणि मेसवरच्या जेवणात काय फरक उरणार? 

आपला शरीर यज्ञ चालत राहावे, यासाठी अन्नाची आहुती देहात टाकली जाते. 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म' अशी ओळ 'वदनी कवळ घेता' या श्लोकात दिल आहे त्याच्या अर्थाला जागून थोडंच, पण रुचकर अशा घरच्या जेवणाचा आस्वाद घेऊया आणि पुढच्या पिढीलाही घरच्या जेवणाचे महत्त्व पटवून देऊया! शिवाय, अन्न घरचे असो नाहीतर बाहेरचे ते वाया जाणार नाही, फेकून द्यावे लागणार नाही, त्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेऊया!

टॅग्स :foodअन्न