ज्यांच्यामुळे भारताला 'योग' मिळाला! आदिगुरु मच्छिंद्रनाथांच्या जीवनातील 'हे' ५ प्रसंग वाचलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:05 IST2026-04-07T07:00:01+5:302026-04-07T07:05:01+5:30
७ एप्रिल रोजी आदिगुरु मच्छिंद्रनाथ यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा विशेष लेख.

ज्यांच्यामुळे भारताला 'योग' मिळाला! आदिगुरु मच्छिंद्रनाथांच्या जीवनातील 'हे' ५ प्रसंग वाचलेत का?
७ एप्रिल रोजी आदिगुरु मच्छिंद्रनाथ यांची पुण्यतिथी आहे. नाथ संप्रदायाचे मूळ पुरुष आणि नवनाथांमधील पहिले नाथ म्हणून मच्छिंद्रनाथांचे स्थान अत्यंत वरचे आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित हा विशेष लेख!
हे ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे असते समोरच्याचं मन वाचण्याची दैवी शक्ती!
भारतीय अध्यात्मिक परंपरेत 'नाथ संप्रदाया'चे योगदान अद्वितीय आहे. "आदिनाथा"नंतर (भगवान शंकर) ज्यांनी या संप्रदायाची धुरा सांभाळली आणि योगविद्येचा प्रसार केला, ते म्हणजे मच्छिंद्रनाथ. ७ एप्रिल रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
१. मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि अवतार
मच्छिंद्रनाथांना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकरांनी माता पार्वतीला 'योगविद्या' सांगितली, ती एका माशाने ऐकली. त्या माशाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे त्यांचे नाव 'मत्स्येंद्रनाथ' किंवा 'मच्छिंद्रनाथ' असे पडले. त्यांनी हिमालयातील बद्रिकाश्रमात खडतर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली होती.
२. नाथ संप्रदायाची स्थापना
मच्छिंद्रनाथांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश 'योग' आणि 'भक्ती'चा मेळ घालून सामान्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणे हा होता. त्यांनी जात-पात, भेदभाव बाजूला सारून सर्वांसाठी अध्यात्माचे द्वार खुले केले. 'अलख निरंजन' हा मंत्र त्यांनीच दिला, ज्याचा अर्थ आहे- जो अदृश्य आहे आणि निर्दोष आहे, त्या परमात्म्याचे स्मरण करा.
हे ही वाचा : Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
३. गुरु-शिष्य परंपरा: मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ
मच्छिंद्रनाथांचे सर्वात महान कार्य म्हणजे त्यांनी गोरक्षनाथ (गोरखनाथ) यांच्यासारखा महान शिष्य घडवला. गुरु-शिष्याची ही जोडी भारतीय योगविज्ञानात अजरामर आहे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना कठीण परीक्षेतून तावून-सुलाखून काढले आणि त्यांच्याकडून हठयोगाचा प्रचार करून घेतला.
४. मच्छिंद्रनाथांची शिकवण
योगसाधना: शरीराला शुद्ध करून मन स्थिर करण्यासाठी त्यांनी योगावर भर दिला.
नियत साफ: मनुष्याचा हेतू शुद्ध असेल तरच त्याला ईश्वरप्राप्ती होते.
सद्गुरूंचे महत्त्व: गुरूंशिवाय आत्मज्ञान मिळणे अशक्य आहे, हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केले.
हे ही वाचा : Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच!
५. आजच्या काळातील महत्त्व
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण युगात मच्छिंद्रनाथांनी सांगितलेला संयम आणि योगमार्ग अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात मच्छिंद्रगड (सांगली) आणि सावरगाव (बीड) यांसारख्या ठिकाणी त्यांची मंदिरे असून तिथे श्रद्धाळू मोठ्या संख्येने नतमस्तक होतात.