शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूला कवटाळावेसे वाटत असेल तेव्हा सद्गुरुंचे 'हे' विचार तुमचे मन नक्की परावृत्त करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:08 IST

मृत्यू हा संकटातून सुटण्याचा मार्ग नाही. खरी मजा संकटांना तोंड देण्यात आहे. मृत्यूतून तुमची सुटका होईलही, परंतु तुमच्या पश्चात तुमच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाईल!

जेव्हा व्यक्ती अपयशाने खचते, तेव्हा ती आतून पूर्णपणे कोलमडून गेलेली असते का? स्वत:ला सावरणे नाहीतर कोलमडू देणे, हे सर्वस्वी आपल्या हाती असते. कोणीही बाहेरील व्यक्ती आपल्याला तोडू शकत नाही. यासाठी आपले विचार, मन, प्रयत्न यांचा पाया भक्कम असायला हवा. हातून निसटून गेलेल्या संधीचा फार विचार करू नका. या गोष्टी चांगल्यासाठीच घडल्या, याची प्रचिती कदाचित भविष्यात येईल. म्हणून परिस्थिती कशीही असो, तुम्ही खंबीर व्हा. वेळ सारखी नसते, ती बदलत राहते. कठीणात कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची ताकद बदलत्या वेळेत असते. तोवर आपल्याला संयम ठेवता यायला हवा.

उद्विग्न मनस्थिती असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप असतो. हा राग  दोन प्रकारे उफाळू शकतो. एक राग स्वत:सकट इतरांचा सर्वनाश करतो आणि दुसरा राग ऊर्जेचे रूप धारण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावतो. आपल्याला दुसऱ्या प्रकारे रागाचे नियोजन करायचे आहे.  त्यासाठी रागाच्या भरात अपशब्द निघणार नाहीत ना, याची काळजी घ्या. कारण, वेळ बदलते, माणसे बदलतात पण शब्द राहून जातात. 

रागाच्या भरात कितीही टोकाचे विचार आले, तरी ते विचार कागदावर उतरवून काढा. आज ना उद्या परिस्थिती बदलणार आहे. असेही त्या कागदावर लिहा. त्या संकटकाळात बाकी कोणीही सोबत नसले, तरी तुम्हाला स्वत:ची साथ भक्कम आहे, असा आत्मविश्वास वाटायला हवा. जोवर तुम्ही स्वत: हार मानत नाही, तोवर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. 

मृत्यू हा संकटातून सुटण्याचा मार्ग नाही. खरी मजा संकटांना तोंड देण्यात आहे. मृत्यूतून तुमची सुटका होईलही, परंतु तुमच्या पश्चात तुमच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाईल आणि त्याचे स्पष्टीकरण द्यायला तुम्ही अस्तित्त्वात नसाल आणि विनाकारण घरच्यांना तो त्रास सहन करावा लागेल. हा आत्मक्लेश तुमच्याबरोबर अनेकांना मरणयातना देणारा ठरेल. त्यापेक्षा काही काळ थांबा. टोकाचे विचार आले, तरी येऊद्या. विचार येतील आणि जातील. तुम्हाला वैचारिक वादळात अढळपणे उभे राहायचे आहे, हे लक्षात ठेवा. तुमची अपयशगाथा उद्याची यशोगाथा होणार आहे. तुम्ही दिलेला लढा दुसऱ्या कोणासाठी भविष्यात प्रेरणादायी ठरेल. 

म्हणून खचून जाऊ नका. कितीही राग आला, संकट आले तरी डगमगू नका. प्रतिक्रिया देऊ नका. ते वादळ निघून गेले, की मग पुनश्च हरी ओम म्हणत नव्याने सुरुवात करा. एका अपयशाने आयुष्य कधीच संपत नाही. दुसरी संधी आपली वाट पाहत असते. ती संधी ओळखा आणि आत्मविश्वासाने कामाला लागा. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य