शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी कोणते योगदान दिले? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 10:25 IST

शहाजी राजांची महत्त्वाकांक्षा पाहता समर्थ रामदास स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि स्वराज्यपूर्तीचे स्वप्नं नक्कीच साकार होईल अशी ग्वाही दिली. 

'स्वराज्य स्थापन व्हावे, ही तर श्रींची इच्छा!' ही शपथ आपल्या शिवशंभू छत्रपती शिवाजी राजेंनी घेतली. परंतु हे स्वप्न पाहिले, ते शहाजी राजांनी. त्या स्वप्नाचा पाया रचला जिजाऊ मातेने आणि त्या स्वप्नाची पूर्तता केली ती छत्रपती शिवाजी राजांनी! या घटनेचे साक्षीदार आणि मदतनीस, मार्गदर्शक होते समर्थ रामदास स्वामी. प्रख्यात व्याख्याते राम शेवाळकर यांनी एका व्याख्यानात या प्रसंगाबद्दल काय वर्णन केले आहे, ते पाहू.

छत्रपती शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले, तेव्हा बालशिवाजी अवघ्या एक वर्षाचे होते. शहाजी राजांची महत्त्वाकांक्षा पाहता समर्थ रामदास स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि स्वराज्यपूर्तीचे स्वप्नं नक्कीच साकार होईल अशी ग्वाही दिली. 

त्या काळात समर्थ रामदास स्वामींनी आपले चिंतन पूर्ण करून सबंध देशाचा पायी प्रवास केला. समाजमनाचा अभ्यास केला. मोगलशाहीला गांजून गेलेली जनता आत्मभान, देशाभिमान, धर्माभिमान विसरून गेली होती. जो आपल्याला खाऊ घालेल, तो आपला राजा, ही गुलामी मानसिकता लोकांची तयार झाली होती. हे चित्र पाहून समर्थ अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या अध्यात्माचा रोख, दिशाच बदलून टाकली. त्यांनी समाजासमोर दोन आदर्श ठेवले, धनुर्धारी राम आणि सेवेत तत्पर असलेल्या बलवान हनुमंताचे! 

सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेला किंवा भक्तवत्सल असलेला राम जनतेसमोर आणला नाही, तर पाठिशी यत्किंचितही सेना नसताना केवळ आपल्या धनुष्याच्या सामथ्र्यावर दक्षिणाधिपती रावण याचे पारिपत्य करणाऱ्या रामाचा आदर्श ठेवला. मोगलांना शरण न जाता रामासारखे खंबीर बना आणि आपला लढा आपण जिंकण्यास तत्पर व्हा. 

त्याचबरोबर वीर हनुमान आणि दास हनुमान यांचा आदर्श दिला. केवळ वीरश्री संचारून उपयोग नाही. वीरतेचा अहंकार चढून मनुष्य उन्मत्त होऊ शकतो. याचसाठी वीरतेबरोबर दास मारुती, जो विनम्र होता, सेवातत्पर होता, वीर योद्धा होता त्याचा आदर्श घालून दिला. ठिकठिकाणी व्यायामशाळा सुरू केल्या. तरुणांना आरोग्याप्रती जागरूक केले. बलवान केले. दंडबैठक, जोरबैठका, सूर्यनमस्काराचा सराव करवून घेत हनुमंताची उपासना करून घेतली. त्यामुळे सुस्त पडलेल्या समाजाचे तन व मन कणखर झाले. स्वराज्याची ओढ निर्माण झाली. शत्रूविरुद्ध मुठी आवळल्या गेल्या आणि याच तरुणांमधून तयार झालेल्या मावळ्यांना शिवबासारखा प्रजाहितदक्ष राजा मिळाला. 

या सर्व बाबी पाहता अध्यात्माची ताकद लक्षात येते. हिंदूंच्या दैवतांचा आदर्श ठेवून क्रांती कशी घडवता येते, याचा परिपाठ मिळतो आणि स्वराज्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व महात्म्यांसमोर विनम्रतेने व अभिमानाने तन-मन नतमस्तक होते. जगदंब...उदयोऽस्तु!