शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी कोणते योगदान दिले? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 10:25 IST

शहाजी राजांची महत्त्वाकांक्षा पाहता समर्थ रामदास स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि स्वराज्यपूर्तीचे स्वप्नं नक्कीच साकार होईल अशी ग्वाही दिली. 

'स्वराज्य स्थापन व्हावे, ही तर श्रींची इच्छा!' ही शपथ आपल्या शिवशंभू छत्रपती शिवाजी राजेंनी घेतली. परंतु हे स्वप्न पाहिले, ते शहाजी राजांनी. त्या स्वप्नाचा पाया रचला जिजाऊ मातेने आणि त्या स्वप्नाची पूर्तता केली ती छत्रपती शिवाजी राजांनी! या घटनेचे साक्षीदार आणि मदतनीस, मार्गदर्शक होते समर्थ रामदास स्वामी. प्रख्यात व्याख्याते राम शेवाळकर यांनी एका व्याख्यानात या प्रसंगाबद्दल काय वर्णन केले आहे, ते पाहू.

छत्रपती शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले, तेव्हा बालशिवाजी अवघ्या एक वर्षाचे होते. शहाजी राजांची महत्त्वाकांक्षा पाहता समर्थ रामदास स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि स्वराज्यपूर्तीचे स्वप्नं नक्कीच साकार होईल अशी ग्वाही दिली. 

त्या काळात समर्थ रामदास स्वामींनी आपले चिंतन पूर्ण करून सबंध देशाचा पायी प्रवास केला. समाजमनाचा अभ्यास केला. मोगलशाहीला गांजून गेलेली जनता आत्मभान, देशाभिमान, धर्माभिमान विसरून गेली होती. जो आपल्याला खाऊ घालेल, तो आपला राजा, ही गुलामी मानसिकता लोकांची तयार झाली होती. हे चित्र पाहून समर्थ अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या अध्यात्माचा रोख, दिशाच बदलून टाकली. त्यांनी समाजासमोर दोन आदर्श ठेवले, धनुर्धारी राम आणि सेवेत तत्पर असलेल्या बलवान हनुमंताचे! 

सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेला किंवा भक्तवत्सल असलेला राम जनतेसमोर आणला नाही, तर पाठिशी यत्किंचितही सेना नसताना केवळ आपल्या धनुष्याच्या सामथ्र्यावर दक्षिणाधिपती रावण याचे पारिपत्य करणाऱ्या रामाचा आदर्श ठेवला. मोगलांना शरण न जाता रामासारखे खंबीर बना आणि आपला लढा आपण जिंकण्यास तत्पर व्हा. 

त्याचबरोबर वीर हनुमान आणि दास हनुमान यांचा आदर्श दिला. केवळ वीरश्री संचारून उपयोग नाही. वीरतेचा अहंकार चढून मनुष्य उन्मत्त होऊ शकतो. याचसाठी वीरतेबरोबर दास मारुती, जो विनम्र होता, सेवातत्पर होता, वीर योद्धा होता त्याचा आदर्श घालून दिला. ठिकठिकाणी व्यायामशाळा सुरू केल्या. तरुणांना आरोग्याप्रती जागरूक केले. बलवान केले. दंडबैठक, जोरबैठका, सूर्यनमस्काराचा सराव करवून घेत हनुमंताची उपासना करून घेतली. त्यामुळे सुस्त पडलेल्या समाजाचे तन व मन कणखर झाले. स्वराज्याची ओढ निर्माण झाली. शत्रूविरुद्ध मुठी आवळल्या गेल्या आणि याच तरुणांमधून तयार झालेल्या मावळ्यांना शिवबासारखा प्रजाहितदक्ष राजा मिळाला. 

या सर्व बाबी पाहता अध्यात्माची ताकद लक्षात येते. हिंदूंच्या दैवतांचा आदर्श ठेवून क्रांती कशी घडवता येते, याचा परिपाठ मिळतो आणि स्वराज्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व महात्म्यांसमोर विनम्रतेने व अभिमानाने तन-मन नतमस्तक होते. जगदंब...उदयोऽस्तु!