शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

Varuthini Ekadashi 2022 : एकादशीला फराळी पदार्थांचे सेवन करू नये असे आरोग्यशास्त्र का सांगते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 8:00 AM

Varuthini Ekadashi 2022 : २६ एप्रिल रोजी वरूथिनी एकादशी आहे. त्यानिमित्ताने एकादशीच्या उपासासंबंधित नियम जाणून घेऊ. 

एकादशी ही तिथी महिन्यातून दोनदा येते. पौर्णिमेआधी चार दिवस आणि अमावस्येआधी चार दिवस. या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात. आपल्या शरीराचा ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणून दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल, तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते. यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपास सांगितला आहे.

आयुर्वेदात उपासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात. लंघन अर्थात अन्न व्यर्ज्य करणे. आपला देह हे एक यंत्र आहे. यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडते. शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप. यंत्र सतत वापरात असेल, तरीही ते काम करणे बंद करते. त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते. शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते.

आपल्या आहारपद्धतीत झालेले बदल पाहता आपले शरीर रोगांचे माहेरघर झाले आहे. पूर्वी साठी ओलांडलेल्या लोकांमध्ये मधुमेह, हृदयविकार ही लक्षणे आढळून येत. ती लक्षणे आता वीस-तीसच्या उंबरठ्यावर दिसू लागतात. चाळीशीची खूण समजला जाणारा चष्मा दोन ते चार वर्षांच्या मुलांनीही लावलेला दिसून येतो. वाढते ताणतणाव, दुर्मिळ आजार, रोगप्रतिकारक्षमतेची कमतरता, या सर्व बाबींना कारणीभूत आहे ती म्हणजे चुकीची आहारपद्धती. 

आपण अन्नग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न पचत नाही, तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो. ही प्रक्रीया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपास करावा. उपास शक्यतो काहीही न खाता करावा. गरज लागली, तर फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल, तर एकादशीचा उपास न केलेला बरा.

एकादशीचा उपास दोन्ही वेळ केला जातो. म्हणजेच पूर्ण दिवस लंघन करून शरीर शुद्धी प्रक्रिया केली जाते. अशा वेळी सतत आहाराकडे झेपावणाऱ्या मनाला नियंत्रित करण्यासाठी ईशचिंतनाकडे वळवले जाते. म्हणूनच या शास्त्रीय कारणाला धार्मिकतेची जोड देऊन एकादशी या तिथीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 

अध्यात्मिक दृष्ट्या उपवास करणे या शब्दाचा अर्थ आहे अधिक जवळ जाणे. कोणाच्या? तर भगवंताच्या. आपल्या रामरगाड्यात काही क्षण उपवास करावा. देवासाठी नाही, तर स्वत:साठी. मन:शांती साठी. आजवर एकादशीचे ब्रीद पाळलेल्या अनेक भाविकांनी या व्रताची अनुभूती घेतलेली आहे. आपल्यालाही तो अनुभव घ्यायचा असेल, तर एकादशी व्रताचे अवश्य पालन केले पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स