शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

म्हणूनच आपली आजी म्हणायची, 'सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:24 IST

या श्लोकाच्या पहिल्या ओळीइतकाच पूर्ण श्लोकाचा आशय सुद्धा महत्त्वाचा. तो लक्षात ठेवला तर कितीही अडचणी आल्या तरी आपले पाऊल वाकडे पडणार नाही, याची गॅरेंटी! 

बालपणी झालेले संस्कार आपण सहसा विसरत नाही. रोजच्या कामाच्या गडबडीत उजळणी होत नाही ही बाब वेगळी, परंतु काही प्रसंगामुळे श्लोक, परवचा, सुभाषिते, हरिपाठ यांचा आठव होतो. कारण बापूनी या गोष्टी आपल्या बुद्धीवरच नाही तर मनावरही कोरल्या जातात. तशीच एक प्रार्थना जी आपण शाळेत आणि घरी आजीकडून शिकलो, ती म्हणजे -

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडोकलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडोसदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडोवियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो

ही मोरोपंतांची केकावली आहे. त्याची आणखीही कडवी आहेत. काही जणांना ती पाठ असतात, तर काही जणांना पहिला श्लोक स्मरणात राहतो. श्लोकाच्या पहिल्या ओळीत केवढी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. सुसंगती सदा घडो... आजच्या काळात चांगली सोबत मिळणे अतिशय कठीण! खुषमस्करी करणारे लोक  अवती भोवती असून उपयोगाचे नाही. चांगल्या बाबतीत कौतुक करणारे आणि चुकल्यास कान धरणारी ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी आपल्या बरोबर असतील तर आणि तरच विकास होऊ शकेल. या श्लोकाच्या पहिल्या ओळीइतकाच पूर्ण श्लोकाचा आशय सुद्धा महत्त्वाचा. तो लक्षात ठेवला तर कितीही अडचणी आल्या तरी आपले पाऊल वाकडे पडणार नाही, याची गॅरेंटी! 

श्लोकाचा अर्थ आहे, मला सज्जनांचा सहवास घडो, अनुभवी लोकांचे शब्द कानी पडो, सज्जनांच्या मदतीने बुद्धी निष्कलंक होवो. प्रपंचाची ओढ कमी होऊन संत सहवास घडो. त्यांनी दूर लोटले, तरी हट्टाने त्यांचेच सान्निध्य मिळो. त्यासाठी दुःखं कष्ट झाले तरी चालतील, त्याचा शेवट ईशसेवेत रुजू होण्यातच असेल. 

मराठी साहित्य एवढे समृद्ध आहे ना, की इथे सारस्वतांचा सुकाळ आहे. माउलींच्या ओव्या, तुकोबांची अभंगवाणी, समर्थांचे समास, कबीरांचे दोहे, मोरोपंतांच्या केकावल्या, आर्या आणि बरेच काही. हा समृद्ध वारसा आपल्याला मिळाला आणि आपल्या पूर्वजांनी तो जतन केला. आपल्याला तो वृद्धिंन्गत करायचा आहे. केवळ पोपटपंची करून नाही, तर त्याचे मर्म जीवनात उतरवून!