शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:58 IST

Swami Samartha: एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो, पण स्वामीभक्ती वाया जात नाही हे लक्षात ठेवा, त्याचे फळ उचित वेळी मिळणारच!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आपण केलेल्या साधनेची, नामस्मरणाची, प्रदक्षिणा, महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचीती महाराजांना द्यावीच लागते, कारण प्रचीतीविना भक्ती नाही. पण ती प्रचीती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरवायचे असते. महाराज मी इतका जप केला, पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणे अयोग्य होईल  त्यांनी तुमच्याकडून त्यांनी जप करवून घेतला हे लक्षात घ्या. जितका वेळ जप केलात तितका वेळ मन शांत राहिले, एका जागेवर बसायची सवय लागली, तितका वेळ सोशल मिडीयावर उनाडक्या थांबल्या, चार सिगरेटी (पीत असाल तर ) कमी ओढल्या गेल्या. लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवळ कमी झाली, म्हणजे बघा नामस्मरणाने कितीतरी गोष्टी साध्य झाल्या!

मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी गुरूंशी केलेला तो निव्वळ, उघड उघड व्यवहारच नाही का? आज कलीयुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागते. घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्वच अनिश्चित असते, पण तरीही जगावे लागते स्वतःसाठी आणि इतरांसाठीही . शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध आहे, पण हे जगणे असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे. 

Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!

कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा, महाराज ओंजळ भरून वाहील इतके सुख देतील. त्यांना माहित आहे तुम्हाला कधी काय द्यायचे ते. दोन माळा केल्या की लगेच गोष्टी घडायला ते काही TV चे बटण नाही आणि अल्लाउद्दिनचा दिवा सुद्धा नाही. गेल्या कित्येक जन्मांची पापे धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्ची होते मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो. म्हणूनच उपासनेचे मर्म समजून घ्या. करत राहा बस...ते मोजू नका त्याचा उल्लेख सुद्धा करू नका! मी हे केले, मी ते करणार आहे. कशासाठी सांगायचे? मोठेपणा मिरवायला?  विचारा हे प्रश्न स्वतःच्याच मनाला. महाराज आणि तुमच्यात टेलीपथी आहे. तुम्ही काय करता ते त्यांना माहित आहे, इतरांना माहित होण्याची गरजच काय? अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवतो. आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्ट चक्र आपल्या मागे लागते. अनुभव घेऊन बघा!

आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते, ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत. ती जे करते ते प्रेमाने, कुठलीही अपेक्षा न ठेवता. एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही, तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का? नाही ना. कारण तिचे प्रेम अपेक्षाविरहित असते. 

त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा. मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केलीत तर आयुष्य बहरून जाईल आणि दुसरे काहीही मिळाले नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे “ समाधान “ आणि रात्रीची शांत झोप. 

आजकाल सगळीकडे मध्यस्थ असतात, पण महाराजांशी आपला सरळ संपर्क टेलिपथीचा! ह्या हृदयीचे त्या हृदयी. अहो बाप आहे तो आपला त्यानेच जन्माला घातलय आपल्याला. त्याला काही नको, पाच नारळाचे तोरण किंवा अजून काही. तो प्रेमाचा भुकेला आहे. तो भाव सच्चा हवा, त्यात भेसळ नको. 

मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच फळते . गुरुचरण लाभणे आणि त्यांचे नाव आपल्या मुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्माचे फळ आहे. आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना अपोआप मागणे थांबते आणि मग जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते. काही नको वाटते. मी, माझे महाराज आणि माझे नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही हे नक्की .आपण फार सामान्य माणसे आहोत, पण तरीही काहीही मागू नका. न मागताच सर्व मिळणार आहे हे ध्यान्यात ठेवा. महाराजांच्या सोबत व्यवहार नको . निदान त्यांना ह्यात ओढू नका. महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते. शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको. एका रात्रीत काहीच बदलणार नाही पण बदल होईल हे नक्की. संयम म्हणजेच उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचे सोने होईल. आपला संयम संपला आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम सुटतो .

महाराज ही एक अनाकलनीय शक्ती आहे आणि ती आपल्या अवलोकनाच्या समजण्याच्या खूप बाहेर आहे असे श्री भाऊ पाटील( शेगाव) मला नेहमी सांगत असत .आता ते जरी नसले तरी त्यांनी अनुभवलेले आणि शब्दांकित केलेले महाराज मी विसरणार नाही. अध्यात्माचा खूप खोलवर अर्थ ह्या सर्वात दडलेला आहे.

Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण...

आपल्या मनात कुठलाही विचार यायच्या खूप आधीच तो महाराजांना समजलेला असतो किंबहुना तो त्यांनीच दिलेला असतो. त्यामुळे उठ सूट त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही. महाराज आपला जीवाभावाचा सखा आणि आपला अनमोल “टेलीपथी'' आहेत . त्यांचे स्थान आपल्या हृदयात आणि आपले त्यांच्या असे जेव्हा होईल तो क्षण आपल्या सर्व इच्छापूर्तीचा असेल ह्यात शंकाच नाही. आई जशी आपल्या मनातील सर्व न सांगताच ओळखते अगदी तसेच महाराज आहेत आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या शिखरावर नेवून ठेवणार हे त्रिवार सत्य आहे. 

महाराजांच्या सोबतीने जगायला शिका, कसलीच शंका, हाव, मागणे काहीही न करता त्यांच्यासोबत चालत राहा . इतकेच आपण करू शकतो किंबहुना भक्ताने  तेवढेच करणे त्यांना अपेक्षित आहे. 

संपर्क : 8104639230

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थ