शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Shravan Amavasya 2022: पिठोरी अमावस्येच्या पौराणिक कथेतून प्रत्येक महिलेने घ्यायला हवा 'हा' मौलिक संदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:42 IST

Pithori Amavasya 2022: २६ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या तथा पिठोरी अमावस्या आहे. या निमित्ताने आपण कथा तर वाचूच पण त्यातून बोधही करून घेऊया!

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याच्या घरी श्रावणात अवसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळी बाळंत होऊन पोर मरून जाई. असे झाले म्हणजे ब्राह्मण उपाशी जात असत. अशी सहा वर्षे झाली. सातव्या वर्षीही तसेच झाले. तेव्हा सासरा रागावला आणि मेलेले पोर तिच्या ओटीत ठेवले आणि तिला रानात हाकलून दिले. 

पुढे जाता जाता मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली `बाई, बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे काय कारण? आलीस तशी लवकर जा. नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकील!'तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, `तेवढयाकरता इथे आले आहे.'झोटिंगची बायको म्हणाली, `एवढी जीवावर उदार का झाली?'

ब्राह्मणाची सून आपली हकिकत सांगू लागली. ती म्हणाली, `मी एका ब्राह्मणाची सून, दरवर्षी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या आजेसासऱ्यांचे श्राद्ध असे. माझे असे झाल्याने ब्राह्मण उपाशी जात. अशी सहावेळा माझी बाळंतपणं झाली. सातव्या खेपेलाही असेच झाले. तेव्हा मामंजींना राग आला आणि ते म्हणाले, `माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला, तू घरातून चालती हो!'असे म्हणत मेलेले मूल ओटीत ठेवून मला घालवून दिले.'

हे सांगून ती रडू लागली. तशी झोटिंगची बायको तिला म्हणाली, `बाई तू भिऊ नकोस. घाबरू नकोस. अशी थोडी पुढे जा. तिथे झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपूरीचा नैवेद्य दाखवतील आणि कोण अतिथी आहे म्हणून विचारतील. असे विचारल्यावर मी आहे असे म्हण. त्या तुला पाहतील, तुझी चौकशी करतील त्यांना तू सगळी हकीकत सांग.'

ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटले आणि तिथून उठून ती पुढे गेली. तिथे बेलाचे झाड पाहिले. इकडे तिकडे पाहिले. शिवलिंग नजरेस पडले. त्याला नमस्कार करून ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. रात्र झाली, तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. अतिथी कोण आहे विचारले. सूनेने उत्तर दिले `मी आहे' तेव्हा सगळ्यांनी पाहिले. त्यांनी तिची चौकशी केली. तिने सगळी हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्या, अप्सरांनी तिची सातही मुले जिवंत केली व तिच्या हवाली केली. पुढे तिला हे व्रत करायला सांगितले. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली व मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितले. 

'हे  व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत. सुखासमाधानात राहतात.' असे त्या म्हणाल्या. तिने सर्वांना नमस्कार केला. मुलांना घेऊन ती समाधानाने घरी परतली. तिने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली. सगळे आनंदून गेले. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. तेव्हापासून ही प्रथा करण्याची प्रथा पडली. 

ही कथा आजच्या काळात विज्ञानवादी लोकांना पटणार नाही. परंतु ज्याप्रमाणे आजच्या काळात बालरोगतज्ज्ञ आहेत, तसेच वैद्यकीय ज्ञान नागकन्या, देवकन्या, अप्सरा यांना नसेल कशावरून? त्यायोगे त्यांनी तिचे व बाळाचे उपचार करून त्यांना परत पाठवले असेल. याचाच अर्थ, सगळी दारे बंद होतात तेव्हा नवे दार उघडते. हे आशेचे दार म्हणजे तत्कालीन व्रत कहाण्या आणि विधी! या व्रताचरणाने कोणालाही अपाय तर नाहीच, उलट एकमेकींना सहाय्य करण्याची वृती अंगी बाणली पाहिजे असा संदेशमिळतो.  हा गर्भितार्थ जरी आपण या कथेतून घेतला, तरी पिठोरी अमावस्येची साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल