शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sarva Pitru Amavasya 2024: सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:45 IST

Sarva Pitru Amavasya 2024: यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण आहे, तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा. 

पितृ पक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होते. ज्यांची श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वांचे श्राद्धविधी सर्वपित्री अमावस्येला केले जातात. यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024) आहे. त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024) देखील आहे. यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधी करण्याबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थित झाल्या होत्या. पितृपक्ष संपत आले, पण आता सर्वपित्रीला श्राद्धविधी करायचे की नाही हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचे उत्तर जाणून घेऊ. 

ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो शिवाय पितृ पक्षातही शुभ कार्य केली जात नाहीत. तर हा काळ केवळ श्राद्ध विधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो. यंदा सर्वपित्री अमावस्येला सूर्य ग्रहण असणार आहे. भले ते भारतातून दिसणार नसले, तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो. त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावे की नाही, याबाबतीत ज्योतिष तज्ज्ञांचे मत जाणून घेऊ. 

सर्व पितृ अमावस्या कधी असते?

हिंदू कॅलेंडरनुसार, अमावस्या तिथी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४० मिनिटांनी सुरू होईल.सर्वपित्री अमावस्या तिथी २ ऑक्टोबर रोजी रात्री १२. १९ मिनिटांनी समाप्त होईल. म्हणजेच ही तिथी २ तारखेचा सूर्योदय पाहणार आहे म्हणून २ तारखेला सर्वपित्री अमावस्या धरली जाईल. तर, सूर्यग्रहण १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४० वाजता सुरू होईल आणि २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल. 

सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे की नाही?

सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असेल परंतु श्राद्ध विधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्र सांगते. त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्वपित्रीला श्राद्धविधी करावे. 

सर्वपित्री अमावस्येचे महत्व

पितृपक्षाचा शेवट सर्वपित्रीने होतो. या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो. या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहित नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरही श्राद्ध केले जाते. म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले आहे. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिषsolar eclipseसूर्यग्रहण