शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

फाल्गुन वद्य षष्ठी: संत एकनाथ महाराजांची समाधी, ४ गोष्टींची थोरवी सांगणारी तिथी; एक पर्वणीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 18:47 IST

Sant Eknath Maharaj Shashti 2026: संत एकनाथ महाराजांनी समाधी घेण्यासाठी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी निवडणे हा योगायोगाचा भाग नाही. तर विचारपूर्वक निवडलेला हा दिवस आहे, असे सांगितले जाते.

Sant Eknath Maharaj Shashti 2026: महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, प्रत्येक संतांची शिकवण कालातीत असल्याचे पाहायला मिळते. इतकी वर्षे लोटूनही संतांनी समाजाला केलेला उपदेश आजच्या काळातही किती तंतोतंत लागू पडतो, याची प्रचिती येते. मराठी वर्षातील शेवटचा महिना फाल्गुन. याच फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतली. त्यामुळे ही फाल्गुन वद्य षष्ठी तिथी एकनाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते. यंदा, सोमवार, ०९ मार्च २०२५ रोजी फाल्गुन वद्य संत एकनाथ षष्ठी आहे. 

पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो, असे सांगितले जाते. फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.

संत ज्ञानेश्वरांची समाधी शोधली, ज्ञानेश्वरीची प्रतही शुद्ध केली

महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी, नारदीय कीर्तनाचे समर्थक आणि प्रसारक संत एकनाथ महाराज. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांनी तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते. तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. संत एकनाथ यांनी अनेक अभंग, काव्यरचना, भारूडे लिहिली. संत एकनाथ यांची ग्रंथसंपदा अगदी विपूल आहे. विस्मरणात गेलेली संत ज्ञानेश्वरांची समाधी शोधण्याचे काम संत एकनाथांनी केले. शिवाय ज्ञानेश्वरीची प्रतही शुद्ध केली. 

मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन

संत एकनाथ महाराजांची ग्रंथसंपदा अगदी अफाट आहे. तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाची प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यवनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाजप्रबोधन व समाजसंघटन केले. भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. संत एकनाथ महाराजांनी समाधी घेण्यासाठी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी निवडणे हा योगायोगाचा किंवा अपघाताचा भाग नाही. तर विचारपूर्वक निवडलेला हा दिवस आहे, असे सांगितले जाते. 

संत एकनाथ महाराजांची समाधी, ४ गोष्टींची थोरवी सांगणारी फाल्गुन वद्य षष्ठी 

संत एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. जनार्दन स्वामींना आत्मसाक्षात्कार फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. जनार्दन स्वामींनी संत एकनाथ महाराजांवर जो अनुग्रह केला, तो दिवसही फाल्गुन वद्य षष्ठीचा होता आणि जनार्दन स्वामी यांनी अवतार समाप्ती केली, ती फाल्गुन वद्य षष्ठीलाच केली. तोच दिवस संत एकनाथ महाराजांनी आपल्या समाधीसाठी निवडावा, हे लक्षणीय आणि अर्थपूर्ण आहे, असे सांगितले जाते.  षष्ठीच्या आदल्या दिवशी नाथ कीर्तन करत  मोठ्या जनसमुदायासह गोदावरी काठी येऊन दाखल झाले. वाटेत जागोजागी आरत्या झाल्या. नाथांचे कीर्तन म्हणजे लोकांचे देहभान हरपण्याची पर्वणीच. नेहमीप्रमाणेच ते शेवटचे कीर्तनही रंगले. भजनाचे फड पडले. नाथ हातात वीणा घेऊन नामस्मरण करू लागले. मध्यरात्र उलटून गेली. भजनाचे स्वरही मंद होत गेले. अशा सर्वजणांच्या अर्धनिद्रा अवस्थेत असण्याच्या काळात नाथांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत प्रवेश केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Falgun Vadya Shashti: Sant Eknath Maharaj Samadhi and its significance.

Web Summary : Sant Eknath Maharaj's Samadhi on Falgun Vadya Shashti is highly revered. This day marks the death anniversary of Sant Eknath. He revived the Bhakti tradition, rediscovered Dnyaneshwar's Samadhi, and purified Dnyaneshwari. The day also marks the birth and enlightenment day of his guru, Janardan Swami. A large gathering occurs in Paithan during this time.
टॅग्स :shree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणAdhyatmikआध्यात्मिक