शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Raksha Bandhan 2022: बहीण डावखुरी असली तरी तिने उजव्या हातानेच भावाला गंध लावणे शुभ ठरते का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:06 IST

Raksha Bandhan 2022: डावखुऱ्या लोकांचे एरव्ही भागून जाते, पण धार्मिक कार्यात, सण समारंभात त्यांना हटकले जाते. तसे करण्याला शास्त्राधार आहे का? ते जाणून घेऊ!

डावखुरेपणा हा काही आजार नाही, तर तो नैसर्गिक सवयीचा भाग आहे. परंतु, विशेषतः धर्म कार्यात एखाद्या डावखुऱ्या व्यक्तीने कामात पुढाकार घेतला, की त्याला अकारण हटकले जाते. ही बाब शास्त्राला धरून आहे की लोकांनी निषिद्ध ठरवली आहे, ते जाणून घेऊया. विशेषतः आता रक्षाबंधन येत असल्याने डावखुऱ्या मुलींसमोर दरवर्षीप्रमाणे हा प्रश्न येईल, म्हणून हे स्पष्टीकरण..!

डावखुरेपणाबद्दल शास्त्रात कुठेही आक्षेप घेतलेला नाही. कारण ती अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु, धर्म कार्यात फुलं वाहताना, पूजा करताना, आचमन घेताना किंवा प्रसाद घेताना उजव्या हाताचा उल्लेख आवर्जून केल्याचे आढळून येते. त्याचे स्पष्टीकरण कुठेही दिलेले नसले, तरी त्यामागील साधा तर्क असा काढता येतो, की जगातील लोकसंख्येच्या १० टक्के लोक डावखुरे असतात. शास्त्राची रचना सर्वसाधारणपणे सर्वांना लागू होईल अशा पद्धतीने केलेली असते. त्यानुसार ९० टक्के लोकांचा विचार करता शास्त्रात उजव्या हाताला प्राधान्य दिले असावे, हा प्राथमिक विचार लक्षात येतो. पण म्हणून, डावखुऱ्या लोकांना गटातून बाहेर काढण्याचे काहीच कारण नाही. 

योगशास्त्राने याबाबत अधिक खुलासा केला आहे, की आपले हृदय शरीराच्या डाव्या बाजूला स्थित असते. त्यावर फार भार पडू नये, म्हणून डाव्या हातावर कामाचा भार कमी टाकला जातो. जड, अवघड कामे उजव्या हाताने उरकली जातात. हिंदीत एक प्रचलित म्हण आहे, 'ये तो मेरे बाए हाथ का खेल है'  म्हणजेच हे सहज होणारे काम आहे. यावरूनही लक्षात येते, की डाव्या हातावर आपण सहजगत्या होणाऱ्या कामाची जबाबदारी टाकतो. 

परंतु जे डावखुरे लोक असतात, त्यांचा निसर्गतः डावा हात अधिक कार्यशील असल्यामुळे साहजिकच त्यांच्या हृदयावर थोडा ताण पडतो. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की डावखुरे लोक उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत सरासरी ७ वर्षे कमी जगतात. मात्र काही डावखुरे लोक दोन्ही हातांचा छान समतोल साधतात. डाव्या आणि उजव्या हाताने व्यवस्थित काम करतात. त्यामुळे त्यांचा मेंदू अधिक कार्यन्वित होतो आणि हे लोक अधिक क्रियाशील आणि सक्षम बनतात. अमिताभ बच्चन, रफेल नदाल, आइनस्टाइन, नेपोलियन आणि हिलरी फोर्ड ही काही डावखुऱ्या लोकांची यादी पाहिली, तर आपणही वरील विधानाशी सहमत व्हाल. यासाठीच डावखुऱ्या मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याकडून दोन्ही हातांनी जास्तीत जास्त सराव करण्याची सूचना दिली जाते. 

धर्माने किंवा शास्त्राने हातांमध्ये भेदाभेद केला नाही. उलट हात जोडताना, अर्घ्य देताना, दान करताना दोन्ही हात जुळून पुढे येतात तेव्हाच कार्याला गती येते. म्हणून व्यक्तीत डावे उजवे न करता सर्वांना सामावून घ्यावे आणि समारंभाचा आनंद दोन्ही हातांच्या ओंजळीने भरभरून घ्यावा आणि द्यावा. तसेच वेड्या बहिणीची वेडी माया समजून घेत तिला दोन्ही हातांनी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात!

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन