शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

'असा' राजयोग तुमच्याही नशिबात असू शकतो, फक्त मन शांत ठेवण्याचा सराव सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:25 IST

मन शांत ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, त्यातील मुख्य फायदा म्हणजे मन शांत असेल तर निर्णय सहसा चुकत नाहीत.

संकट कधी सांगून येत नाही. त्यामुळे कधी, कोणते, कसे संकट ओढावेल आणि आपण त्याला कसे तोंड देऊ याची पूर्वतयारी करणे शक्य नाही. परंतु, अशा कठीण प्रसंगी मन शांत ठेवण्याची तयारी आतापासून करता येईल. रोजच्या छोट्या मोठ्या प्रसंगाना आपण कसे तोंड देतो, यावरून कठीण प्रसंगाला आपण कसे सामोरे जाणार आहोत, याचे स्वत:च स्वत:ला परीक्षण करता येईल. 

एक राजा होता. त्याला अनेक पूत्र होते. राजा वृद्धत्त्वाकडे झुकला होता. राज्याचा पदभार उचित हाती सोपवून त्याला राज्यकारभारातून निवृत्त व्हायचे होते. परंतु, आपल्या अनेक पूत्रांपैकी नेमकी कोणच्या हाती राज्यपदाची सूत्रे द्यावीत, असा राजासमोर संभ्रम निर्माण झाला. राजा आणि राणीचे आपल्या सर्व पूत्रांवर समान प्रेम होते. तरी राज्य सिंहासनावर कोणा एकालाच बसवता येणार होते. ते पद योग्य हातीच गेले पाहिजे असा राजाचा आग्रह होता. राजाने आपल्या पुत्रांची परीक्षा घ्यायची असे ठरवले.

राजाने शाही भोजनाची घोषणा केली. सर्व पूत्रांसाठी भव्य सभामंडपात स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पकवान्नयुक्त भोजन, नृत्य, गाणी, मनोरंजन असा एकूणच माहोल धुंद झाला होता. राजा त्या सभेला हजर न राहता आपल्या राजमहालातून तेथील दृष्याचे अवलोकन करत होता.

राजाच्या सांगण्यावरून त्या सभामंडपात जंगली कुत्री सोडण्यात आली. पहारेकरी घाबरून इतरत्र पळू लागले. उपसस्थित सगळेच जीव वाचवत पळू लागले. काही राजकुमार त्या जंगली कुत्र्यांची शिकार करायला निघाले, तर काही राजकुमार घाबरून राजवाड्याच्या दिशेने पळाले. सगळे चित्र पाहून राजाने घोषणा केली. 'उद्या दरबारात नव्या राजाच्या हाती राज्याची सूत्रे सोपवली जातील.'

सर्व लोकांमध्ये कुतुहल होते, नवीन राजा कोण असेल? दुसऱ्या  दिवशी दरबार भरला. सगळे राजपुत्र हजर होते. राजाने विचारले, `सर्वांना भोजन आवडले का?'

दोघा तिघांनी उठून राग व्यक्त केला, काल घडलेला प्रसंग सांगितला. राजा निराश होऊन म्हणाला, याचा अर्थ भोजनाचा आनंद कोणीच घेऊ शकले नाही?' तेवढ्यात एक राजकुमार उठून म्हणाला, 'पिताश्री भोजन खूप स्वादिष्ट होते. पंगतीपैकी मी एकटा जेवलो. जी कुत्री मला चावण्यासाठी अंगावर येत होती, त्यांना मी माझ्या भोजनावरून उठलेल्या भावांची ताटे पुढे केली. कुत्री जेवली, मी ही जेवलो! भरल्या पोटी ती सुस्तावली आणि मी जेवणावर यथेच्छ ताव मारला.'

राजा खुष झाला, म्हणाला, `याला म्हणतात प्रसंगावधानता! संकट काळात न डगमगता जो मार्ग काढतो, तोच स्वत:चा आणि इतरांचा बचाव करू शकतो. माझ्या या राजपुत्राने छोट्याशा प्रसंगातून मोठी प्रसंगावधानता दाखवली. तोच उद्या राज्यावर आलेले संकट सहज दूर करेल असा विश्वास वाटतो, म्हणून त्यालाच आपण भावी राजा बवनत आहोत. 

असा राजयोग आपल्याही नशीबात यावा असे वाटत असेल, तर मन सदासर्वदा शांत ठेवायला शिका. जे हवे ते सर्व मिळेल.