शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'असा' राजयोग तुमच्याही नशिबात असू शकतो, फक्त मन शांत ठेवण्याचा सराव सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:25 IST

मन शांत ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, त्यातील मुख्य फायदा म्हणजे मन शांत असेल तर निर्णय सहसा चुकत नाहीत.

संकट कधी सांगून येत नाही. त्यामुळे कधी, कोणते, कसे संकट ओढावेल आणि आपण त्याला कसे तोंड देऊ याची पूर्वतयारी करणे शक्य नाही. परंतु, अशा कठीण प्रसंगी मन शांत ठेवण्याची तयारी आतापासून करता येईल. रोजच्या छोट्या मोठ्या प्रसंगाना आपण कसे तोंड देतो, यावरून कठीण प्रसंगाला आपण कसे सामोरे जाणार आहोत, याचे स्वत:च स्वत:ला परीक्षण करता येईल. 

एक राजा होता. त्याला अनेक पूत्र होते. राजा वृद्धत्त्वाकडे झुकला होता. राज्याचा पदभार उचित हाती सोपवून त्याला राज्यकारभारातून निवृत्त व्हायचे होते. परंतु, आपल्या अनेक पूत्रांपैकी नेमकी कोणच्या हाती राज्यपदाची सूत्रे द्यावीत, असा राजासमोर संभ्रम निर्माण झाला. राजा आणि राणीचे आपल्या सर्व पूत्रांवर समान प्रेम होते. तरी राज्य सिंहासनावर कोणा एकालाच बसवता येणार होते. ते पद योग्य हातीच गेले पाहिजे असा राजाचा आग्रह होता. राजाने आपल्या पुत्रांची परीक्षा घ्यायची असे ठरवले.

राजाने शाही भोजनाची घोषणा केली. सर्व पूत्रांसाठी भव्य सभामंडपात स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पकवान्नयुक्त भोजन, नृत्य, गाणी, मनोरंजन असा एकूणच माहोल धुंद झाला होता. राजा त्या सभेला हजर न राहता आपल्या राजमहालातून तेथील दृष्याचे अवलोकन करत होता.

राजाच्या सांगण्यावरून त्या सभामंडपात जंगली कुत्री सोडण्यात आली. पहारेकरी घाबरून इतरत्र पळू लागले. उपसस्थित सगळेच जीव वाचवत पळू लागले. काही राजकुमार त्या जंगली कुत्र्यांची शिकार करायला निघाले, तर काही राजकुमार घाबरून राजवाड्याच्या दिशेने पळाले. सगळे चित्र पाहून राजाने घोषणा केली. 'उद्या दरबारात नव्या राजाच्या हाती राज्याची सूत्रे सोपवली जातील.'

सर्व लोकांमध्ये कुतुहल होते, नवीन राजा कोण असेल? दुसऱ्या  दिवशी दरबार भरला. सगळे राजपुत्र हजर होते. राजाने विचारले, `सर्वांना भोजन आवडले का?'

दोघा तिघांनी उठून राग व्यक्त केला, काल घडलेला प्रसंग सांगितला. राजा निराश होऊन म्हणाला, याचा अर्थ भोजनाचा आनंद कोणीच घेऊ शकले नाही?' तेवढ्यात एक राजकुमार उठून म्हणाला, 'पिताश्री भोजन खूप स्वादिष्ट होते. पंगतीपैकी मी एकटा जेवलो. जी कुत्री मला चावण्यासाठी अंगावर येत होती, त्यांना मी माझ्या भोजनावरून उठलेल्या भावांची ताटे पुढे केली. कुत्री जेवली, मी ही जेवलो! भरल्या पोटी ती सुस्तावली आणि मी जेवणावर यथेच्छ ताव मारला.'

राजा खुष झाला, म्हणाला, `याला म्हणतात प्रसंगावधानता! संकट काळात न डगमगता जो मार्ग काढतो, तोच स्वत:चा आणि इतरांचा बचाव करू शकतो. माझ्या या राजपुत्राने छोट्याशा प्रसंगातून मोठी प्रसंगावधानता दाखवली. तोच उद्या राज्यावर आलेले संकट सहज दूर करेल असा विश्वास वाटतो, म्हणून त्यालाच आपण भावी राजा बवनत आहोत. 

असा राजयोग आपल्याही नशीबात यावा असे वाटत असेल, तर मन सदासर्वदा शांत ठेवायला शिका. जे हवे ते सर्व मिळेल.