शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० हून अधिक फोन, आईनं पाठलाग केला तरीही ते थांबले नाहीत; २ मित्रांचा रहस्यमय मृत्यू
2
“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले…
3
"देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू
4
भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न
5
Maharashtra Politics :"लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक , मी सुधीरला मुंबईत पळवणार"; ठाकरेंची बीएमसीसाठी मोठी तयारी
6
एकदोन नाही तर ५ प्रकार असतात एसआयपीचे; गुंतवणुकीसाठी कोणती फायद्याची?
7
आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी
8
५४६ मुलींचे अश्लील व्हिडीओ, तो कॅफे अन् महाराष्ट्र कनेक्शन... वाराणसी गँगरेप प्रकणात धक्कादायक माहिती उघड
9
Vinesh Phogat : "२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
10
ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करणं आरोग्यासाठी घातक; ‘या’ गंभीर आजारांचा धोका
11
मेजर इक्बाल अन् समीर अली कोण आहेत, शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केला? तेहव्वूर राणा मोठा खुलासा करणार
12
रेल्वेच्या तात्काळ तिकिट बुकिंगची वेळ बदलली आहे का? IRCTC ने स्वतःच केलं स्पष्ट
13
"...म्हणून फारसे हिंदी सिनेमे केले नाही", गश्मीरने सांगितलं कारण; 'छोरी २' मधून केलं हिंदीत कमबॅक
14
कोणत्या खास अभिनेत्रीबद्दल आकर्षण निर्माण झालं का? लक्ष्याने दिलं होतं असं उत्तर की सर्वजण खळखळून हसले
15
भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार
16
"मी माझ्या मुलीला कसं मारू?..."; मुलीनं पळून जाऊन केले लग्न; बापाने स्वत:ला गोळी झाडली
17
दोन भागात विभागली जातेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो विध्वंसक भूकंप, चिंताजनक माहिती समोर
18
तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी कसे लिंक करावे? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या
19
उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल
20
आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा

जो रोज हरिपाठ गाईल त्याचा देह पवित्र होईल; वाचा नित्य हरिपाठ करण्याचे लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:05 IST

ह.भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या आवाजातील हरिपाठाने अनेक भाविकांच्या दिवसाची सुरुवात होते, तो रोज का म्हणावा ते जाणून घ्या!

२६ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ निरूपणार ह.भ. प. बाबामहाराज सातारकर यांना देवाज्ञा झाली. लौकिक रूपाने ते आता आपल्यात नसतील, तरी त्यांची कीर्तन प्रवचन इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय त्यांनी जनमानसात पेरलेले विचार लोकांच्या मनात कायमस्वरूपी रुजले आहेत. आजही अनेक घरात दिवसाची सुरुवात बाबामहाराजांच्या सुस्वरात म्हटलेला हरिपाठ ऐकूनच होते. काय आहे हरिपाठाचे एवढे महत्त्व, तो रोज का म्हटला पाहिजे, त्यामुळे होणारे लाभ कोणकोणते ते सविस्तर जाणून घेऊ. 

हरिपाठ म्हणजे काय?

हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण! संत ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठ रचला. २८ अभंगाची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे. माउली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते, हे गूढ ज्ञान गुरु निवृत्ती नाथ यांनी मला सांगितले, म्हणून हरिपाठाची रचना केली आहे. 

हरिपाठ केल्याने मिळते जपमाळ ओढल्याचे पुण्य 

'देवाचिये द्वारी' या पहिल्या अभंगापासून ते 'विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान या नवव्या अभंगापर्यंत १४ वेळा हरीचा उच्चार होतो. पुढे 'त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी' या अभंगापासून हरिवंशपुराण, हरिनाम संकीर्तन या अभंगापासून २५ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. 'वेदशास्त्र प्रमाण' या अभंगापासून 'ज्ञानदेव प्रमाण' या अभंगापर्यंत १६ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजे एकूण ५४ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसेच दर अभंगानंतर 'हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा' या गजरात परत ५४ वेळा हरी नामाचा उच्चार होतो. अशाप्रकारे माउली आपल्याकडून नकळत १०८ वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जो कोणी रोज हरिनाम घेतात, हरिपाठ म्हणतात त्यांना एक जपमाळ ओढल्याचे पुण्य लाभते. 

वारकरी समुदाय हरिपाठातला २८ वा अभंग म्हणत नाहीत कारण... 

हरिपाठातील २८ वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले २७ अभंग म्हणतात. २७ अभंग झाले की 'नाम संकीर्तन साधन पै सोपे' हा संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग म्हणतात. माउलींनी जो २८ वा अभंग लिहिलाय त्यात म्हटलं आहे की, 'जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरुकृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील. त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल.' 

आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे?

असावे स्वस्थचित्त एकाग्रे मन, उल्हासी करून स्मरण जीवी अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य 

यात माउली हरिनाम कसं करावं आणि त्यामुळे काय लाभ होतो ते सांगतात. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळू हळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतले जाते. अशा साधकाचे भगवंत स्वतः रक्षण करतो. संत दामाजी, संत गोरा कुंभार, संत दसेना, संत सावता माळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत देव धावून गेला, तसा आपल्याही मदतीला येईल. त्यासाठी आपलाही पुण्यसंचय हवा. देव व्यवहारी जगातून आपल्याला ठरतो, शिवाय मृत्यूसमयी हरिनामाचा आठव होतो आणि विषयांचा संग सुटून मोक्ष प्राप्ती होते. 

संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंद मती केवितरे श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव।।

या नामाची प्रतीची आजवर अनेक संतांनी घेतली आहे. म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक, निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्याला या भवतापातून नक्की सोडवेल.