शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:24 AM

जगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन यश व अपयशाने भरलेले असते. माणसाला जीवनात यशाची शिखरे सतत साद घालत असतात, पण माणूस भूतकाळातील अपयशाने होरपळून निघालेला असतो.

- मोहनबुवा रामदासीनिश्चयेवीण सर्वकाही। अनुमान ते प्रमाण नाही।व्यर्थची पडिले प्रवाही। संदेहाचे।।जगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन यश व अपयशाने भरलेले असते. माणसाला जीवनात यशाची शिखरे सतत साद घालत असतात, पण माणूस भूतकाळातील अपयशाने होरपळून निघालेला असतो. त्यामुळे त्याच्या मनात निश्चय घेण्याचे धाडस डळमळीत असते. प्रत्येक व्यक्तीच्या अशा अपेक्षा भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात. कुणाला ईश्वराचा भक्त व्हायचे असते. कुणाला झटपट श्रीमंत व्हायचे असते. कुणाला समाजात मानसन्मानाची हाव सुटलेली असते. एक ध्येय निश्चित नसल्याने त्यांची स्थिती भांबावलेली दिसते. त्यामुळे अनेकजण अस्वस्थ दिसतात. ध्येयाची निश्चिती झाली तरी त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा हेच त्याला समजत नाही. कोणता मार्ग स्वीकारावा व कोणता मार्ग स्वीकारू नये याबाबतीत त्याच्या मनात सारखा संशयकल्लोळ माजलेला दिसतो. म्हणून समर्थ म्हणतात:व्यर्थ संशयाचे जिणे। व्यर्थ संशयाचे धरणे।व्यर्थ संशयाचे करणे। सर्व काही।।मनातील संशयाचा विवेकाने त्याग करून उच्चतम ध्येयाच्या प्राप्तीचा दृढनिश्चय होत नाही तोवर सर्वच व्यर्थ आहे. जोपर्यंत मनाचा पक्का निश्चय होत नाही तोपर्यंत बोलाचा भात व बोलाची कडी अशीच अवस्था होते. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ज्या श्री समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना म्हटले होते....निश्चयाचा महामेरू।बहूत जनांसी आधारू।अखंड स्थितीचा निर्धारू।श्रीमंत योगी।।त्या छत्रपतींचे आम्ही आज्ञाधारक मावळे आहोत, तर छत्रपतींचा हा निश्चयात्मक स्वरूपाचा बाणा प्रत्येक मावळ््याच्या अंत:करणात असलाच पाहिजे. आपला भारत देश अशा दृढनिश्चयी, करारी आणि वीर पुरुषांची ओळख असणारा देश आहे. आपल्या देव, देश व धर्माची निश्चयात्मक अशी अस्मिता जपूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक