शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

Nirjala ekadashi 2021: निर्जला एकादशीचे व्रत करा आणि उर्वरित तेवीस एकादशींचे पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:29 PM

Nirjala ekadashi 2021: ऐन पावसाळ्यात या व्रतांचे आयोजन हे समाजभान राखण्याच्या दृष्टीनेच केले असावे. 

ज्येष्ठ मासातील आणखीन एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. यंदा २१ जून रोजी म्हणजे येत्या सोमवारी निर्जला एकादशी आहे. हिला `भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. यासंबंधीची एक कथा आहे.

भीमाला भूक आवरत नसे. साहजिकच इच्छा असूनही तो उपवास करू शकत नव्हता. त्यामुळे खिन्न होऊन एके दिवशी त्याने आपली ही व्यथा व्यासांना सांगून उपाय विचारला. त्यावेळेस व्यासांनी त्याला `निर्जला एकादशी' चे व्रत करण्याचा सल्ला दिल. ही एकच एकादशी केल्याने इतर तेवीस एकादशी केल्याचे फळ मिळते. त्याप्रमाणे भीमाने ही एकादशी आनंदाने आणि भक्तीपूर्वक केली. 

गुजरातमध्ये या एकादशीला भीम एकादशी असे दुसरे नावही प्रचलित आहे. तशीच आणखीन एक प्रथाही गुजराथी मंडळी पाळतात. ती म्हणजे अजीर्ण-अपच या शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळावी, म्हणून या दिवशी उपास करतात. शिवाय भीमाचे नाव घेऊन दिवसभरात शक्य होईल तेवढ्या वेळा पोटावरून हात फिरवायचा. मात्र ही प्रथा केवळ गुजरातपुरतीच मर्यादित आहे. 

संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले, तर सर्व एकादशीचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आजही टिवूâन आहे. या दिवशी आचमनाखेरीज काहीही न खातापिता उपास करावा. रात्री विष्णूच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. गायन, नृत्य करून त्या रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णूंची यथासांग पूजा करून, गरजूंना दान दक्षिण देऊन मग उपास सोडावा. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्य प्राप्त होत़े 

आजच्या धकाधकीच्या जीवनात, अनेक व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही. त्यामुळे पूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही, तर निदान फक्त फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा. 

निर्जला एकादशीचा आदला दिवस हा गंगादशहरा चा आणि दुसरा दिवस निर्जला एकादशीचा. या दोन्ही दिवसांत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी सांगड घालून दिली आहे. जलाचे महत्त्व जाणून त्याची पूजा करावी आणि निसर्गासमोर नतमस्तक व्हावे, हा त्यामागचा शुद्ध भाव आहे.  

असे म्हणतात, की ज्याने मैलोनमैल पायी चालून पाणी भरण्याचा सराव केला असेल, त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची किंमत दुसरे कोणीही समजू शकत नाही. निसर्गाने सहल उपलब्ध करून दिलेले पाणी हे नासवण्यासाठी नसून त्याची बचत करणे हे आपले कर्तव्य आहे, याचे भान करून देणाऱ्या या दोन तिथी आहेत. ऐन पावसाळ्यात या व्रतांचे आयोजन हे समाजभान राखण्याच्या दृष्टीनेच केले असावे. 

या औचित्याने गरजू लोकांना जलदानाच्या निमित्ताने छत्री, ताडपत्री, रेनकोट, उबदार कपडे यांचे दानही करता येईल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हीच तर आपल्या धर्माची खरी शिकवण आहे...!