शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

‘नाम’ हेचि गुप्तधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:02 IST

परमात्म्यावर  पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर कोणत्याही जीवाला कधीही दु:ख करण्याची वेळ येत नाही.

 जन्मोजन्मिची तळमळी लागून जे हाती येते ते ‘गुप्तधन’ म्हणजे भगवंताचे नाम. एकदा का नामाची तळमळ लागली, की ते घ्यायला जीव आसूसतो. नामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, मनन आणि चिंतन करायला हवे. परमात्म्यावर  पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर कोणत्याही जीवाला कधीही दु:ख करण्याची वेळ येत नाही.मनुष्याच्या जीवनात शाश्वत आनंद परमात्म्याविणा कुठेही मिळत नाही आणि मिळणेही शक्य नाही. त्यामुळे मनुष्य जीवनात इतर कारणाने शाश्वत आनंद शोधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ आहेत.शाश्वत आनंदासाठी, मला परमात्मा हवा, असेच प्रत्येक जीवाचे चिंतन असले पाहिजे. तीच आपली भक्ती आणि धारणा देखील असायला हवी. कारण भौतिक सुखाच्या नादापायी  मनुष्य खरोखर आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. त्याच वस्तूंचे तो चिंतन करतो आणि ध्यासही धरतो. परंतू वस्तू ही सत्य नाही. त्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. म्हणूनच तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.  खरा आणि शाश्वत आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. म्हणूनच प्रत्येक जीवाने आपले मन परमात्म्याच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा.  कधी तो सुखात राहील तर कधी दु:खात राहील; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. आपण परमात्म्याजवळ आनंद मागावा. त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तू रहितच असतो. आनंद जोडणाºया गोष्टींचा आपण विचार करूनच नामस्मरण करावे. काल जे झाले त्याबद्दल दु:ख करू नये; उद्या काय होणार याची काळजी करू नये; कारण  परमात्म्याला जे आपल्याला द्यायचं आहे. तो ते निश्चितपणे देणार आहे. भाग्यात असलेलं परमात्मा आणि सृष्टी आपणास कोठूनही आणुन देणार आहे आणि जे आपल्याला मिळालेलं नाही, ते आपल्या प्रारब्धात नव्हतं. जे आपणाला मिळालं नाही, त्याचं दु:ख करू नये. याउलट जे मिळालं आहे, त्याचेच मोल करावे. कोणत्याही परिस्थितीत जीवनात धीर सोडून नये.नाम संकिर्तन हा सर्व पाप नाशनाचा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच, नामाचा जीवाला चट्का लागायला हवा. नामाचा जीवाने ध्यास घ्यायला हवा. कारण हरिनाम नसलेले जीवन कोरडी विहिर, फळ न देणारे झाडं आणि दुध न देणाºया गायीप्रमाणेच आहे.

शेवटी...सुमीरन करले मेरे मना...तेरी बीती उमर हरि नाम बिना...

-शून्यानंद संस्कारभारती* खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक