शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

येथे अजुनही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हदय, आहे फारच रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:55 IST

शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोके देखील थांबतात, परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. तुमचा यावर विश्‍वास बसणार नाही, पण पुराणात आणि काही घटनांमध्‍ये दिलेल्‍या माहिती या सत्‍यासमोर तुम्ही देखील नतमस्तक व्हाल.

जगभरासाठी भारत हे श्रद्धेचे केंद्र आहे. भारतात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत. या मंदिरांचे रहस्य वैज्ञानिक सुद्धा शोधू शकलेले नाहीत. आम्ही आज तुम्हाला अशाच एका गुपिताबद्दल सांगणार आहोत. भारतात असे एक रहस्यमय मंदिर आहे, जिथे आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते. शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोके देखील थांबतात, परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. तुमचा यावर विश्‍वास बसणार नाही, पण पुराणात आणि काही घटनांमध्‍ये दिलेल्‍या माहिती या सत्‍यासमोर तुम्ही देखील नतमस्तक व्हाल.

द्वापर युगात भगवान श्री हरी श्री विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले, तेव्हा ते त्यांचे मानव रूप होते. सृष्टीच्या नियमांनुसार, प्रत्येक मानवाप्रमाणे, या स्वरूपाचा मृत्यू निश्चित होता. महाभारत युद्धाच्या ३६ वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाने देह सोडला. जेव्हा पांडवांनी त्यांचे अंतिम संस्कार केले, तेव्हा श्रीकृष्णाचे संपूर्ण शरीर अग्नीत दहन झाला, परंतु त्यांचे हृदय धडधडत होते. अग्नी ब्रह्मदेवाचे हृदय जाळू शकला नाही. हे दृश्य पाहून पांडव स्तब्ध झाले. तेव्हा आकाशातून आवाज आला की हे ब्रह्मदेवाचे हृदय आहे, ते समुद्रात वाहू द्या. यानंतर पांडवांनी भगवान श्रीकृष्णाचे हृदय समुद्रात सोडले.

ओडिशातील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिरात भाऊ बलदौ आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत बसलेल्या भगवान कृष्णाशी अनेक रहस्ये जोडलेली आहेत. हे मंदिर अतिशय चमत्कारिक आहे. या मंदिरासमोर आल्यावर वाऱ्याची दिशाही बदलते. असे म्हणतात की वारा आपली दिशा बदलतात, कारण त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आत जाऊ शकत नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत एक पाऊल टाकताच समुद्राचा आवाज थांबतो. मंदिराचा ध्वजही नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो.

श्री जगन्नाथ मंदिरातील मूर्तीमध्ये आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय आहे. परमेश्वराच्या हृदयाच्या या भागाला ब्रह्म पदार्थ म्हणतात. भगवान श्री जगन्नाथाची मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनविली जाते आणि दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथजींची मूर्ती बदलल्यावर जुन्या मूर्तीतून हा ब्रह्म पदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो. जेव्हा हा विधी केला जातो, तेव्हा त्या वेळी संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते. यानंतर, मूर्ती बदलणारा पुजारी देवाचा चेहरा बदलतो. या मूर्तीखाली आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते, असे म्हटले जाते.

भगवान श्रीकृष्णाचे हृदय बदलताना पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हातात हातमोजे घातले जातात. चुकून कुणी पाहिले, तर त्याचा मृत्यू होतो, अशी यामागे श्रद्धा आहे. त्यामुळे विधी करण्यापूर्वी पूर्ण दक्षता घेतली जाते. मूर्ती बदलणारे पुजारी सांगतात की, जेव्हा ही प्रक्रिया केली जाते, त्या वेळी ससा उडी मारल्याचा भास होतो.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषTravel Tipsट्रॅव्हल टिप्स