शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

देवाने काय दिले नाही, याऐवजी काय दिले आहे, याचा विचार करायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 2:01 PM

कठीण काळात मदत करता आली नाही, तर विनाकारण चिथवु नका!

एक अपंग भिकारी रस्त्याच्या कडेला भीक मागत बसलेला असतात. तिथेच काही अंतरावर एक तरुण मुलगा आपल्या मित्राची वाट बघत उभा असतो. मित्र येईपर्यंत तो भिकाऱ्याचे निरीक्षण करत असतो. आपला वेळ घालवण्यासाठी तो भिकाऱ्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, `तुला मी काही विचारले तर चालेल का?'`चालेल विचारा!'

`तुला दोन्ही हात नाहीत, लोक तुला भीक टाकून निघून जातात, पण या पैशांच्या मोबदल्यात तुला अन्न कोण देते?'`याच परिसरात आणखी एक भिकारी आहे. तो अन्न मागून आणतो, त्या मोबदल्यात त्याला मी जमलेले पैसे देतो. तो मला अन्न देऊन निघून जातो.' `अच्छा! पण तुला तर हात नाहीत, मग समोर ठेवलेले अन्न तू कसे खातोस?'`मी रस्त्याने येणाजाणाऱ्यांना म्हणतो, तुमचे दोन्ही हात सलामत राहोत, पण मला कोणीतरी दोन घास भरवा. हे ऐकून अनेक जण दुर्लक्ष करतात, तर काही जण भरवायला येतात. अगदी सलग दहा दिवस येतात. त्यामुळे रोजची सोय होते.'`हे झाले भूकेचे, पण तहानही लागत असेल ना? मग?'`माझ्याकडे पाण्याचा माठ आहे. तो माठ मी थोडा तिरपा करुन परसरट भांड्यात पाणी ओततो आणि जनावरांसारखे जीभ लावून पाणी पितो.'`तुला घर दार नाही, मग इथल्या घाणेरड्या परिसरात तुला झोपेत डास चावत असतील नाही? हात नसताना तू कसे निभावतोस?'`त्याही बाबतीत मी प्राण्यांसारखा जमिनीवर लोळून कंड शमवतो. जसे जमेल तसे आयुष्य जगतो.'`पण या जगण्याला का जगणे म्हणायचे? तुझे जीवन, तुझा देह व्यर्थ आहे, असे नाही का वाटत?'

इतकावेळ शांत बसलेला भिकारी चिडतो आणि म्हणतो `मला देवाने जे दिले आहे, त्यात मी समाधानी आहे. याउलट धडधाकट शरीर असणारे तुमच्यासारखे लोक दुसऱ्याची मदत तर करत नाहीच, शिवाय त्यांची खिल्ली उडवायलाही धजावत नाहीत. तुमच्यासारख्या लोकांना संपूर्ण देह मिळून काय उपयोग झाला? त्यापेक्षा अपंग असूनही मी बरा. मी कधीच देवाकडे तक्रार करत नाही. संकटात संधी शोधत असतो आणि शांत निरोगी आयुष्य जगत असतो.