शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Gautam Buddha Panchsheel: सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:40 PM

Gautam Buddha Panchsheel: गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशील कोणते? चांगले जीवन जगण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या...

सुखी, समृद्धी आणि आनंददायी जीवनासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. कोणत्याही वयोगटातील, समाजाच्या कोणत्याही स्तरातील व्यक्तीला शांततामय आणि चांगले जीवन हवे असते. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. ताण-तणाव विरहीत जीवन जगता यावे, यासाठी माणूस कायम काही ना काही करत असतो. आपल्याला सुख, समाधान मिळाले आले नाही, तर किमान आपल्या मुलांना मिळावे, म्हणून मेहनत, परिश्रम घेत असतो. जीवनात सुख, समृद्धी, आनंद हवा असेल, तर गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पाच गोष्टींचे आचरण, पालन आवर्जुन करावे, असे म्हटले जाते. खुद्द गौतम बुद्धांनी एका प्रसंगात त्या पाच गोष्टी कोणत्या हे समजावून सांगितले आहे. जाणून घेऊया...

मर्यादेचे ‘लॉक’ आणि अपेक्षा ‘डाऊन’; सुखी, समृद्ध जीवनाचे सोपान

यश नावाचा एक तरुण बनारस येथील श्रीमंत घरात, अगदी सुखात वाढला होता. त्याच्या वडिलांचे नाव श्रेष्ठ होते. यशच्या घरात सुख, सोयी, समृद्धी यांची बिलकूल कमतरता नव्हती. एका रात्री मित्रांसोबत जेवण केल्यानंतर नृत्य पाहता पाहता तेथेच त्याचा डोळा लागला. मध्यरात्री अचानक त्याला जाग आली. पाहतो तर, त्याचे मित्र नर्तकींसोबत बेधुंद अवस्थेत पडले होते. ते दृश्य पाहून त्याला या सर्व प्रकाराची घृणा वाटू लागली. तत्काळ तो तेथून निघाला आणि वाट मिळेल तेथे धावत सुटला. जंगलात खूप वेळ भटकल्यानंतर एका झाडाखाली गौतम बुद्ध ध्यानस्थ बसलेले दिसले. यश त्यांच्यापाशी गेला आणि गौतम बुद्धांना सांगू लागला की, या जगात सर्वकाही घृणास्पद आहे. चांगले काहीच नाही.

यशचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. नेमका प्रकार जाणून घेतला आणि गौतम बुद्ध त्याला म्हणाले की, जगभरात अनेकविध चांगल्या गोष्टी आहेत. वृक्षांची सुंदरता पाहा. नदी, पर्वत, तारे-तारका, चंद्र आणि सूर्यही पाहा. पक्षांची किलबिल, वाऱ्याचा मंजूळ ध्वनी, खळाळत्या पाण्याचा नाद. या सर्वांतून आपल्याला निखळ, निर्मळ आनंद मिळतो. निसर्गाच्या या अद्भूत सौंदर्याला अजून आपण नीटसे पाहिलेले दिसत नाही. केवळ आजूबाजूच्या गोष्टींवरून तर्क लावणे चुकीचे आहे. आपल्या जीवनातील दुःख हे चुकीचे आचरण आणि चुकीच्या धारणा यांमुळे अधिक येते, असे गौतम बुद्ध म्हणाले. 

'हे' आहेत समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ११ मारुती

यशचे वडील त्याला शोधत शोधत आले. गौतम बुद्धांच्या विचारांनी तेही प्रभावित झाले आणि त्या दोघांनी बुद्धांचे शिष्यत्व पत्करले. सुखी जीवन जगायचे असेल, तर कोणत्या गोष्टींचे आचरण आवश्यक आहे, असे गौतम बुद्धांना विचारले असता, ते म्हणाले की, अहिंसा, अचोर्य म्हणजे चोरी न करणे, इंद्रिय भोग विरक्ती, असत्य कथन न करणे आणि मदिरा म्हणजेच उत्तेजक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे. या पाच गोष्टींचे आचरण केल्यास आपण नेहमी सुखमय जीवन जगू शकाल, असे गौतम बुद्धांनी सांगितले. गौतम बुद्धांच्या याच आचरणांना पंचशील म्हटले जाते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी