शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

Kaal Sarpa Dosha Upay: कुंडलीत कालसर्प दोष कसा तयार होतो, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि बिनखर्चिक उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 13:28 IST

Kaal Sarpa Dosha Upay: कालसर्प दोषासंबंधी अनेकांच्या मनात गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे उपाय जाणून घ्या

ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष हा अत्यंत हानिकारक योग मानला गेला आहे. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा काल सर्प दोष तयार होतो. त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. या दोषाचे निराकरण करण्याचे काहीच उपाय नाहीत का? आहेत! त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

कालसर्प दोषाची लक्षणे

१) ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्याला स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात. इतकंच नाही तर त्यांना स्वतःच्या जीवाला धोका असल्याचेही स्वप्न दिसते. 

२) ज्या व्यक्तीच्या जीवनात काल सर्प दोष असतो त्याला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो आणि गरजेच्या वेळी एकटेपणा जाणवतो.

3) कालसर्प ग्रस्त व्यक्तीच्या व्यवसायावर, आर्थिक उत्पन्नावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे व्यवसायात वारंवार तोटा सहन करावा लागतो.

4) स्वप्नात साप दिसणे किंवा सर्प दंश झाल्याचे भास होणे, हे देखील कालसर्प योग असल्याचे लक्षण आहे. 

५) जोडीदारासोबत प्रत्येक विषयावर वाद होणे, मतभेद होणे, काडीमोड होण्याची परिस्थिती निर्माण होणे, हे कालसर्पाचे दुष्परिणाम आहेत. 

६) काल सर्प दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. यासोबतच वारंवार डोकेदुखी, त्वचारोग इत्यादीही कालसर्प दोषाची लक्षणे आहेत.

कुंडलीत काल सर्प दोष कधी तयार होतो?

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा काल सर्प योग तयार होतो. तशी ग्रहस्थिती थांबवणे आपल्या हाती नाही, मात्र तशी परिस्थिती निर्माण झाली असता ती हाताळणे आपल्या हाती आहे. त्यासाठी जाणून घ्या उपाय. 

काल सर्प दोषाचा प्रभाव कमी करण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊया.

1) काल सर्प दोष असलेल्या व्यक्तीने दर सोमवारी घरी किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा.

२) प्रदोष तिथीच्या दिवशी शिवमंदिरात रुद्राभिषेक करणेही लाभदायक ठरते.

3) याशिवाय संबंधित व्यक्तीने दररोज कुलदैवतेची पूजा करावी. तसेच शक्य होईल तेव्हा कुलदेवीचे तसेच कुलदेवतेचे दर्शन घ्यावे. 

४) प्रदोष काळात महामृत्युंजय मंत्राचा जप रोज किमान १०८ वेळा करावा.

5) याशिवाय दररोज ११  वेळा हनुमान चालिसाचे किंवा हनुमान स्तोत्राचे ११ वेळा पठण करावे.

काल सर्प दोष निवारणासाठी पूजेचे फायदे

1) जर एखाद्या व्यक्तीने कालसर्प दोष निवारण्यासाठी पूजा केली तर त्या वैयक्तिक कामात अडचणी येत नाहीत. २) काल सर्प दोष पूजेनंतर व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुधारते. घरात आनंदाचे वातावरण राहते.३) त्याचबरोबर तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढते.४) चांगले मित्र भेटतात आणि तुमच्या विकासात त्यांचा हातभार लागतो. ५) व्यवसायात येणाऱ्या अडचणी संपतात आणि व्यवसाय वाढू लागतो.५) नोकरदारांना पद प्रतिष्ठा मिळते आणि त्यांच्या पदावर प्रगती होते.६) आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळेल.

कालसर्प दोष पूजा विधि

1) कालसर्पापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजेच्या दिवशी उपास करावा आणि ब्रह्मचर्य पाळावे.२) यानंतर शिवलिंगाचा रुद्राभिषेक करावा.३) महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ४) नाग देवतेची पूजा करून नागाच्या मूर्तीला दूध अर्पण करावे.५) नाग गायत्री मंत्राचा जप करा - "ओम नागकुलाय विद्महे विषदन्तया धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात"।६) तुम्ही "ओम नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप देखील करू शकता.७) नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने काल सर्प योगाचा प्रभाव कमी होतो.८) याशिवाय अनेक तीर्थक्षत्री कालसर्प दोष निवारणाची शांती केली जाते, ती देखील तुम्ही करू शकता. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष