शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Jaya Ekadashi 2023: कुटुंबातील एका व्यक्तीने जरी जया एकादशीचे व्रत केले, तरी इतरांना मरणोत्तर सद्गती प्राप्त होते; वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:24 IST

Jaya Ekadashi 2023: १ फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे. या एकादशीचे महत्त्व भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. आपणही ते जाणून घेऊया!

जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. या एकादशीचे महत्त्व महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते आणि त्यामागची पौराणिक कथादेखील सांगितली होती. ती कथा आणि या व्रतामुळे होणारे लाभ जाणून घेऊ. तसेच या व्रताचा भूत पिशाच्चांशी नेमका काय संबंध आहे तेही जाणून घेऊ. 

पितरांना भूत-पिशाच योनीपासून मुक्ती मिळते

जया एकादशीचे व्रत केल्याने आत्म्यांना भवसागरातून मुक्ती मिळते. दुर्दैवाने कोणी पूर्वज भूत-पिशाचाच्या रूपात पृथ्वीवर फिरत असतील तर कुटुंबातील सदस्याने जया एकादशीचे व्रत पाळल्यास, नियमानुसार पूजा करून कथा ऐकल्यास त्याला मुक्ती मिळते. पितृदोष दूर झाला की कुटुंबाला अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. म्हणून या व्रताचे महत्त्व अधिक आहे. 

जया एकादशी व्रत कथा

पद्म पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जया एकादशी व्रताची कथा सांगितली. यानुसार देवराज इंद्रासह सर्व देव स्वर्गात सुखाने राहत होते. एके दिवशी इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदरवनात फिरत होते, अप्सरा पुष्पावती आणि गंधर्व माल्यवानही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे गंधर्व मल्ल्यावानांना पाहून अप्सरा पुष्पावती मोहित झाली. मल्ल्यावानही मंत्रमुग्ध झाले. दोघेही इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी नाचत आणि गात असले तरी. पण दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले आणि गाणे आणि नृत्यात लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. तेव्हा इंद्रदेवाने दोघांना शाप देऊन पृथ्वीवर पिशाचाच्या रूपात जन्म घ्याल असा शाप दिला. 

शापामुळे मल्ल्यावान आणि पुष्पावती दुःखदायक जीवन जगू लागले. दरम्यान, माघ शुक्ल पक्षातील जया एकादशीच्या दिवशी शोकाने व्याकूळ झालेल्या माल्यवान आणि पुष्पावती यांनी काहीही न खाल्ल्याने संपूर्ण रात्र पिंपळाच्या झाडाखाली जागून काढली, भगवान विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंच्या कृपेने त्यांची पिशाच्च योनीतुन सुटका झाली आणि त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे पुन्हा खुली झाली. 

हे व्रत कसे करावे? 

हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले, तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते.