शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

Janmashtami 2021 : श्रावण वद्य अष्टमीला कृष्णजन्म सोहळा का आणि कसा साजरा करतात याची सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 13:38 IST

Janmashtami 2021: भारतीय संस्कृतीत सर्व देवादिकांमध्ये श्रीकृष्णाला मानाचे व आदराचे स्थान असून कृष्ण नीती ही भारताला दिलेली अमूल्य ठेव आहे. माणसाने त्याप्रमाणे वागल्यास त्याचे आयुष्य सुखी होते यात शंका नाही. 

श्रीकृष्णाचे जीवनचरित्र अद्भुत व रोमांचकारी असून तो विष्णूचा आठवा अवतार आहे. त्याचे स्मरण म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी कृष्णाचा जन्मदिन झाल्यावर त्याचे पूजन तसेच कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसऱ्या दिवशी दहीहंडी, गोपाळकाला व पारण्याचा आनंद भक्त लुटतात. 

भारतीय संस्कृतीत सर्व देवादिकांमध्ये श्रीकृष्णाला मानाचे व आदराचे स्थान असून कृष्ण नीती ही भारताला दिलेली अमूल्य ठेव आहे. माणसाने त्याप्रमाणे वागल्यास त्याचे आयुष्य सुखी होते यात शंका नाही. 

भगवान विष्णूने धर्माचे रक्षण करण्याकरीता ज्या दिवशी श्रीकृष्णस्वरूपात अवतार घेतला तो दिवस म्हणजेच गोकुळाष्टमी! श्रीकृष्णाचा मामा कंस, त्याने प्रजेला खूप छळले होते. कृष्णाने त्याचा वध करून आपल्या आई वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. पुढे याच श्रीकृष्णाने जरासंध, शिशुपाल या राक्षसांना पण ठार केले. कौरव, पांडव युद्धात कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे आपल्याला वरचेवर स्मरण व्हावे म्हणून सर्व ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साहाने साजरा करतात. 

ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो, ते लोक उपास करातात. रात्री बारा वाजून चाळीस मिनीटांनी कृष्णाचा जयघोष करून जन्म साजरा करतात व दुसऱ्या दिवशी पारणे करतात.

Janmashtami 2021 : गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवू नयेत? या प्रथेमागची कथा!

या उत्सवाचा धार्मिक विधी पुढीलप्रमाणे :

श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करावा. श्रीकृष्णाचे देवायल नसल्यास श्रीनारायणाचे देवालयात जन्मोत्सव करतात. मोठमोठ्या शहरात अन्य मंदिरातही जन्मोत्सव केला जातो. रात्री कीर्तन, मंत्रश्रवण, भजन, पुराण वगैरे यथासंभव कार्यक्रम करतात. बालगोपाल मित्रमंडळी नाचत नाचत वाद्य वाजवीत 'गोविंदा आला रे आला' किंवा नुसते `गोविंदा रे गोपाळा' असे म्हणत कृष्णदर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात. 

श्रावण वद्य नवमीला 'दहीकाला' असे म्हणण्याची प्रथा आहे. या दिवशी पुष्कळ गावातून, खेड्यापाड्यातून घरोघरी बालगोपाळ मंडळी नाचत असतात. नाचत असताना त्यांच्या अंगावर ताक, दही कढत पाणी व थंड पाणी ओतण्याची पद्धत आहे. काही हौशी लोक आपले घरी हंडी बांधतात व ती बालगोपालांकरवी फोडतात. सर्व गावात नाचून झाल्यावर कृष्णमंदिरात जाऊन तेथील हंडी फोडतात. त्या वेळी काही ठिकाणी भुईमुगाच्या शेंगा उडवण्याची प्रथा असते. चुरमुरे, फुटाणे, लाह्या, मीठ, मिरची, साखर इ. जिन्नस घालून काला केला जातो व तो सर्वांना वाटला जातो. 

मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. बाहेरगावचे अनेक जण हा उत्सव पाहण्यासाठी मुद्दाम हजेरी लावतात.

'७०० वर्षं जगणार' असे ज्योतिषांनी भाकीत करूनही संजीवन समाधी घेतलेले राघवेंद्र स्वामी यांची आज पुण्यतिथी!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल