शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

'उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म' असे आपण म्हणतो तर या यज्ञकर्माचे १० नियमही पाळलेच पाहिजेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 16:15 IST

अन्नाचा अपमान हा परमेश्वराचा, शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि अन्न रांधून वाढणाऱ्या गृहिणीचा अपमान असतो. म्हणून अन्न सेवन करताना हे नियम जरूर पाळावेत.

भूक लागली की आपली हातातोंडाची गाठ पडते. परंतु, ही सवय योग्य नाही. स्वतःवर संयम हवा. आधाशाप्रमाणे अन्नग्रहण करणे उचित नाही. म्हणून समोर पंचपक्वान्नयुक्त ताट असो नाहीतर पिठले भाकरी, दोन वेळचे जेवण ज्याच्या कृपेने मिळत आहे, त्या अन्न दात्याचे म्हणजे परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे आणि ते शिजवून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायचे संस्कार आपल्यावर घातले आहेत. म्हणून 'वदनी कवळ घेता' हा श्लोक म्हणून ईश्वरत्त्व त्या अन्नात मिसळल्यावर आपण अन्न सेवन करतो. याबरोबरच आणखीही काही नियम भारतीय संस्कृतीने सांगितले आहेत. त्यापैकी मुख्य नियम १० नियम पुढीलप्रमाणे- 

>> जेवताना पायात चप्पल, बूट घालू नये. भारतीय संस्कृतीत पाटावर मांडी घालून बसण्याची प्रथा आहे. मात्र पाश्चात्य संस्कृतीत टेबल खुर्चीचा वापर केला जात असल्याने जेवताना सर्रास पादत्राणे घातली जातात. परंतु आपण अन्नाला पूर्णब्रह्म मानतो, म्हणून त्याचा अपमान होऊ नये याकरिता चप्पल, बूट यांचा जेवताना वापर टाळावा. तसेच चपलेला लागलेली माती, घाण जेवणाच्या ठिकाणी येऊ नये, हादेखील त्यामागील हेतू आहे. 

>> अंघोळ केल्याशिवाय जेवू नये. अन्यथा अन्न सेवन करून प्रज्वलित झालेला जठराग्नी मंद होतो आणि पचनात बिघाड होऊन पचन क्रिया मंदावते. म्हणून अंघोळ झाल्यावरच अन्न सेवन करावे. 

>> अन्नाला नावे ठेवू नये. अन्नाचा अपमान हा परमेश्वराचा, शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि अन्न रांधून वाढणाऱ्या गृहिणीचा अपमान असतो. म्हणून अन्नाला नावे ठेवू नये आणि पदार्थ नावडते असतील तरी नाक मुरडू नये. कारण, आजही जगात अनेक असे लोक आहेत, ज्यांना आवडते पदार्थ दूरच, पण दोन वेळच्या जेवणाचीही सोय नसते. ही बाब लक्षात ठेवून मुकाट्याने जेवावे. 

>> जेवताना बोलू नये. आपल्या तोंडातले अन्न कण दुसऱ्याच्या ताटात पडतात किंवा तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे बघणाऱ्याला ते फार ओंगळवाणे वाटते. म्हणून जेवताना बोलू नये. प्रत्येक पदार्थाचा, चवीचा, रसांचा आस्वाद घेत जेवावे. 

>> जेवायला बसताना अन्न मिळाले म्हणून आणि जेवून उठतात आजची पोटाची सोय झाली म्हणून ईश्वराचे आभार मानत ताटाला नमस्कार करावा. 

>> पंगतीत किंवा चार चौघांबरोबर जेवायला बसताना आपले जेवून झाल्यावर उठून जाऊ नये, हा शिष्टाचार आहे. दुसऱ्यांचे होईपर्यंत थांबावे. म्हणजे त्यांना ओलांडून जाण्याची वेळ येत नाही आणि त्यांचा अपमानही होत नाही. 

>> जेवताना तुटलेली ताटे, वाट्या, भांडी, पेले वापरू नयेत. ते दारिद्रयाचे लक्षण मानले जाते. 

>> जेवताना पाटावर बसावे. कारण भोजनाला यज्ञ म्हटले जाते. 'उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म', म्हणजेच यज्ञात आहुती टाकताना जसे आसन घेऊन किंवा पाट मांडून बसतो, तसे अन्न ग्रहण करताना तो यज्ञकर्म आहे समजून पाटावर जेवायला बसावे. 

>> केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर भोजन केले असता, त्यातील आयुर्वेदिक घटक शरीराला लाभदायक ठरतात. पाण्याचा अपव्यय टळतो आणि उष्टी, खरकटी पाने गायीगुरांना दिल्यास त्यांचेही पोट भरते. 

>> ताटात काहीही टाकू नये. जे पदार्थ आपल्याला आवडत नाहीत किंवा जे पदार्थ आपल्याकडून संपणार नाहीत असे वाटते, ते पदार्थ उष्टे करण्याआधी दुसऱ्या ताटात काढून ठेवावेत. म्हणजे ते वाया जात नाही. उष्टे अन्न फेकून देण्यासारखे पाप नाही. म्हणून जेवायला वाढून घेताना जेवढे संपेल तेवढेच अन्न वाढून घ्यावे आणि वाढलेले अन्न पूर्ण संपवावे.