शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

लोकल, बस प्रवासात स्तोत्रवाचन करणे कितपत योग्य आहे? त्याला शास्त्राधार आहे का पाहा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 10:08 IST

नाममंत्राचा जप, सोऽहं जप व प्राकृत पोथ्यांचे वाचन कोणत्याही ठिकाणी करता येते. गाडीत वाचन करण्यासारखी परिस्थिती असेल तर अवश्य वाचन करावे.

धर्मसिंधुसारख्या धर्मग्रंथातही वरील प्रश्नाचा उहापोह केलेला आढळत नाही. कारण धर्मशास्त्रग्रंथाची निर्मिती झाली त्यावेळची परिस्थिती एकदम निराळी होती. प्रत्येकजण देवपूजा, वाचन, जपजाप्य यासाठी सकाळचा वेळ काढून ठेवत असे. लोकसंख्येच्या भरमसाठी वाढीमुळे आता फक्त जगण्यासाठी झगडणे एवढेच बहुसंख्य लोकांच्या हातात राहिले आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन हा मोठा प्रश्न उद्भवल्यामुळे जपजाप्य कधी करायचे, हा देखील प्रश्न उद्भवला आहे. 'शास्त्र काय सांगते' या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूया. 

सद्यस्थितीत वाईटात एकच गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे देवाधर्माविषयी बुद्धी व ईश्वराविषयी आस्तिक्यभाव दिवसेंदिव वाढत आहे. त्यामुळे मिळेल त्या थोड्या वेळात काही तरी करावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. अशा वेळी मग नाना प्रश्न उद्भवतात. घरी तर श्वास घेण्याइतकी फुरसत मिळत नाही. मग फक्त प्रवासात मिळणारा वेळ सत्कारणी लावता येईल का? या थोड्याशा वेळात एखादी पोथी वाचावयास काय हरकत आहे? हे प्रश्न रास्त आहेत. फक्त शास्त्राधार मिळाला की हे प्रश्न सुटू शकतात. 

फोटो सौजन्य : गुगल

पण त्यासाठी गहन काथ्याकुट करण्याची काहीच आवश्यकता नाही. थोडेसे शास्त्र माहित असले तरी चालते. वैदिक मंत्र, बीजमंत्र, तांत्रिक तंत्र, मालामंत्र इ. मंत्रांचे पुरश्चरण घरात एकाच जागी बसून करावे लागते. त्याचप्रमाणे वैदिक सूक्ते व तत्सम गुरुचरित्रासारखे महाप्रभावी प्रसादिक ग्रंथही एकाच जागी बसून वाचावे लागतात. पण नाममंत्राचा जप, सोऽहं जप व प्राकृत पोथ्यांचे वाचन कोणत्याही ठिकाणी करता येते. विशेषत: वैखरी वाणीने म्हणजे मोठ्याने केलेल्या जपाचा कालांतराने मध्यमेत म्हणजे पुटपुटण्यात प्रवेश होतो. कालांतराने तो परेला भिडतो. परावाणी म्हणजे मानसिक जप होय. ज्यावेळी थोडा निवांत वेळ मिळेल त्यावेळी परावाणीने अवश्य जप करावा. परावाणीने नाही तर किमान मनातल्या मनात जप करावा. 

गाडीत वाचन करण्यासारखी परिस्थिती असेल तर अवश्य वाचन करावे. हल्ली दररोज प्रवास करणारे लोक आपले आह्निक गाडीतच उरकतात. घरात फक्त देवपूजा होते. रिकाम्या वेळेत डोक्यात व्यावहारिक व प्रपंचाचे विचार आणून मन:शांती बिघडवून घेण्यापेक्षा सरळ प्राकृत ग्रंथांचे वाचन करावे. ज्यावेळी मनात अमंगळ भावना निर्माण होण्यासारखी स्थिती असते किंवा एखादे वाईट दृष्य दिसून मन विचलित होते, तेव्हा हातपाय धुवून आचमन करावे. 

प्रवासात आचमनासाठी पळीभांडे, ताम्हण यांची आवश्यकता नसते. उजव्या कानाला हाताने स्पर्श करणे हेदेखील श्रोत्राचमन होय. हे शुद्ध भावनेने करावे. तसे करून 'आपण शुद्ध आहोत' अशी तीव्र भावना करून आपले नेहमीचे वाचन, मनन, चिंतन, जप इ. आह्निक करावे. मुंबई पुणे सारख्या शहरातले लोक लोकल ट्रेन, बसमध्ये धर्माचरण करतात. ज्यावेळी एखादी प्राकृत पोथी तोंडपाठ होते, त्यावेळी हातात पुस्तक घेण्याचीही गरज लागत नाही. थोड्या सरावाने आपले नित्यकर्म करूनही नामस्मरण व मनोमन स्तोत्रपठण केल्याचे फलही मिळते. थोड्याशा सवयीने मनात नामस्मरण व देहाने प्रपंचा या गोष्टीतून सहज सुलभ होतात.  प्रवासात जप करायचा असेल, तर जपमाळेचा वापर केला असता ते प्रदर्शनीय ठरेल. अशा वेळी बोटावरील पेरांचा वापर करावा. नाम होईल आणि काम पण होईल, नाही का? शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तेच खरं... 

नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा।।

अर्थात, जिथे असाल तिथे मनापासून देवाचा धावा करा, तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचतेच!

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल