शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

Holi 2022 : होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य का? त्यामागे आहे 'ही' पारंपरिक गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:25 IST

Holi 2022: होळीला आपण पुरणपोळी खातोच, पण त्या दिवशी तिचेच महत्त्व का ते कळल्यावर पुरणपोळीचा गोडवा निश्चित वाढेल!

ढुंढा नावाची एक राक्षसीण होती. ती लहान मुलांना ठार मारायची. तेव्हा लोक त्रस्त झाले आणि तिला शिव्या देऊ लागले. परंतु तरीही ती दाद देईना. लोक शिव्या देऊन वरून बोंबा मारू लागले. तरीही ती दाद देईना. मग गावातील सर्व पुरुष सूर्यास्तसमयी एकत्र जमले. त्यांनी आपापल्या घरून पाच पाच गोवऱ्या, पाच पाच लाकडे आणली आणि ती गोल रचून पेटवली. त्याचा प्रचंड विस्तव पेटला. ज्वाला फडकू लागल्या. लोक ढुंढा राक्षसिणीच्या शोधात सर्वत्र बोंबा मारत, शिव्या देत हिंडू लागले. शेकडो लोक एकत्र झाले आहेत, त्यांनी मोठा अग्नी पेटवला आहे, आता त्यांच्यापुढे आपले काही चालणार नाही. ते आपल्याला पकडून जाळामध्ये टाकून ठार मारतील, असे ढुंढा राक्षसिणीला वाटले. ती घाबरली व दूर दूर पळून गेली. त्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

लेखक गजानन खोले 'कुळधर्म कुळाचार' पुस्तकात लिहितात, हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. अग्निनारायणाने हे कार्य केले. त्यामुळे घराघरातील आयांना, आज्यांना आनंद झाला. शेतातून नुकतेच नवीन गहू आलेले होते. त्याचे पीठ त्यांनी दळून ठेवले होते. नवीन हरभऱ्याची डाळही आलेली होती. त्यांनी पुरण शिजत लावले. त्याच्या पुरणपोळ्या केल्या व त्यावर तूप घातले. भात भाजी घातली आणि केळीच्या पानावर ते पदार्थ वाढून गावकऱ्यांनी पेटवलेल्या अग्नीला नेऊन अर्पण केले. तेव्हा ते पाहताच तेथे जमलेल्या पुरुषांनी अग्निनारायणाला तीन प्रदक्षिणा घातल्या.

ढुंढा राक्षसीण निघून गेली. गावातील मुले सुखरूप राहू लागली. म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून त्यात पुरणपोळी घालण्याचा कुळधर्म सुरू झाला. एरंडाचे किंवा ताड, माड, आंबा असे कुठले तरी झाड ढुंढा राक्षसिणीचे प्रतीक म्हणून ठेवत, त्यावर गोवऱ्या रचून होळी पेटवतात आणि ढुंढा राक्षसीणीच्या नावाने बोंबा मारण्याचा कुलाचार पार पाडतात.

टॅग्स :Holiहोळी