शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

जेवण झालं का? आता एक डुलकी काढा; त्याआधी वाचा वामकुक्षीचे शारीरिक व मानसिक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:51 IST

ऑफिसमध्ये वामकुक्षी शक्य नाही? त्यावर पर्याय वाचा आणि रात्री जेवणानंतर शतपावली करा. सविस्तर वाचा.

बालपणी जेवणाआधी, जेवताना, जेवणानंर आईच्या सूचना सुरूच असत. त्यावेळी जाचक वाटणाीऱ्या गोष्टी आयुष्यभरासाठी सुदृढ आरोग्याचा कानमंत्र होता, हे मोठेपणी लक्षात येते. बालपणीच चांगल्या सवयी अंगवळणी पडल्या, की आयुष्यभर आरोग्याची हेळसांड होत नाही. त्या सवयीतला मुख्य भाग जेवणाचा. जेवायच्या आधी हात धुवून ये, एक घास बत्तीस वेळा चावून खा, श्लोक म्हण, जेवताना बोलू नको, जेवताना पाणी पिऊ नको, जेवणाच्या ताटात अन्न टाकू नको, ताटाभोवतीची शिते जमीनिवर ठेवू नको, जेवणानंतर स्वच्छ चूळ भर, शतपावली कर, थोडी विश्रांती घे आणि मग पुढच्या कामाला लाग, या सूचनांचे आजही आपण शक्य तसे पालन करतो. वरील सूचनेतील प्रत्येक वाक्य, हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तुर्तास आपण शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व समजून घेऊ. 

आपण आपल्या आजोबांना जेवणानंतर शतपावली मारताना पाहिले असेल. आजच्या काळात आपण त्याला नाईट वॉक म्हणतो, एवढाच काय तो फरक. परंतु, जेवणानंतर सावकाश पावले टाकत अन्न जिरवण्यासाठी चालण्याची क्रिया गरजेची आहे. म्हणून पूर्वीचे लोक त्याला रामरक्षेची, अथर्वशीर्षाची किंवा नातवंडांकडून परवचा म्हणवून घेण्याची जोड लावत. आता ती जागा मोबाईलवरील संवाद किंवा गाण्यांनी घेतली आहे.  एका श्लोकात म्हटले आहे,

भुक्तावोपविशत: स्थल्यं शयानस्य रुजस्तथा,आयुश्चक्रमाणस्य मृत्युर्धावति धावत: 

भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो, त्याच्या देहात अनेक व्याधी उद्भवता, जो धावतो, त्याचा मृत्यू जवळ येतो. म्हणजेच जेवणानंतर निष्क्रिय किंवा अतिसक्रीय होऊन चालणार नाही. त्यावर मंद पावले टाकीत शतपावली करणे, हाच एकमेव उपाय आहे. 

शतपावलीमुळे पोटातील अन्न पचनशील होण्यास मदत होते. अन्नाचे नीट पचन झाले, तर नानाविध व्याधी जन्माला येण्याआधीच समूळ नष्ट होते. जेवून झाल्यावर एका जागी बसणे, लगेच झोपणे किंवा वेगाने काम करणे अपेक्षित नाही. तर शरीराची हालचाल होणे, महत्त्वाचे असते. चालणे, हा सर्वांगुसंदर व्यायाम मानला जाता़े  मात्र, जेवणानंतर प्रभातफेरीसारखी फेरी मारणे उपयोगाचे नाही. तिथे उपयोग फक्त शतपावलीचा. शतपावली म्हणजे काय, तर मोजून शंभरएक पावले चालणे. 

आजकाल दिवसभरात आपण किती चाललो, हे मोजणारे अ‍ॅप, घडयाळ आहेत. दिवसभराचा तोंडी हिशोब ठेवणे शक्य नसले, तरी जेवणानंतरची शतपावली करणे सहज शक्य असते आणि ती तेवढ्याच प्रमाणात करणे अपेक्षित असते. 

वामकुक्षीचे महत्त्व काय? 

जेवणानंतर आबाल-वृद्धांना आळस येतो. शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा उद्योग यातले कोणीही त्यात अपवाद नाहीत. म्हणून शास्त्राने वामकुक्षीचा पर्याय सुचवला आहे. परंतु, हा पर्याय घरी अनुसरता येतो. बाहेर असताना वामकुक्षी घेतली, तर हातात नारळ मिळायची शक्यता अधिक, अशा वेळी भोजन कमी घेणे ईष्ट!

परंतु, वामकुक्षीच का? वाम म्हणून शरीराची डावी बाजू. डावीच बाजू का? कारण जेवणानंतर, शतपावली झाल्यावर, वामकुक्षी घेतल्याने म्हणजे, डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते. दुसरे कारण म्हणजे, आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी व डाव्या नाकपुडीतून चंद्रनाडी वाहत असते. अन्नपचनासाठी सूर्यनाडीची क्रिया व्यवस्थित असावी लागते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे सूर्यनाडी मोकळी राहते आणि व्यवस्थित काम करते. म्हणून जेवण झाल्यावर वीस ते पंचवीस मीनिटे वामकुक्षी घेणे, महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स