शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:32 IST

Guru Shukra Asta Vivah Muhurat: गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह विवाह संस्कारासाठी महत्त्वाचे मानले जातात, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

Guru Shukra Asta Vivah Muhurat: भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये विविध गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात शुभ मुहुर्तावर करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे असल्याचे पाहायला मिळते. अगदी घरातून निघण्यापासून ते विविध प्रकारचे विधी, होम-हवन, विवाह, विशेष पूजा अनेकविध गोष्टींसाठी मुहूर्त पाहिले जातात. सोने-चांदी खरेदीसाठीही मुहूर्त पाहिले जातात. भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे विवाह करताना विशेषत्वाने मुहूर्त पाहिले जातात. केवळ मुहूर्त नाही, तर विवाह करताना ग्रहबळही पाहिले जाते, असे म्हणतात. नवग्रहांमध्ये गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह महत्त्वाचे मानले गेले असून, मे महिन्यात हे दोन्ही ग्रह अस्तंगत असणार आहेत. त्यामुळे विवाहासाठी आता जुलैमध्ये विवाहासाठी काही मुहूर्त असून, त्यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात मुहूर्त असतील, असे सांगितले जात आहे. 

एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशांवर असतो, तेव्हा तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. पृथ्वीवरून हा ग्रह दिसत नसल्याने या स्थितीला तो ग्रह अस्त पावला, असे समजले जाते. सूर्यापासून दूरच्या अंतरावरून ग्रह मार्गक्रमण करू लागला की, तो ग्रह पृथ्वीवरून दिसतो. त्यामुळे त्या ग्रहाचा उदय झाला, असे सांगितले जाते. विद्यमान स्थितीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरु तसेच शुक्र ग्रह आहेत. त्यामुळे गुरु आणि शुक्र अस्तंगत आहेत. हे दोन्ही ग्रह अस्तंगत असल्यामुळे विवाह, उपनयन संस्कार, गृहप्रवेश तसेच अन्य मंगल कार्यासाठी मुहूर्त नसल्याचे सांगितले जात आहे.

अक्षय्य तृतीया विशेष महत्त्वाचा दिवस

संपूर्ण वर्षात काही दिवस असे असतात की, त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास विशेष मुहूर्त पाहावे लागत नाही. तो दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यास उत्तम मानला जातो. अक्षय्य तृतीया हा असाच एक दिवस आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे हा दिवस शुभ कार्ये करण्यास चांगला मानला जातो. काही ज्योतिषांच्या मते, या दिवशी विविध प्रकारची शुभ कार्ये केली जाऊ शकतात. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त पुण्यफलदायी मानला गेला आहे. या दिवशी केलेले पुण्य अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. 

गुरु-शुक्र कधी होणार उदय? 

मे महिन्यात अस्तंगत असलेले गुरु आणि शुक्र ग्रहांचा अनुक्रमे ३ जून आणि ७ जुलै रोजी उदय होणार आहेत. त्यामुळे ७ जुलैनंतर विवाहासाठी शुभ मुहूर्त असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तुम्ही विवाह करण्याचे ठरवत असल्यास संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. वर आणि वधुची जन्मपत्रिका, ग्रहबळ आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टी पाहून मगच त्या दोघांसाठी कोणता मुहूर्त विवाहासाठी अत्यंत शुभ ठरू शकेल, याचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करू शकतात. जुलै महिन्यात ९, ११, १२, १४ आणि १५ या तारखा विवाहासाठी योग्य ठरू शकतात, असे काहींचे म्हणणे आहे. त्यानंतर १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून, चातुर्मास सुरू होत आहे. १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी देवउठनी कार्तिकी एकदाशी आहे. अनेक ठिकाणी चातुर्मासात शुभ कार्ये केली जात नाहीत.

गुरु-शुक्राचे विवाह संस्कारातील महत्त्व

गुरु ग्रह सुखकारक मानला गेला असून, शुक्र ग्रह हा पतीकारक मानला जातो. विवाहानंतर दोघांचा संसार कसा होऊ शकेल, या गोष्टी गुरुवरून पाहिल्या जातात. तर शुक्रावरून पती-पत्नीमधील नाते कसे असू शकेल, असे पाहिले जाते.  त्यामुळे हे दोन्ही ग्रह सुस्थितीत असणे महत्त्वाचे मानले गेले आहे. गुरु आणि शुक्र हे शुभ ग्रह मानले जातात. चांगल्या वैवाहिक जीवनासाठी गुरु-शुक्र कारक ग्रह मानले गेले आहेत.  

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाmarriageलग्नPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिष